शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

यंदा सर्वांत कमी पाऊस

By admin | Updated: August 11, 2014 00:18 IST

दिनेश गुळवे बीड गेल्या पाच वर्षांत झाला नव्हता इतका अल्प पाऊस यावर्षी जिल्ह्यात पडला आहे.

दिनेश गुळवे बीडगेल्या पाच वर्षांत झाला नव्हता इतका अल्प पाऊस यावर्षी जिल्ह्यात पडला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३५० मि.मी. पाऊस पडणे अपेक्षीत होते. मात्र, सध्या केवळ १३५ ते १४० मि.मी. पाऊस पडल्याने शेतकऱ्यांसह सर्वच हतबल झाले आहेत. परिणामी जिल्ह्यात अद्यापही दोनशेपेक्षा अधिक टॅँकर सुरू आहेत. तसेच जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्र्षांपासून सतत दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांसमोर कधी दुष्काळ तर कधी गारपीटग्रस्त म्हणून संकट उभे असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातोे. जिल्ह्यात २०१२ सालीही मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला होता. तर, २०१३ मध्येही अशीच परिस्थिती असल्याने जिल्ह्यात पाचशेपेक्षा अधिक टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. जनावरांसाठी चाराप्रश्न मोठ्या प्रमाणावर असल्याने ४० पेक्षा अधिक ठिकाणी छावण्या सुरू केल्या होत्या. आतापर्यंत अल्प पाऊस झाला असला तरी या पावसावर सहा लाख २० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रांवर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९०० कोटींपेक्षा अधिक रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेऊन बियाणांसह मशागत, खत, फवारणी यावर मोठा खर्च केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च केला, आता मात्र पाऊसच नसल्याने भविष्यात काय होईल? याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज ढग येतात, पाऊस मात्र वारंवार हुलकावणी देत आहे.२०१० मध्ये ४५९ मि.मी, २०११ मध्ये ३९० मि.मी., २०१२ मध्ये १७९ मि.मी., २०१३ मध्ये ३८९ मि.मी. पाऊस झाला होता, तर यावर्षी आतापर्यंत (९ आॅगस्ट) केवळ १४० मि.मी. पाऊस झाला आहे. ही पावसाची सरासरी जिल्ह्याची असली तर अनेक मंडळांमध्ये तर परिस्थिती अधिकच भयावह आहे.चारा छावण्या सुरू कराव्यात-आपेटमहाराष्ट्रातील इतर भागात पाऊस पडत असला तरी बीड जिल्ह्यावर पावसाची अवकृपा आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसह इतर मशागतीवर हजारो रुपये खर्च केला आहे. मात्र, पाऊसच पडत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे. अशा परिस्थितीत जनावरांना कसे जगवावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांवर असे अस्मानी संकट आल्याने शासनाने शेतकऱ्यांना रोख आर्थिक मदत करावी व चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख कालीदास आपेट यांनी केली आहे.