शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

‘महाबीज’ परत घेणार बियाणे !

By admin | Updated: July 30, 2015 00:44 IST

उस्मानाबाद : खरीप हंगामात चांगला पाऊस होईल, या आशेवर बिजोत्पादनासाठी कर्ज व उसनवारी करून महाबीज कंपनीचे बियाणे खरेदी केले.

उस्मानाबाद : खरीप हंगामात चांगला पाऊस होईल, या आशेवर बिजोत्पादनासाठी कर्ज व उसनवारी करून महाबीज कंपनीचे बियाणे खरेदी केले. परंतु, पावसाने दडी मारल्याने या महागड्या बियाण्याचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सदरील बियाणे ‘महाबीज’ने परत घ्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत होती. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीही बियाणे महामंडळाकडे हा प्रश्न मांडला होता. त्यानुसार १ आॅगस्टपासून बियाणे घेऊन पैसे परत करण्यात येणार आहेत. मागील दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्यात सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. यंदाही विक्रमी पेरा होईल, असा अंदाज कृषी विभागाने बांधला होता. त्यानुसार महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी बिजोत्पादनासाठी सोयाबीन बियाणे खरेदी केले आहे. बाजारात मिळणाऱ्या अन्य कंपन्यांच्योे बियाण्याच्यो तुलनेत हे बियाणे महागडे आहे. या बियाण्याची पेरणी केल्यानंतर उत्पादित बियाण्याची विक्री महाबीजला केली जाते. त्यामुळे तुलनेत दरही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी महाबीजच्या येथील कार्यालयात बियाणांची खरेदी केली आहे. उत्पादन चांगले होईल आणि आर्थिक फायदाही होईल, असे आर्थिक गणित जुळविले होते. अनेक शेतकऱ्यांनी प्रसंगी कर्ज काढून बियाणे खरेदी केले. परंतु जुलै महिना संपत आला तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने सोयाबीन बियाणाचे करायचे तरी काय? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. दुबार पेरणीची शक्यताही दुसर झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे हे बियाणे महाबीजने घेवून शेतकऱ्यांना पैसे परत द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. त्याचप्रमाणे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीही २९ जुलै रोजी महाबीजचे महाव्यवस्थापक उनाळे यांच्याशी चर्चा केली होती. शेतकऱ्यांकडील बियाणे परत न घेतल्यास त्याचा फटका बसेल. त्यामुळे हे बियाणे परत घ्यावे. इनस्पेक्शनची फीस परत करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यावर महाबीजने सकारात्मक भूमिका घेत १ आॅगस्टपासून शेतकऱ्यांचे बियाणे परत घेऊन त्यांना पैसे परत केले जातील, असे आश्वासन दिले आहे. तसे आदेश येथील कार्यालयास निर्गमित केले असल्याचे राष्ट्रवादीचे सरचिटणीस रामचंद्र पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. ज्यांना बियाणे परत करायचे असेल अशा शेतकऱ्यांनी महाबीजच्या कार्यालयात अर्ज देऊन त्याची पोच घ्यावी, असेही त्यात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)