शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महाधरणे आंदोलनातून एमआयएम गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:07 IST

औरंगाबाद : देशभरात गोरक्षकांकडून होत असलेले हल्ले थांबावेत या उद्देशाने मुस्लिम आरक्षणासाठी ऐतिहासिक मोर्चा काढणाºया ‘महाराष्टÑ अवामी मुस्लिम कमिटी, औरंगाबादतर्फे शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर महाधरणे आंदोलनाचे आयोजन केले होते

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशभरात गोरक्षकांकडून होत असलेले हल्ले थांबावेत या उद्देशाने मुस्लिम आरक्षणासाठी ऐतिहासिक मोर्चा काढणाºया ‘महाराष्टÑ अवामी मुस्लिम कमिटी, औरंगाबादतर्फे शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर महाधरणे आंदोलनाचे आयोजन केले होते. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व उर्दू दैनिकांनी पान भरून या उपक्रमाचे कौतुक केले. त्यासोबतच मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षावर अत्यंत बोचरी टीका करण्यात आली आहे. या महाधरणे आंदोलनात एमआयएमचे पदाधिकारी तर सोडा कार्यकर्तेही गायब होते, अशी टीका ‘औरंगाबाद टाइम्स’ या दैनिकाने केली आहे.औरंगाबाद टाइम्सने महाधरणे आंदोलनाची मुख्य बातमी छायाचित्रासह प्रसिद्ध केली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रतापगढहून आलेले प्रसिद्ध शायर इम्रान प्रतापगढी यांच्या देशप्रेम आम्हाला कोणी शिकविण्याची गरज नाही...या विधानाला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले आहे. त्याचप्रमाणे मौलाना तौकीर रजा यांनी कार्यक्रमात नमूद केले होते की, मुसलमान खरोखरच मुसलमान बनला तर कोणीच त्यांच्यावर हल्ले करू शकणार नाही, या विधानालाही औरंगाबाद टाइम्सने ठळक प्रसिद्धी दिली आहे. मुस्लिमांच्या संयमाचा बांध फुटला तर या देशातील परिस्थिती आटोक्यात येणार नाही, असा इशाराही रजा यांनी दिल्याचे वर्तमानपत्रात नमूद आहे.राष्टÑवादीचे प्रवक्ता तथा प्रसिद्ध वक्ते प्रदीप सोळुंके यांनाही व्यापक प्रसिद्धी देण्यात आली आहे. प्रत्येक आतंकवादी मुस्लिम का...या प्रश्नाचे उत्तर देताना साळुंके यांनी नमूद केले की, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना मारणारे मुस्लिम होते का...असा प्रश्न उपस्थित केला. या विधानालाही प्रसिद्धी मिळाली.