शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

लोकसभेची पुनरावृत्ती राज्यात होणार नाही

By admin | Updated: July 26, 2014 00:42 IST

वसमत : लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन आने वाले है’ अशी, जाहिरातबाजी करण्यात आली. मतदारही त्यात फसले. आता मात्र ‘अच्छे दिन’ येण्याऐवजी महागाई वाढत असल्याने जनतेचाही भ्रमनिरास झाला आहे.

वसमत : लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन आने वाले है’ अशी, जाहिरातबाजी करण्यात आली. मतदारही त्यात फसले. आता मात्र ‘अच्छे दिन’ येण्याऐवजी महागाई वाढत असल्याने जनतेचाही भ्रमनिरास झाला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा- शिवसेनेला नाही तर मोदीला मतदान झाले. आता विधानसभेत मात्र तसे होणे शक्य नाही. आघाडीचेच सरकार पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. वसमत येथे आयोजित राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.येथील मयुर मंगल कार्यालयात राष्ट्रवादीचा जिल्हास्तरीय निर्धार मेळावा शुक्रवारी पार पडला. मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्यमंत्री फौजिया खान, आ. जयप्रकाश दांडेगावकर, आ. विक्रम काळे, माजी खा. गणेशराव दुधगावकर, अ‍ॅड. शिवाजी माने, सुरेश वरपुडकर, प्रताप देशमुख, अरविंद चव्हाण, दिलीप चव्हाण, विनोद झंवर, रत्नमाला शिंदे, जगजित खुराणा, सभापती राजू पाटील नवघरे, देवीदास कऱ्हाळे, अ‍ॅड. डी. बी. पार्डीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांनी केले. माजी खा. अ‍ॅड. शिवाजीराव माने यांनी बोलताना जागा वाटपाबाबत जो निर्णय द्यायचा तो पक्षाने द्यावा, आमच्यावर जी जबाबदारी द्याल ती आम्ही पार पाडू मात्र स्वाभीमान गहाण टाकणारी जबाबदारी आमच्यावर टाकू नका, असे आवाहन केले. यावेळी माजी खा. गणेशराव दुधगावकर, फौजिया खान यांनीही मार्गदर्शन केले.आ. दांडेगावकर यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी भक्कम आहे. तिन्ही जागा राष्ट्रवादीने लढवण्याचा निर्धार केला तर योग्य उमेदवारही आहेत व तिन्ही जागा निवडणुनही येतील, असा विश्वास व्यक्त केला. वसमत मतदारसंघात काहीजण आपल्यासोबत होते. आता कोणी कमळ घेवून फिरत आहेत. तरी कोणी पक्ष निश्चित झाला नसला तरी निवडणूक लढवण्याची भाषा करत असल्याचा टोला त्यांनी नाव न घेता अ‍ॅड. शिवाजीराव जाधव व उज्वला तांभाळे यांना लगावला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर चौफेर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी काय केले? असा सवाल उपस्थित करताना त्यांनी कधी एखादी सहकारी संस्था, कारखाना, सोसायटी तरी काढली का? कोणाला रोजगार मिळवून दिला का? असा प्रश्न उपस्थित केला. दिल्लीत शरद पवार यांचे वजन होते. कृषीमंत्री म्हणून ते देशभर ओळखले जात होते. आज केंद्रीय कृषीमंत्री कोण आहेत? त्यांचे नावही कोणाला माहित नाही, अशी टीका त्यांनी केली.पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे. आगामी काळात एका विद्यापीठास बहिणाबाई चौधरी तर दुसऱ्या विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात येणार असल्याचे सांगितले. मराठा व मुस्लिम समाजास आरक्षण दिले. सुकन्या योजना राबवली. डीआरडीसाठी घरे देण्यासाठी तरतूद केली. डीपीडीसीसाठी ८० कोटी रुपये दिले. सर्वांगिन विकासाच्या योजना शासनाने राबवल्या असल्याचेही सांगत पाच वर्षातील शासनाच्या कामकाजाच्या लेखा जोखाही त्यांनी मांडला. सूत्रसंचालन प्रा. सुभाष मस्के यांनी केले. (वार्ताहर)सन्मानजनक जागा वाटप व्हावे- सुनील तटकरेप्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाषणात काँग्रेसला खडेबोल सुनावत मराठवाड्यात जे काँग्रेसचे दोन खासदार दिसत आहेत ते राष्ट्रवादीमुळेच आहेत, हे विसरू नका, असा इशारा दिला. शरद पवार यांच्यामुळेच १५ वर्ष आघाडीचे सरकार आहे व त्यामुळेच काँग्रेसला १५ वर्षापासून मुख्यमंत्रीपद मिळत आहे. याचीही आठवण ठेवावी, असा सल्ला त्यांनी दिला. आघाडी व्हावी, ही भूमिका आहे; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसची वाढलेली शक्ती पाहता जागा वाटप सन्मानजनक व्हावे, गतवेळी कळमनुरी मतदार संघ काँग्रेसला दिला होता. तो आता काँग्रेसला हवा आहे, असा सुचक इशाराही त्यांनी दिला व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला सत्तेवर आणण्याचा निर्धार करण्याचे आवाहन केले.