शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

बागायती अनुदानाला खो

By admin | Updated: May 31, 2016 23:14 IST

व्यंकटेश वैष्णव ल्ल बीड बागायती असलेल्या क्षेत्रासाठी हेक्टरी दहा हजार रूपये दुष्काळी अनुदान देण्याची घोषणा फोल ठरली आहे. दुष्काळी अनुदान मंजूर झाल्यानंतर श्रेय लाटणारे सत्ताधारी

व्यंकटेश वैष्णव ल्ल बीडबागायती असलेल्या क्षेत्रासाठी हेक्टरी दहा हजार रूपये दुष्काळी अनुदान देण्याची घोषणा फोल ठरली आहे. दुष्काळी अनुदान मंजूर झाल्यानंतर श्रेय लाटणारे सत्ताधारी याबाबत काहीच बोलत नसल्याने जिल्हयातील शेतकऱ्यांना खोट्या आश्वासनावरच समाधान मानावे लागत आहे.नापिकी व कर्ज बाजारीपणाच्या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याला सरकारचा दुष्काळी अनुदानाच्या रूपाने आधार दिल्याचा बोलबाला सत्ताधाऱ्यांनी केला. बागायती असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रूपये अनुदान देऊ अशी घोषणा तीन महिन्यांपूर्वी सरकारने केली. दुष्काळी अनुदान तीन टप्यात वाटप होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले होते. यामध्ये कोरडवाहूसाठी हेक्टरी साडेसहा हजार, बागायतीसाठी हेक्टरी दहा हजार तर फळ बागांसाठी हेक्टरी अठरा हजाराच्या जवळपास अनुदान देण्याची घोषणा झाली होती. यामध्ये कोरडवाहू असलेले दोन लाख शेतकरी अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. बागायतीच व फळबागांचे दुष्काळी अनुदान आले नसल्याचे जिल्हा प्रशासनातील संबंधीत अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. जिल्ह्यात १३ हजार हेक्टरवर फळबागा आहेत. शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेल्या बागा पाण्याअभावी तोडून टाकाव्या लागल्या. या नुकसानीची भरपाई मिळेल या आशेवर असलेल्या बळीराजाची निराशाच झाली.८५ कोटींची मागणी : असे आहे क्षेत्र...कोरडवाहूनचे दोन लाख शेतकरी दुष्काळापासून वंचित राहिलेले आहेत तर बागायती असलेल्या १ लाख ४३ हजार ६६३ हेक्टर तर जिल्हयात १३ हजार हेक्टर एवढे फळबागाचे क्षेत्र आहे. बीड, धारूर, गेवराई, अंबाजोगाई व परळी तालुक्यात फळबागांचे पाण्याअभावी सरपन झालेले आहे. नुकसानीची भरपाई मात्र शेतकऱ्यांना मिळाली नाही. पावसाळ्याच्या तोंडावर पेरणीसाठी अनुदानाचे पैसे बळीराजाच्या उपयोगी पडले असते, मात्र शासनाकडूनच पैसे मिळत नसल्याने जिल्हा प्रशासनही हतबल आहे.