शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून महाराष्ट्र पाणीदार होईल

By admin | Updated: May 19, 2015 00:49 IST

लातूर / किनगाव: देशातील राजकीय व्यक्ती तसेच संत व समाजाच्या सहयोगातून पाण्याचा दुष्काळ नाहीसा होवून राष्ट्र पाणीदार होईल़

लातूर / किनगाव: देशातील राजकीय व्यक्ती तसेच संत व समाजाच्या सहयोगातून पाण्याचा दुष्काळ नाहीसा होवून राष्ट्र पाणीदार होईल़ त्यासाठी मेहनत व पैसा खर्च करण्याची गरज आहे़ राज्यस्थानने गेल्या ३१ वर्षात ११ हजार तलाव बांधले़ त्यामुळे तेथील दुष्काळ संपुष्टात आला आहे़ दुष्काळमुक्त व पाणीदार होण्यासाठी सामुहीक मेहनत करण्याची गरज आहे, असे मत प्रसिद्ध जलतज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी सोमवारी लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले़जलयुक्त शिवार अभियानातील कामाची पाहणी सोमवारी लातूर जिल्ह्यात त्यांनी केली़ या पाहणीदरम्यान अहमदपूर तालुक्यातील परचंडा, बामणी, शिवणी, उमरदरा, सावरगाव येथे नाला खोलीकरण व सरळीकरण कामाचा शुभारंभ झाला़ तसेच लातूर शहरातील दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात डॉ़ राजेंंद्रसिंह यांनी टंचाईमुक्तीचा कानमंत्र दिला़ जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, माजी आमदार पाशा पटेल, उपविभागीय अधिकारी स्वाती शिंदे, गटविकास अधिकारी नितीन दाताळ, पंचायत समिती सभापती आऱ डी़ शेळके, जि़ प़ सदस्य चंद्रकांत मद्दे, एऩआऱ पाटील, सिद्धार्थ सूर्यवंशी, विठ्ठलराव बोडके आदींची उपस्थिती होती़ यावेळी डॉ़ राजेंद्रसिंह राणा म्हणाले, लोकप्रतिनिधी, जनता आणि शासन या तिघांनी एकत्र येऊन काम केल्यास जलसंकटाचा सामना करता येणार आहे़ राज्यकर्ते, समाज व संतांनी आपापल्या भूमिका प्रमाणिकपणे पार पाडल्या तर देशातला दुष्काळ नाहीसा होईल़ राजस्थानपेक्षा महाराष्ट्र राज्य सुधारीत आहे़ राजस्थानमध्ये ३१ वर्षात ११ हजार तलाव बांधले़ यामुळे सरकारी मदत न घेता तेथील दुष्काळ नाहीसा झाला़ पाण्याचे संकट मोठे आहे़ या संकटाशी लढायचे असेल तर जलयुक्त शिवार अभियानात लोकांचा सहभाग महत्वाचा आहे़ लोकसहभागाशिवाय जलयुक्त शिवार अभियान यशस्वी होऊ शकणार नाही़ लोकांनी आता राजकारण्यांच्या मागे न धावता ढगांच्या मागे धावले पाहिजे़ तरच दुष्काळ नाहीसा होईल़ पाणीटंचाई किंवा दुष्काळ घालवायचा असेल तर आमदार, खासदारांच्या हातात हात घालून नव्हे, तर ग्रामस्थांच्या हातात हात घालून कामे करावी लागतील़ राजस्थानचा विकास तेथील शेतकऱ्यांनी केला़ वाहते पाणी जमीनित आडवून व जिरवून पाणीपातळीत वाढ केली़ आपल्याला हे का शक्य नाही, असा सवाल उपस्थित करुन डॉ़ राजेंद्रसिंह राणा म्हणाले, जलवायु परिणामामुळे दुष्काळ पडत आहे़ पावसाचे चक्र बदलले आहे़ सूर्याच्या उष्णतेने वर्षभरात ३ मीटर पाण्याची वाफ होते व पावसाच्या पाण्यामुळे दीड फुट पाणीपातळीत घट होते़ पाणी अडविण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)