शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद मध्य : १४ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रामध्ये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 14:02 IST

Maharashtra Election 2019 : ६ ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना

ठळक मुद्देसरासरी ६० टक्के मतदान

औरंगाबाद : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातील १४ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. मतदारसंघातील ३२४ पैकी सहा मतदान केंद्रांवर ईव्हीएम, व्हीव्हीपॅट बंद पडण्याच्या घटना घटल्या. त्यामुळे अर्धा तास मतदारांना वाट पाहावी लागली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे यांनी सांगितले. 

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांमध्ये प्रचंड निरुत्साह पाहायला मिळाला. दुपारी १ वाजेनंतर मतदान केंद्रांवर रांगा लागल्या. हर्सूल गावातील कोलठाणवाडी रोडवरील एकनाथ विद्यामंदिरात मतदान केंद्र होते. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे रस्ता चिखलमय झाला. तब्बल एक किलोमीटर चिखल तुडवत मतदारांना ये-जा करावी लागत होती, तरीही मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. हर्सूलमधील मनपाच्या शाळेतील चारही केंद्रांवर लांबचलांब रागा होत्या. दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी २५ टक्के मतदान झाले होते.

मध्य मतदारसंघातील मुस्लिमबहुल भागातील मतदान केंद्रांवर फारशी गर्दी दिसून आली नाही. महानगरपालिकेच्या मुख्यालयातील चार आणि टप्पा क्रमांक तीनमधील इमारतीतील चार अशा आठ मतदान केंद्रांवर दुपारी दीड वाजेपर्यंत सरासरी २० टक्के मतदान झाले होते. मध्य मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिलचेअरची व्यवस्था केली होती. नवीन व्हिलचेअरमध्ये दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घेऊन जात होते. शहरातील विविध मतदान केंद्रांवर बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारी थोड्या थोड्या वेळाने पोलिसांकडे प्राप्त होत्या. आमखास मैदानावरील सिटी क्लब येथील मतदान केंद्रावर अर्धा तास याच वादावरून मतदान थांबविण्यात आले होते.

सखी मतदान केंद्र मध्य मतदारसंघात दोन सखी मतदान केंद्रे होती. एम.पी. लॉ कॉलेज आणि छावणीतील पी.ई.एस. अभियांत्रिकी महाविद्यालय या दोन्ही मतदान केंद्रांवर उत्साहात मतदान झाले. एमपी लॉ कॉलेजमध्ये सखी मतदान केंद्रावर दुपारी ४ वाजेपर्यंत ८९१ मतदारांपैकी ४६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

औरंगाबाद मध्यमध्ये असा वाढला मतदानाचा टक्कासकाळी ७ ते ९ वाजता    :    ६.४८ टक्केसकाळी ९ ते ११ वाजता    :    १७.५८  टक्केदुपारी ११ ते १ वाजता    :    ३१.१५ टक्के दुपारी १ ते ३ वाजता    :    ४३.२२ टक्के सायंकाळी ३ ते ५ वाजता    :    ५४.८७ टक्के सायंकाळी ५ ते ६ वाजता    :    ५९.५० टक्के 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यVotingमतदान