शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

वीरप्पनसोबत केली अभिनंदन वर्धमान यांची तुलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:13 IST

‘वीरप्पनसारखा (मिश्यांवर पीळ देऊन, हातवारे करून) तो गडी अभिनंदन आणला की नाही अवघ्या ६० तासांत परत,’ अशा शब्दांत हवाई दलातील वैमानिक अभिनंदन वर्धमान यांची विकृत तुलना वीरप्पनसारख्या कुख्यात दरोडेखोराशी बीड जिल्ह्यातील भाजपचे आ. सुरेश धस यांनी केली.

ठळक मुद्देकाँग्रेसवर टीका करण्याच्या प्रयत्नात सुरेध धस बरळले; चूक लक्षात येताच केली सारवासारव

औरंगाबाद : ‘वीरप्पनसारखा (मिश्यांवर पीळ देऊन, हातवारे करून) तो गडी अभिनंदन आणला की नाही अवघ्या ६० तासांत परत,’ अशा शब्दांत हवाई दलातील वैमानिक अभिनंदन वर्धमान यांची विकृत तुलना वीरप्पनसारख्या कुख्यात दरोडेखोराशी बीड जिल्ह्यातील भाजपचे आ. सुरेश धस यांनी केली.बीड लोकसभा युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बीड जिल्हा मित्रमंडळातर्फे भाजपचे आमदार सुरेश धस यांची बुधवारी रात्री कुलस्वामिनी मंगल कार्यालयात सभा घेण्यात आली. आ. धस यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका करण्याच्या प्रयत्नात हवाई दलाचे धाडसी अधिकारी अभिनंदन वर्धमान यांची तुलना तामिळनाडूतील कुख्यात दरोडेखोर वीरप्पन याच्याशी केली. चूक लक्षात येताच सारवासारव करीत ‘मला त्यांची तुलना वीरप्पन याच्याशी करायची नाही’, असेही सांगून टाकले.आ. सुरेश धस म्हणाले की, ‘आधी बॉम्ब टाकायचे आणि ह्यांना सोडायचे. (काँग्रेस नेत्यांना) नको नाही तर हे पण जातील अतिरेक्याबरोबर. (हंशा, टाळ्या) तसं कसं करायचं. मारायचं नाही. पुन्हा माघारी आणायचं भाषण करायला. टावरचं लोकेशन सांगतंय की, तिथं तीनशे मोबाईल होते. जल्लोष करायला बोलावले होते. हे नालायक जे भारताचं सतत वाईट वाईट वाईट... पाहतात. हे अतिरेकी जल्लोष करीत असतानाच्या रात्री विमानं गेली. अडीच हजार ताशी किलोमीटर वेग असतोय त्याचा. त्याठिकाणी पटपट बॉम्ब टाकायचे असतात. २० मिनिटांत तर सगळा कार्यक्रम उरकायचा असतो. ओसामा बिन लादेनला काय दहा-पंधरा दिवस तापासीत होते काय? वटा वटा वटा गेले... खाली उतरले. पटा पटा पकडलं. उचललं. आणलं अन् समुद्रात नेऊन टाकलं. कबरबी नको. कायीच नको. मला वाटतं... यापुढं एअर स्ट्राईक करायचा असल, तर देशाच्या पंतप्रधानाला सांगून काँग्रेसचे दोन-चार लोक खाली लटकवून पाठवा. बॉम्ब टाकताना त्यांच्या हातात कॅमेरे द्या. तेथून खाली सोडा. ते खाली सुटल्यानंतर बॉम्बस्फोट होतील. त्याचं चित्रण करतील. परत त्यांना अणण्यासाठी अ‍ॅम्बसी विनंती करील ना.. आमचे ते खाली सोडलेले काँग्रेसचे नेते भारताकडं सोपवा. म्हणजे इकडं येऊन भाषण करतील. (हंशा.. टाळ्या.. शिट्या..) ‘तो आणला नाही का वीरप्पनसारखा गडी (मिशावर हात दाखवून वर्णन)’ वीरप्पन म्हणून त्यांचा अपमान करणार नाही; पण तो होता एक अभिनंदन पांडे. तामिळनाडूचा. गरीब पठ्ठ्या आला की नाही परत. मारलं त्याला. रक्तबंबाळ केलं. ‘भारत माता की जय’ म्हटलं तरी कळत नव्हतं. (चूक लक्षात आल्यामुळं.) आता काय करावा बबा. बोलावं का नाय. असं झालंय. त्यांची तुलना करत नाही; पण वीरप्पनसारखी स्टाईल हाय त्यांची. मी त्यांची तुलना करणार नाही; पण गडी आमचा ६० तासांत परत आला, अशा पद्धतीने आ. धस यांनी अभिनंदन वर्धमान यांची तुलना तामिळनाडूतील दरोडेखोर वीरप्पन याच्याशी केली. चूक लक्षात आल्यानंतर सारवासरावही केली. तत्पूर्वी, सोशल मीडियामुळे बोलायची भीती वाटत असल्याचेही कबूल केले. या सभेला बीड जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाElectionनिवडणूक