शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

महाबीजला मंचाचा ‘झटका’

By admin | Updated: July 9, 2014 00:28 IST

लोहारा : महाबीजचे तुरीचे बियाणे सदोष निघाल्याप्रकरणी लोहारा तालुक्यातील शेतकऱ्याने लातूर येथील जिल्हा ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल केली होती.

लोहारा : महाबीजचे तुरीचे बियाणे सदोष निघाल्याप्रकरणी लोहारा तालुक्यातील शेतकऱ्याने लातूर येथील जिल्हा ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यावर मंचाने शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय दिला होता. परंतु, महाबीजने या निर्णयाविरूद्ध औरंगाबाद विभागीय मंचाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, येथेही महाबीजच्या खात्यात निराशाच पडली. लातूर ग्राहक मंचाचा निकाल कायम ठेवत शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.भातागळी येथील शेतकरी अमोल बस्वणप्पा ओंबाडकर यांनी १० जून २००७ रोजी लातूर येथील अंबिका फर्र्टिलायझर्स यांच्याकडून महाबीज अकोला यांचे तुरीचे बियाणे खरेदी केले होते. जवळपास तीन बॅग बियाण्याची दोन हेक्टरवर पेरणी केली होती. दरम्यानच्या काळात बियाण्याची उगवणही चांगली झाली. पीकही जोमदार आले. चांगली प्रकारे फुलेही लागली होती. मात्र, ती लाल आणि पिवळ्या रंगाची होती. त्यामुळे सदरील बियाणे सदोष असल्याची तक्रार जिल्हा बियाणे तक्रार चौकशी समितीकडे केली. त्यानुसार समितीच्या सदस्यांनी १७ नोव्हेंबर २००७ रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे सांगून १ डिसेंबर रोजी तुरीच्या पिकाची पाहणी करण्यासाठी बोलावण्यात आले होते. परंतु, महाबीज आणि अंबिका फर्टिलायझर्सचे कोणीही हजर राहिले नाही. यावेळी पाहणीमध्ये तुरीचे बियाणे सदोष असल्याचे आढळून आले. त्यानुसार अहवालही सादर करण्यात आला. तुरीच्या काढणीनंतर पिकाचा पंचनामा करण्यात आला. निघालेल्या तुरीचे वजन ११ क्विंटल २५ किलो इतके भरले. शेतकरी ओंबाडकर यांची जमीन चांगल्या प्रतीची असल्यामुळे त्यांना प्रतिकिलो ४ क्विंटल २ किलो असा उतारा मिळणे आवश्यक होते. मात्र त्यांना साडेचौदा क्विंटल कमी उत्पन्न मिळाले. याप्रकरणी त्यांनी लातूर येथील ग्राहकमंचाकडे तक्रार नोंदविली होती. मंचासमोर आलेले साक्षी पुरावे लक्षात घेऊन ग्राहक मंचाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. नुकसान भरपाईपोटी २० हजार रुपये ९ टक्के व्याजदराने तीस दिवसाच्या आत देण्याचे आदेश दिले होते. तसेच मानसिक त्रासापोटी दोन हजार रुपये, तक्रारी अर्जाचा खर्च एक हजार रुपये असे तीन हजार रुपये देण्याबाबतही आदेशात नमूद केले होते. या निर्णयाविरुद्ध महाबीज अकोला यांनी विभागीय ग्राहक मंच औरंगाबाद यांच्याकडे अपील केले. मात्र याही कार्यालयाने लातूर ग्राहक मंचाचाच निर्णय जैसे थे ठेवला आहे. त्यामुळे महाबीजसाठी हा एक प्रकारचा झटका मानला जात असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जवळपास ७ वर्षानंतर संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळाला आहे. (वार्ताहर)