शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मासुर्डी ग्रामस्थांकडून ‘लोकमत’ चे आभार !

By admin | Updated: March 26, 2016 00:54 IST

रमेश शिंदे , औसा दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या मासुर्डी गावच्या दु:खांना वाचा फोडली ती ‘लोकमत’ने. आम्ही शासन दरबारी हेलपाटे मारुनही आमचे गाऱ्हाणे कुणी ऐकत नव्हते.

रमेश शिंदे , औसादुष्काळाच्या खाईत सापडलेल्या मासुर्डी गावच्या दु:खांना वाचा फोडली ती ‘लोकमत’ने. आम्ही शासन दरबारी हेलपाटे मारुनही आमचे गाऱ्हाणे कुणी ऐकत नव्हते. सांगायचे तर कुणाला सांगायचे ? या पेचात असतानाच जर ‘लोकमत’ची टिम आमच्या गावात ‘आॅन दि स्पॉट’ रिपोर्र्टींगसाठी आली आणि आमच्या गावचे पांग फिटले. आमच्या वेदना केवळ ‘लोकमत’ने मांडल्यानेच आमचे गाव खा. संजय काकडे यांनी दत्तक घेतले, अशा शब्दात मासुर्डीच्या ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे आभार मानले. ‘लोकमत’ च्या चमुने आॅन द स्पॉट ‘मुक्काम पोस्ट मासुर्डी’ या सचित्र वृत्तांकनातून २४ मार्च रोजी च्या अंकात प्रकाश टाकला़ यासाठी ‘लोकमत’च्या तीन कर्मचाऱ्यांची टीम मासुर्डीत होती. गावात एका टेलरच्या दुकानात मुक्काम ठोकलेल्या या टिमने संपूर्ण गाव पिंजून काढले. १०० हून अधिक माणसांशी चर्चा केल्या. ४० हून अधिक घरांना भेटी दिल्या. ३० शेतकऱ्यांच्या शिवारावर जाऊन पाहणी केली. यानंतर तहानलेल्या मासुर्डीचे वास्तव चित्र महाराष्ट्रासमोर आणले. हे वाचूनच अस्वस्थ झालेल्या खा. संजय काकडे यांनी हे गाव दत्तक घेतले़ तसेच ५० लाख निधी घोषित केला़‘लोकमत’च्या या उपक्रमाबद्दल गावकऱ्यांनी केलेले ‘लोकमत’चे अभिनंदन त्यांच्याच शब्दात. ‘लोकमत’ने मासुर्डीच्या प्रश्नांना दुसऱ्यांदा प्रकाशात आणले. यापूर्वी ‘टँकरसाठी रात्रभर जागे राहते गाव’ अशी बातमी दोन वर्षापूर्वी केली होती. यानंतर राज्यातील साऱ्या वाहीन्यांच्या प्रतिनिधींनी याचे वृत्तांकन केले आणि आमचा प्रश्न प्रकाशात आणला. आता दुसऱ्यांदा ‘लोकमत’ची टिम मासुर्डीत आली आणि गाव दत्तक गेले. ‘लोकमत’मुळे जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळ भोगणाऱ्या मासुर्डीच्या व्यथा प्रकाशात आल्याच्या भावना नागरिकांनी मांडल्या. अहो, कोण ऐकतय आमचं गाऱ्हाणं. २०१४ ला तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी सगळीकडे टँकरसाठी फिरलो. कुणी दाद देत नव्हते. शेवटी मतदानावर बहिष्काराचे हत्यार काढले तेव्हा कुठे टँकर मिळाला. आताही आमचा आवाज कुणीच ऐकत नव्हते. केवळ ‘लोकमत’मुळे आमच्या दु:खाला वाचा फोडली - बाळासाहेब काळे, मा़ चेअरमन, सोसायटी‘लोकमत’ची टिम आमच्या गावात २४ तास होती़ टिम गावात असताना कांही तरी असेल असे वाटले़ पण प्रत्यक्षात जेव्हा २४ मार्चचा ‘लोकमत’ बघितला तेव्हा त्यांनी आमच्या गावाला जगासमोर आणल्याचे लक्षात आले़ त्यांच्या या बातमीमुळे आमच्या गावातील समस्यांची महाराष्ट्रात चर्चा झाली आणि संजय काकडे यांनी आमचे गाव दत्तक घेतले़ शिवाय ई-पेपरमुळे जगभरातील लोकांपर्यंत पोहोचले.- राहूल आळणे, व्हा़ चेअरमन