शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

जलयुक्तच्या ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’ला खो

By admin | Updated: June 13, 2016 00:48 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील जलयुक्त शिवार अभियानातील कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’ करण्याचे शासनाचे आदेश

औरंगाबाद : मराठवाड्यातील जलयुक्त शिवार अभियानातील कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’ करण्याचे शासनाचे आदेश असताना त्याला विभागीय पातळीवर ‘खो’ देण्यात आला आहे. औरंगाबाद आणि लातूर वगळता उर्वरित सहा जिल्ह्यांमध्ये कामांची तपासणी त्रयस्थांमार्फत झालीच नसल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या योजनेतील कामांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य शासन योजनेचा गवगवा करून दुष्काळावर मात केल्याचा दावा करीत असताना विभागात कामे अर्धवट व साशंकपणे झाली असतील तर यातून काय निष्पन्न होणार, असा प्रश्न आहे. जलयुक्त शिवार योजनेत सिमेंट नाला बंधारा, नदी-नाला सरळीकरण, खोलीकरण, रुंदीकरण, विहीर पुनर्भरण, जुन्या जलस्रोतांचे बळकटीकरण, पाझर तलाव, लघुसिंचन तलाव, साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती, कालवा दुरुस्ती आदी कामे कृषी, लघु पाटबंधारे, सामाजिक वनीकरण, जि. प. तर्फे केली जात आहेत. या कामांची गुणवत्ता चांगली असावी यासाठी जलसंधारण विभागाने ५ डिसेंबर २०१४ व १३ मार्च २०१५ रोजी आदेश जारी केले आहेत. त्या आदेशानुसार योजनेतील कामे मार्चपूर्वी त्रयस्थ संस्थेकडून तपासून मूल्यमापन करणे गरजेचे आहे. असे असताना मराठवाड्यातील लातूर व औरंगाबाद वगळता इतर कोणत्या जिल्ह्यांत कामांचे मूल्यमापन झाले नाही. जालना, उस्मानाबाद, हिंगोली या जिल्ह्यांत त्रयस्थ संस्था नेमण्यात आल्या, पण कामांचे मूल्यमापनच झाले नाही. बीड, नांदेड, परभणी या जिल्ह्यांत तर त्रयस्थ संस्थांची नेमणूकच केली गेली नाही. मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेतील १६८२ पैकी अंदाजे ३५० गावांत कामे पूर्ण झाल्याचे दिसते. १३३२ गावांत आता कामे होतील, अशी शक्यता नाही. ४गेल्या वर्षी जलयुक्त शिवारसाठी १६८२ गावे निवडण्यात आली होती. मात्र, निधीअभावी त्या कामांना अपेक्षित गती मिळालीच नाही. विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी जिल्हास्तरावर याबाबत बैठकादेखील घेतल्या. मार्चपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. जलयुक्त शिवाराची कामे केवळ प्रगतिपथावरच असल्याचे आजवर पाहायला मिळाले आहे.