शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

यंदा सर्वांत कमी पाऊस

By admin | Updated: August 11, 2014 00:18 IST

दिनेश गुळवे बीड गेल्या पाच वर्षांत झाला नव्हता इतका अल्प पाऊस यावर्षी जिल्ह्यात पडला आहे.

दिनेश गुळवे बीडगेल्या पाच वर्षांत झाला नव्हता इतका अल्प पाऊस यावर्षी जिल्ह्यात पडला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३५० मि.मी. पाऊस पडणे अपेक्षीत होते. मात्र, सध्या केवळ १३५ ते १४० मि.मी. पाऊस पडल्याने शेतकऱ्यांसह सर्वच हतबल झाले आहेत. परिणामी जिल्ह्यात अद्यापही दोनशेपेक्षा अधिक टॅँकर सुरू आहेत. तसेच जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्र्षांपासून सतत दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांसमोर कधी दुष्काळ तर कधी गारपीटग्रस्त म्हणून संकट उभे असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातोे. जिल्ह्यात २०१२ सालीही मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला होता. तर, २०१३ मध्येही अशीच परिस्थिती असल्याने जिल्ह्यात पाचशेपेक्षा अधिक टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. जनावरांसाठी चाराप्रश्न मोठ्या प्रमाणावर असल्याने ४० पेक्षा अधिक ठिकाणी छावण्या सुरू केल्या होत्या. आतापर्यंत अल्प पाऊस झाला असला तरी या पावसावर सहा लाख २० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रांवर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेऊन बियाणांसह मशागत, खत, फवारणी यावर मोठा खर्च केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च केला, आता मात्र पाऊसच नसल्याने भविष्यात काय होईल? याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज ढग येतात, पाऊस मात्र वारंवार हुलकावणी देत आहे.२०१० मध्ये ४५९ मि.मी, २०११ मध्ये ३९० मि.मी., २०१२ मध्ये १७९ मि.मी., २०१३ मध्ये ३८९ मि.मी. पाऊस झाला होता, तर यावर्षी आतापर्यंत (९ आॅगस्ट) केवळ १४० मि.मी. पाऊस झाला आहे. ही पावसाची सरासरी जिल्ह्याची असली तर अनेक मंडळांमध्ये तर परिस्थिती अधिकच भयावह आहे.चारा छावण्या सुरू कराव्यात-आपेटमहाराष्ट्रातील इतर भागात पाऊस पडत असला तरी बीड जिल्ह्यावर पावसाची अवकृपा आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसह इतर मशागतीवर हजारो रुपये खर्च केला आहे. मात्र, पाऊसच पडत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे. अशा परिस्थितीत जनावरांना कसे जगवावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांवर असे अस्मानी संकट आल्याने शासनाने शेतकऱ्यांना रोख आर्थिक मदत करावी व चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख कालीदास आपेट यांनी केली आहे.