शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

महाबीजला मंचाचा ‘झटका’

By admin | Updated: July 9, 2014 00:28 IST

लोहारा : महाबीजचे तुरीचे बियाणे सदोष निघाल्याप्रकरणी लोहारा तालुक्यातील शेतकऱ्याने लातूर येथील जिल्हा ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल केली होती.

लोहारा : महाबीजचे तुरीचे बियाणे सदोष निघाल्याप्रकरणी लोहारा तालुक्यातील शेतकऱ्याने लातूर येथील जिल्हा ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यावर मंचाने शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय दिला होता. परंतु, महाबीजने या निर्णयाविरूद्ध औरंगाबाद विभागीय मंचाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, येथेही महाबीजच्या खात्यात निराशाच पडली. लातूर ग्राहक मंचाचा निकाल कायम ठेवत शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.भातागळी येथील शेतकरी अमोल बस्वणप्पा ओंबाडकर यांनी १० जून २००७ रोजी लातूर येथील अंबिका फर्र्टिलायझर्स यांच्याकडून महाबीज अकोला यांचे तुरीचे बियाणे खरेदी केले होते. जवळपास तीन बॅग बियाण्याची दोन हेक्टरवर पेरणी केली होती. दरम्यानच्या काळात बियाण्याची उगवणही चांगली झाली. पीकही जोमदार आले. चांगली प्रकारे फुलेही लागली होती. मात्र, ती लाल आणि पिवळ्या रंगाची होती. त्यामुळे सदरील बियाणे सदोष असल्याची तक्रार जिल्हा बियाणे तक्रार चौकशी समितीकडे केली. त्यानुसार समितीच्या सदस्यांनी १७ नोव्हेंबर २००७ रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे सांगून १ डिसेंबर रोजी तुरीच्या पिकाची पाहणी करण्यासाठी बोलावण्यात आले होते. परंतु, महाबीज आणि अंबिका फर्टिलायझर्सचे कोणीही हजर राहिले नाही. यावेळी पाहणीमध्ये तुरीचे बियाणे सदोष असल्याचे आढळून आले. त्यानुसार अहवालही सादर करण्यात आला. तुरीच्या काढणीनंतर पिकाचा पंचनामा करण्यात आला. निघालेल्या तुरीचे वजन ११ क्विंटल २५ किलो इतके भरले. शेतकरी ओंबाडकर यांची जमीन चांगल्या प्रतीची असल्यामुळे त्यांना प्रतिकिलो ४ क्विंटल २ किलो असा उतारा मिळणे आवश्यक होते. मात्र त्यांना साडेचौदा क्विंटल कमी उत्पन्न मिळाले. याप्रकरणी त्यांनी लातूर येथील ग्राहकमंचाकडे तक्रार नोंदविली होती. मंचासमोर आलेले साक्षी पुरावे लक्षात घेऊन ग्राहक मंचाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. नुकसान भरपाईपोटी २० हजार रुपये ९ टक्के व्याजदराने तीस दिवसाच्या आत देण्याचे आदेश दिले होते. तसेच मानसिक त्रासापोटी दोन हजार रुपये, तक्रारी अर्जाचा खर्च एक हजार रुपये असे तीन हजार रुपये देण्याबाबतही आदेशात नमूद केले होते. या निर्णयाविरुद्ध महाबीज अकोला यांनी विभागीय ग्राहक मंच औरंगाबाद यांच्याकडे अपील केले. मात्र याही कार्यालयाने लातूर ग्राहक मंचाचाच निर्णय जैसे थे ठेवला आहे. त्यामुळे महाबीजसाठी हा एक प्रकारचा झटका मानला जात असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जवळपास ७ वर्षानंतर संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळाला आहे. (वार्ताहर)