शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

मका हब उभारणीला सुरुवात

By admin | Updated: May 12, 2014 00:38 IST

औरंगाबाद : मक्याच्या क्षेत्रवाढीचा उच्चांक गृहीत धरून मका प्रक्रिया व निर्यातीला चालना देण्यासाठी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत ५० एकर जागेवर ‘मका हब ’ उभारण्यात येणार आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद विभागातील मक्याच्या क्षेत्रवाढीचा उच्चांक गृहीत धरून मका प्रक्रिया व निर्यातीला चालना देण्यासाठी जाधववाडीतील जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत ५० एकर जागेवर ‘मका हब ’ उभारण्यात येणार आहे. यासाठी पणन मंडळ संरक्षक भिंत उभारत आहे. राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी बाजार समिती म्हणून औरंगाबाद जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. याच बाजार समितीच्या पूर्वेस ५० एकर क्षेत्रावर ‘मका हब’ उभारण्यात येणार आहे. याची घोषणा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली होती. यासंदर्भात जानेवारी-२०१४ मध्ये प्रथम पुण्यात वरिष्ठ कृषी अधिकार्‍यांची व नंतर औरंगाबादेत ‘महाराष्ट्र अ‍ॅडव्हान्टेज एक्स्पो’च्या पार्श्वभूमीवर उद्योजक आणि कृषी अधिकार्‍यांची बैठक झाली. यात मका हबसाठी जाधववाडीतील जागा निश्चित झाल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली होती. प्रारंभी कृषी पणन मंडळाने जाधववाडीत २० एकर जागा घेतली होती. त्यानंतर आणखी ३० एकर जागा वाढवून देण्यात आली. अशी एकूण ५० एकर जागा पणन मंडळाला उपलब्ध झाली आहे. या जागेवर मका हब उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम रिकाम्या जागेला संरक्षक भिंतीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. संरक्षक भिंत बांधताना मध्ये मध्ये सिमेंटचे खांब (पिलर) तयार केले जात आहेत व भिंत विटांची केली आहे. मराठवाड्यात केशर आंब्याचे क्षेत्र व उत्पादन लक्षात घेऊन सर्वप्रथम या जागेवर आंबा मार्केट उभारण्यात येणार होते. त्यानंतर निर्णय बदलून तेथे टर्मिनल मार्केट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. आता मका हब उभारण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. जिथे पिकते तिथेच प्रक्रिया औरंगाबाद विभागात एकूण साडेतीन लाख हेक्टरवर मक्याची पेरणी होते. जिल्ह्यात सिल्लोड, फुलंब्री, सोयगाव आणि कन्नड तालुक्यांत तसेच जालना जिल्ह्यातील भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यात मक्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. सुधारित वाण आणि नवीन तंत्रज्ञानामुळे मका पिकाची उत्पादकता वाढविण्यात येथील शेतकर्‍यांना बर्‍यापैकी यश आले आहे. औरंगाबाद विभागात मक्याचे एकरी २५ ते ३० क्विंटलपर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. मका क्षेत्रवाढीचा गेल्या पाच वर्षांतील चढता आलेख पाहिला तर दरवर्षी मका लागवड क्षेत्रात भरच पडत आहे. मका क्षेत्र वाढले तरीही मका प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे शेतकर्‍यांना बाजार व्यवस्थेवरच अवलंबून राहावे लागत आहे. यासाठी जिथे पिकते तिथेच प्रक्रिया झाली तर मक्याला जास्त भाव मिळेल या हेतूने मका हबची उभारणी जाधववाडीत होणार आहे. बिझनेस प्लॅनसाठी निविदा प्रक्रिया सुरू ‘आत्मा’चे उपसंचालक संतोष आळसे यांनी सांगितले की, मका हबची उभारणी बीओटी तत्त्वावर केली जाणार आहे. एकीकडे ५० एकर जागेला संरक्षण देण्यासाठी भिंत उभारण्यात येत आहे. त्यासाठी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. दुसरीकडे मका हबसाठी बिझनेस प्लॅन तयार करण्यासाठी कन्सल्टंट कंपनीची नेमणूक करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. हेच कन्सल्टंट मका हबमध्ये काय सुविधा असाव्यात याचा संपूर्ण प्लॅन तयार करून देतील. यानंतर मका हब उभारणीच्या दृष्टीने पुढील प्रक्रिया शासकीय स्तरावर सुरू होईल.