शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

महात्मा गांधींनी घडविली मानवी मूल्यांची क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:44 IST

विसाव्या शतकात गांधींनी मानवी मूल्यांची क्रांती घडविली’असे प्रतिपादन आज येथे आंतरराष्टÑीय ख्यातीचे विचारवंत डॉ. रॅमिन जहानबेगलू यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘महात्मा गांधी यांच्याकडे एक इतिहास पुरुष म्हणून किंवा संत म्हणून पाहू नका. वर्तमानकाळासाठी, विश्वाच्या भविष्यासाठी, तसेच राजकारण, लोकशाही, समाजकारण व अर्थकारणासाठी गांधी विचार आवश्यक आहेत. विसाव्या शतकात गांधींनी मानवी मूल्यांची क्रांती घडविली’असे प्रतिपादन आज येथे आंतरराष्टÑीय ख्यातीचे विचारवंत डॉ. रॅमिन जहानबेगलू यांनी केले.ते एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात ‘गांधी अँड हिज रेलेव्हन्स टुडे’ या विषयावर व्याख्यान देत होते. एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम हे अध्यक्षस्थानी होते.जहानबेगलू म्हणाले, सत्ता आणि पैसा यात आज आपण गुरफटून गेलो आहोत. पण महात्मा गांधींनी समाजाला संघटित करण्याची कला दिली. विसाव्या शतकात अनेक तत्त्ववेत्ते, विचारवंत होऊन गेले. पण त्यात गांधींचे वेगळेपण आहे. त्यांनी मानवी जीवनाचे समग्र चिंतन केले आणि त्यानुसार कृती केली.गांधींनी इहवादी, धर्मनिरपेक्ष राजकारण, अध्यात्मिक नैतिकता यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला. १९०९ साली हिंद स्वराज लिहिलं होतं. त्यात त्यांनी संस्कृतीच्या नावाने चाललेला उपभोगवाद व शोषणावरच प्रश्न चिन्ह उभे केले होते. औद्योगिक सभ्यतेने सर्व जगाला विनाशाकडे नेले आहे. १९०९ साली गांधींनी आताच्या हवामान बदलासारख्या प्रश्नांचा ऊहापोह केला होता. यावरून त्यांची दूरदृष्टी सिद्ध होते, याकडे जहानबेगलू यांनी लक्ष वेधले.