शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

विषयपत्रिका फाडल्या, अध्यक्षांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:00 IST

गील सभेत अर्थसंकल्पात सूचविलेल्या बदलांचा कार्यवृत्तांतात समावेश न केल्यामुळे विरोधी सदस्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अभूवपूर्व गोंधळ घातला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मागील सभेत अर्थसंकल्पात सूचविलेल्या बदलांचा कार्यवृत्तांतात समावेश न केल्यामुळे विरोधी सदस्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अभूवपूर्व गोंधळ घातला. अध्यक्षांसमोरच विषय पत्रिका फाडून सभागृहात भिरकावल्या. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षांनी सभा आटोपती घेत गोंधळात सर्व ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले. यामुळे आणखीच आक्रमक झालेल्या विरोधी सदस्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षांना दीड तास घेराव घातला.जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी तीन वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेस सुरुवात झाली. या वेळी उपाध्यक्ष सतीश टोपे, सभापती रघुनाथ तौर, दत्ता बनसोडे, सुमन घुगे, जिजाबाई कळंबे, मुख्याधिकारी दीपक चौधरी, अतिरिक्त मु्ख्यकार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, लेखाधिकारी उत्तम चव्हाण, उपमुख्यकार्यकारी अधिकारी निखील ओसवाल यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती.सभेच्या सुरुवातीलाच विरोधी सदस्य शालिग्राम म्हस्के व अवधूत खडके यांनी अनुपालन अहवाल अगोदर का दिला नाही, हा मुद्दा उपस्थित केला. मागील सभेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेचा कार्यवृत्तांतात सविस्तर उल्लेख न करता अर्धवट मांडणी करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी बजेट कमी करण्याचे सूचविले होते, तिथे वाढविण्यात आले असल्याचा आरोप राहुल लोणीकर यांनी केला. याच मुद्यावरून अन्य विरोधी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली.कार्यवृत्तांत तयार करणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी शालिग्राम म्हस्के यांनी केली. त्यावर उपाध्यक्ष सतीश टोपे यांनी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्पाबाबत मागच्या सभेत आठ तास चर्चा झाली आहे. आता पुन्हा त्याच विषयावर न बोलता विषय पत्रिकेवर चर्चा करण्याच्या सूचना टोपे यांनी केल्या. अध्यक्ष खोतकर यांनी विरोधी सदस्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत विषय पत्रिकेवर चर्चा करण्याचे आवाहन केले.मात्र, ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेले सर्वच विरोधी सदस्य थेट सभागृहातील मोकळ्या जागेत येऊन त्यांनी ठिय्या दिला. आशा पांडे, गंगा पिंगळे यांनी आक्रमक भूमिका घेतली. राहुल लोणीकर, शालिग्राम म्हस्के व अवधूत खडके याच मुद्यावर अध्यक्षांशी चर्चा करत असताना अन्य सदस्यांनी विषय पत्रिका फाडून हवेत सभागृहात भिरकावल्या. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. विरोधी सदस्य सभागृहाचे कामकाज चालू देण्याच्या मनस्थितीत नाही, ही बाब लक्षात आल्यानंतर अध्यक्षांनी विषय पत्रिकेवरील ठराव वाचण्यास सुरुवात केली.विरोधी सदस्य वगळता शिवसेना व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सर्व ठराव मंजूर असल्याचे सांगितले. या प्रकारामुळे विरोधीबाकांवरील सदस्यांनी आणखी आक्रमक भूमिका घेतल्याने गोंधळात भर पडली. शेवटी गोंधळाच्या वातावरणातच सर्व ठराव मंजूर झाल्याचे जाहीर करत सभा संपल्याचे अध्यक्ष खोतकर यांनी जाहीर केले. दरम्यान, सभेच्या सुरुवातीला स्व. बद्रीनारायण बारवाले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर भाजपच्या वतीने राष्ट्रपतीपदी रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.