शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
2
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
3
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
4
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
5
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
6
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
7
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
8
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
9
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
10
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
11
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
12
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
13
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
14
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
15
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
16
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
17
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
18
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
19
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
20
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  

यंदा सर्वांत कमी पाऊस

By admin | Updated: August 11, 2014 00:18 IST

दिनेश गुळवे बीड गेल्या पाच वर्षांत झाला नव्हता इतका अल्प पाऊस यावर्षी जिल्ह्यात पडला आहे.

दिनेश गुळवे बीडगेल्या पाच वर्षांत झाला नव्हता इतका अल्प पाऊस यावर्षी जिल्ह्यात पडला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३५० मि.मी. पाऊस पडणे अपेक्षीत होते. मात्र, सध्या केवळ १३५ ते १४० मि.मी. पाऊस पडल्याने शेतकऱ्यांसह सर्वच हतबल झाले आहेत. परिणामी जिल्ह्यात अद्यापही दोनशेपेक्षा अधिक टॅँकर सुरू आहेत. तसेच जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्र्षांपासून सतत दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांसमोर कधी दुष्काळ तर कधी गारपीटग्रस्त म्हणून संकट उभे असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातोे. जिल्ह्यात २०१२ सालीही मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला होता. तर, २०१३ मध्येही अशीच परिस्थिती असल्याने जिल्ह्यात पाचशेपेक्षा अधिक टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. जनावरांसाठी चाराप्रश्न मोठ्या प्रमाणावर असल्याने ४० पेक्षा अधिक ठिकाणी छावण्या सुरू केल्या होत्या. आतापर्यंत अल्प पाऊस झाला असला तरी या पावसावर सहा लाख २० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रांवर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेऊन बियाणांसह मशागत, खत, फवारणी यावर मोठा खर्च केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च केला, आता मात्र पाऊसच नसल्याने भविष्यात काय होईल? याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज ढग येतात, पाऊस मात्र वारंवार हुलकावणी देत आहे.२०१० मध्ये ४५९ मि.मी, २०११ मध्ये ३९० मि.मी., २०१२ मध्ये १७९ मि.मी., २०१३ मध्ये ३८९ मि.मी. पाऊस झाला होता, तर यावर्षी आतापर्यंत (९ आॅगस्ट) केवळ १४० मि.मी. पाऊस झाला आहे. ही पावसाची सरासरी जिल्ह्याची असली तर अनेक मंडळांमध्ये तर परिस्थिती अधिकच भयावह आहे.चारा छावण्या सुरू कराव्यात-आपेटमहाराष्ट्रातील इतर भागात पाऊस पडत असला तरी बीड जिल्ह्यावर पावसाची अवकृपा आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसह इतर मशागतीवर हजारो रुपये खर्च केला आहे. मात्र, पाऊसच पडत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे. अशा परिस्थितीत जनावरांना कसे जगवावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांवर असे अस्मानी संकट आल्याने शासनाने शेतकऱ्यांना रोख आर्थिक मदत करावी व चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख कालीदास आपेट यांनी केली आहे.