शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

बागायती अनुदानाला खो

By admin | Updated: May 31, 2016 23:14 IST

व्यंकटेश वैष्णव ल्ल बीड बागायती असलेल्या क्षेत्रासाठी हेक्टरी दहा हजार रूपये दुष्काळी अनुदान देण्याची घोषणा फोल ठरली आहे. दुष्काळी अनुदान मंजूर झाल्यानंतर श्रेय लाटणारे सत्ताधारी

व्यंकटेश वैष्णव ल्ल बीडबागायती असलेल्या क्षेत्रासाठी हेक्टरी दहा हजार रूपये दुष्काळी अनुदान देण्याची घोषणा फोल ठरली आहे. दुष्काळी अनुदान मंजूर झाल्यानंतर श्रेय लाटणारे सत्ताधारी याबाबत काहीच बोलत नसल्याने जिल्हयातील शेतकऱ्यांना खोट्या आश्वासनावरच समाधान मानावे लागत आहे.नापिकी व कर्ज बाजारीपणाच्या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याला सरकारचा दुष्काळी अनुदानाच्या रूपाने आधार दिल्याचा बोलबाला सत्ताधाऱ्यांनी केला. बागायती असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रूपये अनुदान देऊ अशी घोषणा तीन महिन्यांपूर्वी सरकारने केली. दुष्काळी अनुदान तीन टप्यात वाटप होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले होते. यामध्ये कोरडवाहूसाठी हेक्टरी साडेसहा हजार, बागायतीसाठी हेक्टरी दहा हजार तर फळ बागांसाठी हेक्टरी अठरा हजाराच्या जवळपास अनुदान देण्याची घोषणा झाली होती. यामध्ये कोरडवाहू असलेले दोन लाख शेतकरी अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. बागायतीच व फळबागांचे दुष्काळी अनुदान आले नसल्याचे जिल्हा प्रशासनातील संबंधीत अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. जिल्ह्यात १३ हजार हेक्टरवर फळबागा आहेत. शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेल्या बागा पाण्याअभावी तोडून टाकाव्या लागल्या. या नुकसानीची भरपाई मिळेल या आशेवर असलेल्या बळीराजाची निराशाच झाली.८५ कोटींची मागणी : असे आहे क्षेत्र...कोरडवाहूनचे दोन लाख शेतकरी दुष्काळापासून वंचित राहिलेले आहेत तर बागायती असलेल्या १ लाख ४३ हजार ६६३ हेक्टर तर जिल्हयात १३ हजार हेक्टर एवढे फळबागाचे क्षेत्र आहे. बीड, धारूर, गेवराई, अंबाजोगाई व परळी तालुक्यात फळबागांचे पाण्याअभावी सरपन झालेले आहे. नुकसानीची भरपाई मात्र शेतकऱ्यांना मिळाली नाही. पावसाळ्याच्या तोंडावर पेरणीसाठी अनुदानाचे पैसे बळीराजाच्या उपयोगी पडले असते, मात्र शासनाकडूनच पैसे मिळत नसल्याने जिल्हा प्रशासनही हतबल आहे.