शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

खासगी वाहनांच्या भाडेवाढीवर ‘आरटीओ’च्या पथकाची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 19:53 IST

सुट्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात खासगी बस, ट्रॅव्हल्स इतर कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. गर्दीचा फायदा घेऊन अनेक वाहतूकदारांकडून अवास्तव दर आकारणी करण्यात येते.

ठळक मुद्देऔरंगाबादेतून दररोज विविध मार्गांवर १२५ खाजगी बस धावतात. उन्हाळी, दिवाळी सुट्यांत खाजगी वाहतूकदारांच्या मनमानी भाडे आकारणीला प्रवाशांना सामोरे जावे लागते.

औरंगाबाद : सुट्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात खासगी बस, ट्रॅव्हल्स इतर कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. गर्दीचा फायदा घेऊन अनेक वाहतूकदारांकडून अवास्तव दर आकारणी करण्यात येते. परंतु आता खासगी वाहनांना एस. टी. महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे घेता येणार आहे. यापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्यांवर आरटीओ कार्यालयाकडून करडी नजर ठेवली जात आहे. 

औरंगाबादेतून दररोज विविध मार्गांवर १२५ खाजगी बस धावतात. उन्हाळी, दिवाळी सुट्यांत खाजगी वाहतूकदारांच्या मनमानी भाडे आकारणीला प्रवाशांना सामोरे जावे लागते. यंदाच्या उन्हाळ्यात हा आर्थिक फटका बसणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एस. टी. बसच्या टप्पा वाहतुकीचे भाडेदर हे राज्य परिवहन प्राधिकरणाकडून निश्चित करण्यात येतात. हे भाडेदर विचारात घेऊन खासगी वाहनाच्या संपूर्ण बससाठी प्रति कि. मी. भाडेदर हे त्याच स्वरुपाच्या एस. टी. महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि. मी. भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा (दीडपटीपेक्षा) अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय २७ एप्रिल रोजी घेण्यात आला. या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. या भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारण्यात येत असल्यास मोटार वाहन कायदा नियमाप्रमाणे संबंधित वाहनाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. या निर्णयाचे खाजगी वाहतूकदारांनी स्वागत केले. परंतु काही बाबी स्पष्ट नसल्याने संभ्रम असल्याचे म्हणणे आहे.

‘एस.टी.’ चे काही दर- औरंगाबाद - पुणे मार्गावर साध्या बसचे (लाल बस) २४२, शिवशाही बसचे ३७६, एशियाड बसचे ३४१ तर शिवनेरी बसचे ६५६ रुपये भाडे आहे. औरंगाबाद- नाशिक मार्गावर शिवशाही बसचे ३१९, साध्या बसचे २१५, एशियाड बसचे २९२ तिकीट दर आहे. - औरंगाबाद- नागपूर शिवशाही बसचे ८०८ तर साध्या बसचे ५६७ रुपये भाडे आहे, अशी माहिती एस. टी. महामंडळ्याच्या सूत्रांनी दिली.

खाजगी वाहन चालकांनो सावधानएस. टी. महामंडळाच्या भाडेदरापेक्षा दीडपटपेक्षा अधिक भाडे घेणाऱ्यांवर आरटीओ कार्यालयाच्या पथकाकडून लक्ष ठेवले जात आहे. कोणी जर अधिक भाडे आकारत असेल तर त्यासंदर्भात प्रवाशांना आरटीओ कार्यालयात तक्रार करता येईल. - संजय मेत्रेवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

अधिक पारदर्शकता हवीअनेक खाजगी बसचे दर हे ‘एस.टी.’पेक्षा कमी आहेत. प्रवाशांच्या गर्दीमुळे अतिरिक्त बसेस सोडाव्या लागतात. एकेरी मार्गावरच गर्दी असते तेव्हा भाडेवाढ होते. परिस्थितीचा कोणीही गैरफायदा घेता कामा नये. परंतु एस. टी. आणि खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये मोठा फरक आहे. जो निर्णय घेण्यात आला आहे, तो अधिक पारदर्शक केला पाहिजे.- राजन हौजवाला, अध्यक्ष, औरंगाबाद बस ओनर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन