शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत जास्त रुग्णांची ठिकाणे कन्टेनमेंट झोन बनवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 12:14 IST

corona virus in Aurangabad परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी बुधवारी दिले.

ठळक मुद्देशहरात अद्याप एकही कन्टेनमेंट झोन नाहीचाचण्यांचे प्रमाण वाढवा

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी ज्याठिकाणी जास्त प्रमाणात रूग्ण आढळत आहेत तो भाग ‘कन्टेनमेंट झोन’ बनवून त्याठिकाणी नियमांचे कडकपणे पालन करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी बुधवारी दिले. यात महत्त्वाचे म्हणजे शहरात अद्याप एकही कन्टेनमेंट झोन केलेला नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोराना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत शिंदे बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्यासह सर्व संबंधित नोडल अधिकारी, संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील वाढती रूग्णसंख्या वेळीच रोखण्यासाठी तातडीने आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यात याव्यात, असे निर्देशित करून बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती, अतिजोखीम तसेच कमी जोखमीच्या व्यक्ती या सर्वांच्या चाचण्यांमध्ये वाढ करावी. प्रति बाधित व्यक्तीमागे १० जणांच्या चाचण्या कराव्यात, सर्व रूग्णालयांनी गंभीर रूग्णांसाठी खाटा रिक्त ठेवणे नियमानुसार आवश्यक आहे.

ज्याठिकाणी गरज नसलेल्या रूग्णांना अतिदक्षता विभागात दाखल केल्याचे आढळून येईल, अशा रूग्णालयांवर कारवाई करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या. तसेच मृत्यू झालेल्या रूग्णांच्या प्रवेशापासून त्या रूग्णांवर करण्यात आलेल्या उपचारांबाबतच्या सर्व माहितीचे विश्लेषण करून अहवाल सादर करावा. त्याचसोबत रूग्णांबाबतची उपचार सुविधा, प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबतची माहिती नियमितपणे अद्ययावत करून संकेतस्थळावर अपलोड करावी, अशा सूचना केल्या.

प्रशासकीय प्रमुखांनी केलेले दावे असेजिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत असून, घाटी येथील प्रयोगशाळेची अडीच हजार तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेची दरदिवशी पंधराशे स्वॅब नमुने तपासणीची क्षमता असल्याचे सांगितले. मनपा आयुक्त पाण्डेय यांनी १०४ चाचणी केंद्र सुरू केली आहेत. त्यात शहरात ३८ आणि ग्रामीण भागामध्ये ६६ केंद्रांवर कोरोना चाचण्या करण्यात येत असल्याचे सांगितले. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात संसर्ग वाढत असल्याचे डॉ. गोंदावले यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद