शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

माजलगाव आठवडी बाजाराचा फज्जा !

By admin | Updated: August 14, 2014 01:57 IST

माजलगाव : माजलगाव आठवडी बाजार हा शहरातील गजाननगर, शाहूनगर भागात भरत असल्याने त्या भागातील नागरिकांनी बाजार स्थलांतर करावा,

माजलगाव : माजलगाव आठवडी बाजार हा शहरातील गजाननगर, शाहूनगर भागात भरत असल्याने त्या भागातील नागरिकांनी बाजार स्थलांतर करावा, या मागणीसाठी आंदोलने करून निवेदन दिले, न्यायालयातही धाव घेतली. न्यायालयातून बाजार स्थलांतराचा आदेश घेतला. आदेशाचे पालन करीत न.प.ने बाजाराचे स्थलांतर केले, परंतु असुविधा असलेल्या भागात हा बाजार भरविण्यात आला असल्याचा आरोप काही लोकांनी केला. बुधवारी पहाटेपासूनच पोलीस कर्मचारी, दंगल नियंत्रक पथक, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी पहाटेपासूनच बाजारतळावर हजर राहून येणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांना बाजारतळावर बसण्यास मज्जाव करीत होते. मनूर रोडवरील जागेवर बाजार भरविण्यास त्यांना भाग पाडले. परंतु या रोडवरील बाजारतळावर शेतकऱ्यांनी जाण्यास नकार देऊन आपले घर जवळ करीत बाजारावर बहिष्कार टाकला. ग्राहकांनीही या बाजाराकडे पाठ फिरविली.माजलगाव आठवडी बाजार स्थलांतराचा वाद अनेक वर्षांपासून चालू आहे. न.प.कडून ज्या भागात बाजाराचे स्थलांतर करण्यात आले त्या भागात शेतकरी, व्यापारी, ग्राहक यांना कुठल्याही सोयी-सुविधा नसल्याने त्यांनी त्या जागेवर जाण्यास नकार दिला. न.प. कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सोबत घेऊन मनूर रोडवरील बाजाराच्या ठिकाणी जाण्यास भाग पाडल्याने अनेक शेतकऱ्यांनी बाजारावरच बहिष्कार टाकला. शहरातील सांडपाणी ज्या नाल्यांमधून जाते त्या सर्व नाल्या या बाजारतळाच्या चारही बाजुने जात असल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच बाजाराच्या चारही बाजुने बेशरमांच्या झाडांचा विळखा आहे. विशेष म्हणजे गावापासून या बाजाराचे ठिकाण दूर असल्याने ग्राहक जाण्यास नकार देत आहेत. तसेच त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही समोर केला जात आहे. महिला, लहान मुले, वृद्ध यांना अशा चिखलाच्या रस्त्यावरुन व असुविधा असलेल्या ठिकाणी बाजार आणण्यासाठी जात असतांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. माजलगाव शहरातील आठवडी बाजाराचा प्रश्न हा शहरासह परिसरातील १ लाख लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागणे आवश्यक आहे. शेतकरी, व्यापारी यांचे हाल होऊ नयेत, यासाठी त्यांना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहेत. शेतकरी, व्यापारी, ग्राहक यांचे हाल होऊ नयेत, यासाठी हा बाजार माजलगाव महाविद्यालयाच्या बाजूच्या जागेवर भरवावा, अशी मागणी भाजपाचे भाई गंगाभिषण थावरे यांनी केली आहे.शहरातील आठवडी बाजाराबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्वस्वी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या नगर परिषदेला असून, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे रितसर प्रस्ताव पाठवून जी जागा सोयीस्कर आहे त्यांची मागणी करुन योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करणे गरजेचे आहे. शहरवासियांना आठवडी बाजारासाठी सोयीयुक्त जागा मिळण्यास माझा कसलाही विरोध नसल्याचे आ. प्रकाश सोळंके यांनी सांगितले.(वार्ताहर)