शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र शासनाचा सयाजीराव गायकवाडांवर २५ खंडांचा प्रकल्प; पहिल्या १२ खंडांचे बडोद्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 15:57 IST

महाराष्ट्र शासनाचा सयाजीराव गायकवाडांवर २५ खंडांचा प्रकल्प; पहिल्या १२ खंडांचे बडोद्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

औरंगाबाद : स्वातंत्र्यपूर्व काळात विविध क्षेत्रांमध्ये प्रबोधनाची कास धरून लोकशाही संविधानाचा पाया घालणार्‍या महाराज सयाजीराव गायकवाड यांचे समग्र गौरवशाली कार्य लवकरच वाचकांसमोर येणार आहे. राज्य शासनाने गठित केलेल्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती’तर्फे एकूण २५ खंडांमध्ये त्यांच्या अक्षरधनाचा वारसा प्रकाशित केला जाणार असून, त्यापैकी पहिल्या १२ खंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ फेब्रुवारी रोजी बडोदा येथे होणार्‍या ९१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे. यावेळी संमेलनाच्या स्वागताध्यक्षा शुभांगिनी राजे गायकवाड आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित राहतील, अशी माहिती ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.पहिल्या बारा खंडांमध्ये दोन भाषण संग्रह, तीन पत्रसंग्रह, दोन इंग्रजी भाषण संग्रह, चार इंग्रजी पत्रव्यवहार आणि एक गौरव ग्रंथ यांचा समावेश आहे. सयाजीराव यांच्याशी निगडित साहित्य सामुग्री भारतासह अमेरिका आणि इंग्लंड येथून गोळा करण्यात आली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली गठित या समितीचे राज्यमंत्री रवींद्र वायकर उपाध्यक्ष आहेत. समितीमध्ये उच्चशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, संचालक डॉ. धनराज माने, शासकीय मुद्रणालयाचे संचालक गोसावी यांच्यासह बाबा भांड, मंदा हिंगुराव, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. एकनाथ पगार, आणि डॉ. अशोक राणा यांचा समावेश आहे. ५० खंडांचा मानससमग्र सयाजीराव गायकवाड यांच्या विशाल कार्याला ग्रंथरुपी जगासमोर आणण्यासाठी ५० खंड प्रकाशित करण्याचा मानस आहे. तूर्तास २५ खंडांचे काम पूर्ण झाले असून, पुढील खंडांसाठी शासनाकडे मागणी करण्यात येईल.- बाबा भांड, सदस्य सचिव, महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती

टॅग्स :literatureसाहित्यAurangabadऔरंगाबाद