शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

३ लाख ४२ हजार कृषिपंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांना महावितरणचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 18:37 IST

विद्युत पुरवठा न कापण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. 

औरंगाबाद : यंदा संपूर्ण मराठवाड्यावरच दुष्काळाचे सावट आहे. खरिपाची पिके वाया गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, एकीकडे वीज बिलाची थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज कापण्याची मोहीम हाती घेतली असली, तरी महावितरण परिमंडळांतर्गत दोन जिल्ह्यांतील थकबाकीदार कृषिपंपधारकांचा मात्र, विद्युत पुरवठा न कापण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. 

या निर्णयामुळे महावितरण परिमंडळांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील २ लाख १६ हजार ५९३, तर जालना जिल्ह्यातील १ लाख २५ हजार ४०७ अशा दोन्ही जिल्ह्यांतील एकूण ३ लाख ४२ हजार थकबाकीदार कृषिपंपधारक शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. या थकबाकीदार कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे २ हजार ८९१ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

या पार्श्वभूमीवर महावितरणच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, तूर्तास थकबाकीदार कृषिपंपधारकांची वीज कपात न करण्याच्या सूचना आहेत. याशिवाय दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृषिपंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांना थकबाकीच्या ३० ते ३५ टक्के रक्कम माफ करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. यासंदर्भात अद्याप अध्यादेश प्राप्त झालेला नाही. घरगुती, व्यावसायिक, उद्योग, कृषी, पाणीपुरवठा, पथदिवे आदी वीज ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. दरवेळी महावितरणला थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घ्यावी लागते. सध्या घरगुती व व्यावसायिक वीज ग्राहकांकडे थकबाकीची वसुली केली जात आहे. जे ग्राहक थकबाकी व चालू बिल भरणार नाहीत, त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. 

सप्टेंबर महिन्यात जळालेले रोहित्र दुरुस्तीसाठी थकबाकीदार शेतकऱ्यांकडे २५ हजार रुपयांपर्यंत वीज बिल थकले असेल, त्यांनी किमान ३ हजार रुपये भरावेत, तर ज्यांचे २५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल थकले आहे, त्या शेतकऱ्यांनी किमान ५ हजार रुपये भरल्यास रोहित्र दुरुस्त करून देण्याची अट महावितरणने घातली होती. काही दिवसांनंतर ही अटदेखील मागे घेण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना तेव्हाही दिलासा मिळाला होता.

महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, परिमंडळांतर्गत प्रामुख्याने घरगुती, कृषी, पाणीपुरवठा, पथदिवे आदी वीज ग्राहकांकडे हजारो कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीची रक्कम दरमहा वाढतच चालली आहे. त्यामुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे. असे असले तरी दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच हवालदिल झालेल्या कृषिपंपधारक शेतकऱ्यांची वीज थकबाकीमुळे न कापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरीelectricityवीज