शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

औरंगाबादेत जास्त रुग्णांची ठिकाणे कन्टेनमेंट झोन बनवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 12:14 IST

corona virus in Aurangabad परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी बुधवारी दिले.

ठळक मुद्देशहरात अद्याप एकही कन्टेनमेंट झोन नाहीचाचण्यांचे प्रमाण वाढवा

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी ज्याठिकाणी जास्त प्रमाणात रूग्ण आढळत आहेत तो भाग ‘कन्टेनमेंट झोन’ बनवून त्याठिकाणी नियमांचे कडकपणे पालन करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी बुधवारी दिले. यात महत्त्वाचे म्हणजे शहरात अद्याप एकही कन्टेनमेंट झोन केलेला नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोराना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत शिंदे बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्यासह सर्व संबंधित नोडल अधिकारी, संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील वाढती रूग्णसंख्या वेळीच रोखण्यासाठी तातडीने आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यात याव्यात, असे निर्देशित करून बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती, अतिजोखीम तसेच कमी जोखमीच्या व्यक्ती या सर्वांच्या चाचण्यांमध्ये वाढ करावी. प्रति बाधित व्यक्तीमागे १० जणांच्या चाचण्या कराव्यात, सर्व रूग्णालयांनी गंभीर रूग्णांसाठी खाटा रिक्त ठेवणे नियमानुसार आवश्यक आहे.

ज्याठिकाणी गरज नसलेल्या रूग्णांना अतिदक्षता विभागात दाखल केल्याचे आढळून येईल, अशा रूग्णालयांवर कारवाई करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या. तसेच मृत्यू झालेल्या रूग्णांच्या प्रवेशापासून त्या रूग्णांवर करण्यात आलेल्या उपचारांबाबतच्या सर्व माहितीचे विश्लेषण करून अहवाल सादर करावा. त्याचसोबत रूग्णांबाबतची उपचार सुविधा, प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबतची माहिती नियमितपणे अद्ययावत करून संकेतस्थळावर अपलोड करावी, अशा सूचना केल्या.

प्रशासकीय प्रमुखांनी केलेले दावे असेजिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत असून, घाटी येथील प्रयोगशाळेची अडीच हजार तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेची दरदिवशी पंधराशे स्वॅब नमुने तपासणीची क्षमता असल्याचे सांगितले. मनपा आयुक्त पाण्डेय यांनी १०४ चाचणी केंद्र सुरू केली आहेत. त्यात शहरात ३८ आणि ग्रामीण भागामध्ये ६६ केंद्रांवर कोरोना चाचण्या करण्यात येत असल्याचे सांगितले. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात संसर्ग वाढत असल्याचे डॉ. गोंदावले यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद