शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न म्हणजे भगतसिंग यांचा अपमान : कन्हैयाकुमार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 16:47 IST

नकारात्मक राजकारणाची भडकलेली आग विझवा

ठळक मुद्देताकद लोकसंख्येवरून मोजली जात नाही. वैचारिक पातळीवर ती अवलंबून असते. नेमके निवडणुकीतच कसे अस्मितेचे, भावनेचे प्रश्न निर्माण केले जातात

औरंगाबाद : ‘निवडणूक ही एक संधी आहे. मंदिर, मशीद, हिंदू- मुस्लिम असा  वादाचा हा मुद्दा नाही. दिवसेंदिवस नकारात्मकतेची आग वाढत चालली आहे. ती आग या निवडणुकीच्या माध्यमातून बुजवा’ असे आवाहन आज येथे पुरोगामी विचारांचे युवा नेते कॉ. कन्हैयाकुमार यांनी केले. ते आमखास मैदानावर भाकप व डाव्या लोकशाही आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. अभय टाकसाळ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

भाकपची ताकद किती असा सवाल विचारणाऱ्यांचा त्यांनी समाचार  घेतला. ते म्हणाले, ताकद लोकसंख्येवरून मोजली जात नाही. वैचारिक पातळीवर ती अवलंबून असते. भाकपची ताकद काल होती, आज आहे आणि उद्याही राहील (टाळ्या) ३५ जिव्हाळ्याचे मुद्दे घेऊन मी ही निवडणूक लढवत आहे. निवडून येईल न येईल; पण या मुद्यांसाठी माझी रस्त्यावरची लढाई चालूच राहील, अशी ग्वाही यावेळी उमेदवार टाकसाळ यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिली.

या सभेत एस. जी. शुत्तारी, कॉ. भगवान भोजने, अ‍ॅड. जनार्दन भोवते, साथी सुभाष लोमटे, कॉ. अश्फाक सलामी, आसाराम लहाने पाटील, कॉ. बुद्धप्रिय कबीर आदींची भाषणे झाली. कॉ. भास्कर लहाने यांनी सूत्रसंचालन केले, तर शेवटी कॉ. राम बाहेती यांनी आभार मानले. मंचावर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. मनोहर टाकसाळ, अण्णा खंदारे, कॉ. पंडित मुंढे यांच्यासह नेते इत्यादी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सभेपूर्वी कन्हैयाकुमार रॅलीने सभास्थानी आले.

भगतसिंगांचा अपमानस्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न म्हणजे भगतसिंग यांचा अपमान होय. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती आणि देशासाठी भगतसिंग फासावर गेले होते. दोघे एकाच तराजूत तोलले जाऊ शकत नाहीत, असा टोला कन्हैयाकुमार यांनी लगावला.नेमके निवडणुकीतच कसे अस्मितेचे, भावनेचे प्रश्न निर्माण केले जातात, याचे हे उदाहरण होय, असेही ते म्हणाले. रॅलीत सावरकर चौक लागले. तिथे खड्डेच खड्डे. हे साधे खड्डे न बुजवू शकत नाहीत. अन् सावरकरांना भारतरत्न देऊ म्हणताच हंशा नि टाळ्या झाल्या. 

मग निवडणूक घ्यायची काय गरज?  महाराष्टÑात पुन्हा भाजपचे सरकार येणार आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत, असा प्रचार सुरू आहे, असे असेल, तर मग निवडणूकच घ्यायची काय गरज? निवडणूक न घेतल्याने तेवढा खर्च तरी वाचेल ना? लोकशाहीत पंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदार आणि आमदार लोक ठरवत असतात; पण प्रचारतंत्र असे वापरले जात आहे की, खोटेही खरे वाटावे. निवडणुकीत तुम्ही जीवनमरणाचे प्रश्नच विसरावेत, असा प्रयत्न होत आहे, असे परखड मत कन्हैयाकुमार यांनी यावेळी मांडले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यkanhaiya kumarकन्हैय्या कुमार