शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींनी घडविली मानवी मूल्यांची क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:44 IST

विसाव्या शतकात गांधींनी मानवी मूल्यांची क्रांती घडविली’असे प्रतिपादन आज येथे आंतरराष्टÑीय ख्यातीचे विचारवंत डॉ. रॅमिन जहानबेगलू यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘महात्मा गांधी यांच्याकडे एक इतिहास पुरुष म्हणून किंवा संत म्हणून पाहू नका. वर्तमानकाळासाठी, विश्वाच्या भविष्यासाठी, तसेच राजकारण, लोकशाही, समाजकारण व अर्थकारणासाठी गांधी विचार आवश्यक आहेत. विसाव्या शतकात गांधींनी मानवी मूल्यांची क्रांती घडविली’असे प्रतिपादन आज येथे आंतरराष्टÑीय ख्यातीचे विचारवंत डॉ. रॅमिन जहानबेगलू यांनी केले.ते एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात ‘गांधी अँड हिज रेलेव्हन्स टुडे’ या विषयावर व्याख्यान देत होते. एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम हे अध्यक्षस्थानी होते.जहानबेगलू म्हणाले, सत्ता आणि पैसा यात आज आपण गुरफटून गेलो आहोत. पण महात्मा गांधींनी समाजाला संघटित करण्याची कला दिली. विसाव्या शतकात अनेक तत्त्ववेत्ते, विचारवंत होऊन गेले. पण त्यात गांधींचे वेगळेपण आहे. त्यांनी मानवी जीवनाचे समग्र चिंतन केले आणि त्यानुसार कृती केली.गांधींनी इहवादी, धर्मनिरपेक्ष राजकारण, अध्यात्मिक नैतिकता यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला. १९०९ साली हिंद स्वराज लिहिलं होतं. त्यात त्यांनी संस्कृतीच्या नावाने चाललेला उपभोगवाद व शोषणावरच प्रश्न चिन्ह उभे केले होते. औद्योगिक सभ्यतेने सर्व जगाला विनाशाकडे नेले आहे. १९०९ साली गांधींनी आताच्या हवामान बदलासारख्या प्रश्नांचा ऊहापोह केला होता. यावरून त्यांची दूरदृष्टी सिद्ध होते, याकडे जहानबेगलू यांनी लक्ष वेधले.