शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

३ लाख ४२ हजार कृषिपंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांना महावितरणचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 18:37 IST

विद्युत पुरवठा न कापण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. 

औरंगाबाद : यंदा संपूर्ण मराठवाड्यावरच दुष्काळाचे सावट आहे. खरिपाची पिके वाया गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, एकीकडे वीज बिलाची थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज कापण्याची मोहीम हाती घेतली असली, तरी महावितरण परिमंडळांतर्गत दोन जिल्ह्यांतील थकबाकीदार कृषिपंपधारकांचा मात्र, विद्युत पुरवठा न कापण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. 

या निर्णयामुळे महावितरण परिमंडळांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील २ लाख १६ हजार ५९३, तर जालना जिल्ह्यातील १ लाख २५ हजार ४०७ अशा दोन्ही जिल्ह्यांतील एकूण ३ लाख ४२ हजार थकबाकीदार कृषिपंपधारक शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. या थकबाकीदार कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे २ हजार ८९१ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

या पार्श्वभूमीवर महावितरणच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, तूर्तास थकबाकीदार कृषिपंपधारकांची वीज कपात न करण्याच्या सूचना आहेत. याशिवाय दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृषिपंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांना थकबाकीच्या ३० ते ३५ टक्के रक्कम माफ करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. यासंदर्भात अद्याप अध्यादेश प्राप्त झालेला नाही. घरगुती, व्यावसायिक, उद्योग, कृषी, पाणीपुरवठा, पथदिवे आदी वीज ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. दरवेळी महावितरणला थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घ्यावी लागते. सध्या घरगुती व व्यावसायिक वीज ग्राहकांकडे थकबाकीची वसुली केली जात आहे. जे ग्राहक थकबाकी व चालू बिल भरणार नाहीत, त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. 

सप्टेंबर महिन्यात जळालेले रोहित्र दुरुस्तीसाठी थकबाकीदार शेतकऱ्यांकडे २५ हजार रुपयांपर्यंत वीज बिल थकले असेल, त्यांनी किमान ३ हजार रुपये भरावेत, तर ज्यांचे २५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल थकले आहे, त्या शेतकऱ्यांनी किमान ५ हजार रुपये भरल्यास रोहित्र दुरुस्त करून देण्याची अट महावितरणने घातली होती. काही दिवसांनंतर ही अटदेखील मागे घेण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना तेव्हाही दिलासा मिळाला होता.

महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, परिमंडळांतर्गत प्रामुख्याने घरगुती, कृषी, पाणीपुरवठा, पथदिवे आदी वीज ग्राहकांकडे हजारो कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीची रक्कम दरमहा वाढतच चालली आहे. त्यामुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे. असे असले तरी दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच हवालदिल झालेल्या कृषिपंपधारक शेतकऱ्यांची वीज थकबाकीमुळे न कापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरीelectricityवीज