शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

महापालिकेला कर वसुलीतून सक्षम करणार

By admin | Updated: September 3, 2016 00:29 IST

हणमंत गायकवाड , लातूर शहरातील करवसुली समाधानकारक नाही. कराची वसुली झाली तर विकासाला चालना मिळते. त्यामुळे आपल्या कारकीर्दीत कर वसुलीवर भर देऊन मनपाला आर्थिक

हणमंत गायकवाड , लातूरशहरातील करवसुली समाधानकारक नाही. कराची वसुली झाली तर विकासाला चालना मिळते. त्यामुळे आपल्या कारकीर्दीत कर वसुलीवर भर देऊन मनपाला आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मत नूतन आयुक्त रविंद्र पांढरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. नगरसेवक, पदाधिकारी आणि जनतेने साथ दिली, तर झोकून देऊन काम करण्याची तयारी आहे. नूतन आयुक्त रविंद्र पांढरे यांनी शुक्रवारी लातूर मनपाचा पदभार घेतला. पदभारानंतर लागलीच त्यांनी विभागनिहाय बैठकांना प्रारंभही केला. पहिल्यांदा कर विभागाची बैठक घेऊन मनपाचा आर्थिक कोष जाणून घेतला. यावेळी ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी शासनाचे अनुदान तर गरजेचे आहेच. परंतु, स्थानिक कर संकलित होणे महत्त्वाचे आहे. या कराचा मेन्टेनन्स फंड म्हणून उपयोग होतो. शिवाय, शहराचा विकासही साध्य करता येतो. त्यासाठी रिकव्हरी महत्त्वाची आहे. कर्जमुक्त शहर, अशी आपल्या कामाची पद्धत आहे. हीच पद्धत लातूर मनपातही अंगिकारली जाईल. लातूर शहराचा नावलौकिक आहे. या लौकिकाला साजेल अशीच साथ मला मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी जनतेने कर वसुलीसाठी सहकार्य करावे. प्रारंभीच्या पहिल्या बैठकीत कराची वसुली मोठ्या प्रमाणात थकल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत कर वसुलीसाठी योग्य नियोजन केले जाईल, असेही ते म्हणाले.