शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

Maharashtra Election 2019 : धक्कादायक ! मतदानापूर्वीच औरंगाबाद शहर झाले 'कॉंग्रेस मुक्त'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 17:12 IST

शहरात कॉंग्रेसचा अधिकृत उमेदवार उरला नसल्याने पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

ठळक मुद्दे'अवैध अर्जा'विरुद्धची याचिका उमेदवाराने मागे घेतली

औरंगाबाद : उमेदवारी अर्ज छाननीत बाद केल्याच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयास पश्चिम मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रमेश गायकवाड यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. या याचिकेवर सोमवारी कामकाज सुरु होताच सुनावणी घेण्यात आली. दुपारी त्यांच्या याचिकेवर एक सदस्यीय खंडपीठाची सुनावणी सुरु असताना गायकवाड यांनी त्यांची याचिका मागे घेतली. शहरात कॉंग्रेसचा अधिकृत उमेदवार उरला नसल्याने पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. 

रमेश गायकवाड यांनी अपक्ष आणि काँग्रेसतर्फे असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांचे दोन्ही अर्ज छाननीत बाद झाले.  उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा आदेश देण्याची विनंती त्यांनी खंडपीठाकडे केली. रविवारी सुटी असताना न्या. संजय गंगापूरवाला व न्या. ए.एस. किलोर यांच्या खंडपीठाने याचिका दाखल करून घेतली. सोमवारी सकाळी याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. यानंतर त्यांची याचिका एक सदस्यीय खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली. दुपारी सुनावणी दरम्यान गायकवाड यांनी याचिका मागे घेतली. यासोबतच गंगापूरचे मनसेचे उमेदवार अधिकारी यांनीसुद्धा  याचिका दाखल केली होती.

औरंगाबाद शहर 'कॉंग्रेस मुक्त'काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत जिल्ह्यातील ९ जागांपैकी काँग्रेसच्या वाट्याला औरंगाबाद पश्चिम, फुलंब्री व सिल्लोड या ३ जागा आल्या. त्यातील पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रमेश गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज छाननीतच बाद झाला. यानंतर याविरुद्ध केलेली याचिका मागे घेतली. यामुळे शहरात कॉंग्रेसचा एकही अधिकृत उमेदवार राहिला नाही. दरम्यान, औरंगाबाद पश्चिम मधून कॉंग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केली आहेत. यातील एकाला कॉंग्रेस आपला पाठिंबा घोषित करू करेल असा अंदाज आहे. 

जिल्ह्यात कॉंग्रेसतर्फे दोनच उमेदवार उरले काँग्रेसला या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या वाट्याला आलेल्या ४ जागांवर उमेदवार देणेही जमले नाही. २०१४ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व ९ जागांवर काँग्रेसने उमेदवार दिले होते. यंदा आघाडीत चार जागा काँग्रेसला मिळाल्या. त्यातील औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ काँग्रेसने आघाडीतील घटक पक्ष समाजवादीला सोडला. त्यामुळे औरंगाबाद पश्चिम, फुलंब्री व सिल्लोड मतदारसंघातून काँग्रेसने अनुक्रमे रमेश गायकवाड, डॉ. कल्याण काळे व कैसर आझाद यांना उमेदवारी दिली. त्यातील रमेश गायकवाड यांचा उमेदवार अर्ज छाननीत बाद झाला. आता फक्त डॉ. काळे व आझाद हे दोनच उमेदवार रिंगणात उरले आहेत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिम