शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

महाराष्ट्रीयन कबड्डीला आॅलिम्पिकमध्ये हवी संधी

By admin | Updated: July 15, 2014 00:52 IST

महेश पाळणे, लातूर राम लक्ष्मण जानकी... जय बोलो हनुमान की़़़ सूरसपाटा मार झपाटा़़़ असे म्हणत दोन संघात खेळला जाणाऱ्या शिवकालीन खेळाला नंतरच्या काळात कबड्डीच्या माध्यमातून मूर्त स्वरूप मिळाले़

महेश पाळणे, लातूरराम लक्ष्मण जानकी... जय बोलो हनुमान की़़़ सूरसपाटा मार झपाटा़़़ असे म्हणत दोन संघात खेळला जाणाऱ्या शिवकालीन खेळाला नंतरच्या काळात कबड्डीच्या माध्यमातून मूर्त स्वरूप मिळाले़ प्रतिस्पर्धी संघातील भिडूला सूर मारून स्पर्श करीत त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत मध्यरेषा गाठताना कबड्डी कबड्डी कबड्डी म्हणण्याचा उच्चार टिकवून ठेवणारा हा दमदार खेऴ या कबड्डी खेळाचा उगम रांगड्या महाराष्ट्राच्या लालमातीत झाला़ जागतिक पातळीवर हा खेळ आजमीतीला मातीवरून मॅटवर गेला आहे़ प्रतिवर्षी १५ जुलै हा कबड्डी दिन म्हणून साजरा केला जातो़ प्राचीन काळात वेगवेगळ्या नावाने कबड्डी खेळ परिचीत होता़ शब्दाच्या उच्चाराने फुफ्फुस बळकट होत असल्याने मुकी कबड्डी बोलकी झाली़ राज्यातील जनता निरोगी असावी व अंगी चपळता यावी या उद्देशाने शिवाजी महाराजांनी त्याकाळात कबड्डीला सुरूवात केली़ पूर्वी हा खेळ हूतूतू या नावाने ओळखला जात असे़ कबड्डी जरी प्राचीन असली तरी महाराष्ट्रात तिचा जन्म १९२१ साली झाला़ आधुनिक कबड्डीला १९३० साली भारतात सुरूवात झाली़ महाराष्ट्रात सुरूवातीस अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने कबड्डीस चालना दिली़ दयानंद क्रीडा मंडळ, अंधोरी़ स्वामी विवेकानंद विद्यालय, शिरूर ताजबंद़ प्रभात क्रीडा मंडळ, रेणापूऱ जय हिंद क्रीडा मंडळ, रोकडा सावरगाव यासह आनंदवाडी, हिंपळनेर, कवठाळी व चापोलीतील कबड्डीपटूंनी लातूरचे नाव राज्यभर पोेहोचविले. चंद्रकांत पाटील, प्राग़णपतराव माने, धर्मपाल गायकवाड, श्रीरंग बंडापल्ले यांना कबड्डीत शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला आहे़ विनोद लखनगीरे, भास्कर सुर्यवंशी, बाबुराव नलवाड, तुळशिराम रोकडे, अशोक जाधव, सुरेखा जगताप, खतीजा शेख, भाग्यश्री सुर्यवंशी, साजीदा शेख यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली चुणूक दाखवीली आहे़ लातूर जिल्ह्यात शिरूर ताजबंद, अंधोरी, रेणापूर, किनगाव व रोकडा सावरगाव येथे कबड्डीच्या राज्य ते अखिल भारतीय स्तरा पर्यंतच्या स्पर्धा घेण्यात आल्या़आॅलिम्पिक स्पर्धेत सहभाग व्हावा़़़मराठमोळ्या कबड्डीचा आॅलिम्पिक स्पर्धेत सहभाग व्हावा, गावोगावी कबड्डी वाढली पाहिजे़ जिल्ह्यासह मराठवाड्यात कबड्डीचा स्तर उंचायला हवा यासह कबड्डीतील तांत्रीक बाबींचा अभ्यास करत खेळाडूंना कौशल्य शिकवीणे गरजेचे असल्याचे मत शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्राग़णपतराव माने यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.