शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रीयन कबड्डीला आॅलिम्पिकमध्ये हवी संधी

By admin | Updated: July 15, 2014 00:52 IST

महेश पाळणे, लातूर राम लक्ष्मण जानकी... जय बोलो हनुमान की़़़ सूरसपाटा मार झपाटा़़़ असे म्हणत दोन संघात खेळला जाणाऱ्या शिवकालीन खेळाला नंतरच्या काळात कबड्डीच्या माध्यमातून मूर्त स्वरूप मिळाले़

महेश पाळणे, लातूरराम लक्ष्मण जानकी... जय बोलो हनुमान की़़़ सूरसपाटा मार झपाटा़़़ असे म्हणत दोन संघात खेळला जाणाऱ्या शिवकालीन खेळाला नंतरच्या काळात कबड्डीच्या माध्यमातून मूर्त स्वरूप मिळाले़ प्रतिस्पर्धी संघातील भिडूला सूर मारून स्पर्श करीत त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत मध्यरेषा गाठताना कबड्डी कबड्डी कबड्डी म्हणण्याचा उच्चार टिकवून ठेवणारा हा दमदार खेऴ या कबड्डी खेळाचा उगम रांगड्या महाराष्ट्राच्या लालमातीत झाला़ जागतिक पातळीवर हा खेळ आजमीतीला मातीवरून मॅटवर गेला आहे़ प्रतिवर्षी १५ जुलै हा कबड्डी दिन म्हणून साजरा केला जातो़ प्राचीन काळात वेगवेगळ्या नावाने कबड्डी खेळ परिचीत होता़ शब्दाच्या उच्चाराने फुफ्फुस बळकट होत असल्याने मुकी कबड्डी बोलकी झाली़ राज्यातील जनता निरोगी असावी व अंगी चपळता यावी या उद्देशाने शिवाजी महाराजांनी त्याकाळात कबड्डीला सुरूवात केली़ पूर्वी हा खेळ हूतूतू या नावाने ओळखला जात असे़ कबड्डी जरी प्राचीन असली तरी महाराष्ट्रात तिचा जन्म १९२१ साली झाला़ आधुनिक कबड्डीला १९३० साली भारतात सुरूवात झाली़ महाराष्ट्रात सुरूवातीस अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने कबड्डीस चालना दिली़ दयानंद क्रीडा मंडळ, अंधोरी़ स्वामी विवेकानंद विद्यालय, शिरूर ताजबंद़ प्रभात क्रीडा मंडळ, रेणापूऱ जय हिंद क्रीडा मंडळ, रोकडा सावरगाव यासह आनंदवाडी, हिंपळनेर, कवठाळी व चापोलीतील कबड्डीपटूंनी लातूरचे नाव राज्यभर पोेहोचविले. चंद्रकांत पाटील, प्राग़णपतराव माने, धर्मपाल गायकवाड, श्रीरंग बंडापल्ले यांना कबड्डीत शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला आहे़ विनोद लखनगीरे, भास्कर सुर्यवंशी, बाबुराव नलवाड, तुळशिराम रोकडे, अशोक जाधव, सुरेखा जगताप, खतीजा शेख, भाग्यश्री सुर्यवंशी, साजीदा शेख यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली चुणूक दाखवीली आहे़ लातूर जिल्ह्यात शिरूर ताजबंद, अंधोरी, रेणापूर, किनगाव व रोकडा सावरगाव येथे कबड्डीच्या राज्य ते अखिल भारतीय स्तरा पर्यंतच्या स्पर्धा घेण्यात आल्या़आॅलिम्पिक स्पर्धेत सहभाग व्हावा़़़मराठमोळ्या कबड्डीचा आॅलिम्पिक स्पर्धेत सहभाग व्हावा, गावोगावी कबड्डी वाढली पाहिजे़ जिल्ह्यासह मराठवाड्यात कबड्डीचा स्तर उंचायला हवा यासह कबड्डीतील तांत्रीक बाबींचा अभ्यास करत खेळाडूंना कौशल्य शिकवीणे गरजेचे असल्याचे मत शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्राग़णपतराव माने यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.