शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात मोर्चे

By admin | Updated: August 13, 2014 00:57 IST

माजलगाव: येथील आठवडी बाजारात महाविद्यालयाशेजारची जमीन देऊन तेथे बाजार भरवावा, या मागणीसाठी शेतकरी, व्यापारी, नागरिकांनी

माजलगाव: येथील आठवडी बाजारात महाविद्यालयाशेजारची जमीन देऊन तेथे बाजार भरवावा, या मागणीसाठी शेतकरी, व्यापारी, नागरिकांनी तर राज्यघटनेतील मूलतत्वानुसार महाराष्ट्रातील बंजारा समाजास अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने पारंपरिक वेशभूषेत समाजबांधवांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मंगळवारचा दिवस मोर्चाने दणाणून गेला होता.आठवडी बाजारासाठी लढानगर परिषद मनूर रोडवरील सर्व्हे नं. ८ मध्ये बाजार भरविण्यासाठी अडून बसली असून, त्यासाठी विरोध होत आहे. प्रशासनाने याठिकाणी बाजार भरविल्यास बुधवारच्या बाजारावर बहिष्कार टाकून सामूहिक आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा भाजपाचे भाई थावरे यांनी दिला आहे.सध्या येथील आठवडी बाजाराच्या स्थलांतराचा पश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. गजानन मंदिर रोडवरील बाजार हटविण्यासाठी जगदीश साखरे व इतरांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याची गंभीर दखल घेत बाजाराचे स्थलांतर करण्यासाठी एक वर्षापूर्वीच न्यायालयाने नगर परिषद प्रशासनाला सक्तीचे आदेश दिले होते. ७ आॅगस्ट रोजी साखरे व वांडेकर यांनी आत्मदहनचा प्रयत्नही केला होता. तरीसुद्धा बाजारतळाचा पश्न मिटला नाही. न्यायालयाच्या तंबीमुळे नगर परिषद त्यांच्या जागेत सर्व्हे नं. ८ मनूर रोडवर बाजार नेण्याचा प्रयत्न करीत आहे. वास्तविक पाहता माजलगाव महाविद्यालयाशेजारी सर्व्हे नं. ३०८ मध्ये गायरान जमिनीवर बाजार भरविण्याची शेतकरी, व्यापारी, नागरिकांची मागणी आहे. न.प.ने साफसफाई केली होती. मात्र याठिकाणी बाजार भरविण्यास महाविद्यालय विरोध करीत आहे. महाविद्यालयाशेजारील जागेतच बाजार स्थलांतरीत करावा व ही जागा बाजारासाठी कायमस्वरुपी देण्यात यावी, या मागणीसाठी भाजपाचे भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी, शेतकरी, नागरिक यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चामध्ये मनसेचे डॉ. भगवान सरवदे, बाळासाहेब मस्के, श्रीराम जाधव, संजय होके, राधाकृष्ण नायबळ, सलीम आतार यांच्यासह शेतकरी, व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आरक्षणासाठी बंजारा समाजाचा पारंपरिक वेशभूषेत मोर्चाराज्यघटनेतील मूलतत्वानुसार महाराष्ट्रातील बंजारा समाजास अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील बंजारा समाजातील शेकडो महिला, पुरुषांनी एकत्रित येऊन आरक्षणासाठी मोर्चा काढला. दिवसेंदिवस निवडणुका जवळ येत आहेत. निवडणुकांचा अंदाज घेता समाजबांधव आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. निवडणुकीपूर्वी बंजारा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करुन सहभागी झाल्या होत्या. संपत चव्हाण, जीवन राठोड, शरद चव्हाण, उदयभान राठोड, मनोज आडे, शाम पवार यांच्यासह महिला, पुरुष, तरुण मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चानंतर तहसीलदार अरुण जराड यांना समाजबांधवांच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. एकूणच मंगळवारचा दिवस मोर्चाने गाजला. मोर्चेकऱ्यांच्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते. (वार्ताहर)