शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

Lok Sabha Election 2019 : दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 14:50 IST

ज्येष्ठ नागरिकांचा सवाल 

ठळक मुद्देतळमळीने काम करणारा आणि अपेक्षांची पूर्तता करणारा नेता हवाकार्यान्वित करणारा नेता हवा

औरंगाबाद : निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने देऊन लोकप्रतिनिधी जनतेची मते मिळवितात; पण नंतर सोयीप्रमाणे ही आश्वासने विसरून जातात. त्यामुळे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणार कोण? असा परखड सवाल शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांना केला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सदाचार संवर्धक ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सदस्यांशी संवाद साधला आणि लोकप्रतिनिधींकडून त्यांना नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

समस्या सोडविणारा नेता मिळावानिवडणुकीच्या प्रचाराची पातळी घसरली आहे. त्यामुळे जनतेने निवडणुकांकडे शांतचित्ताने बघूनच मत नोंदवावे. या निवडणुका गल्लीतल्या नाही दिल्लीतल्या आहेत; पण गल्लीतले प्रश्न सोडविण्यासाठी पैसा मात्र दिल्लीतूनच येणार आहे. स्वातंत्र्यानंतरचा काळ लक्षात घेतला, तर काय मिळाले आणि या पाच वर्षांत सरकार काय देत आहे, याचा विचार करूनच मतदारांनी मतपेटी बोलकी करावी. इथल्या समस्या सोडविणारा नेता शहराला मिळावा. - शशिकांत वझे

कामाचे योग्य नियोजन हवे लोकप्रतिनिधींकडून खूप अपेक्षा आहेत; पण त्यांची पूर्तता कोण करणार, असा प्रश्न पडला आहे. अनेक वर्षांपासून रस्त्यांची समस्या तीच आहे. कचरा, पाणी यांच्याही समस्या वाढल्या आहेत. स्मार्टसिटी म्हणून नुसतीच घोषणा केली. येथे कोणत्याही गोष्टीचे नियोजनच नाही. लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. फक्त आपापल्या वॉर्डापुरता विचार होतो आणि ते वॉर्डातले कामही फार उल्लेखनीय नसते. - मीना पांडे

अपेक्षांची पूर्तता करणारा नेतानिवडणुकीपूर्वी लोकांनी मत द्यावे म्हणून हे लोकप्रतिनिधी घरोघरी फिरतात. अनेक आश्वासने देतात; पण नंतर मात्र दिलेली आश्वासने पूर्णपणे विसरून जातात. सामान्य जनतेच्या कोणत्याच अपेक्षांची पूर्तता होत नाही. त्यामुळे आश्वासने लक्षात ठेवून जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करणारा लोकप्रतिनिधी शहराला पाहिजे आहे - सुनंदा खाडिलकर

कार्यान्वित करणारा नेता हवानिवडणुकांपूर्वी बैठक घेऊन लोकप्रतिनिधींनी काय केले, काय नाही केले आणि जे नाही केले ते करायला का जमले नाही, याविषयी नागरिक ांना माहिती द्यावी. स्मार्टसिटीची घोषणा केली, पण स्मार्टसिटीसाठी आवश्यक असणारे रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज आणि कचरा या पाच मूलभूत सुविधांकडे स्वार्थामुळे किंवा अन्य कारणांमुळे लोकनेत्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्वत:सह इतरांना कार्यान्वित करून शहराचा विकास करणारा नेता पाहिजे.- गुणवंत बंडाळे

मतदारांचा विरसजनतेला योग्य उमेदवार निवडून द्यावा वाटतो; पण तेच ते ठराविक चेहरे वारंवार निवडणुकीसाठी उभे राहत असल्यामुळे मतदारांचा विरस होत आहे. ज्याच्याकडे पैसा आहे, असेच लोक आता निवडणुकांसाठी उभे राहतात. कमी पैसे असलेल्या चांगल्या माणसांना आता निवडणूक लढविण्याची संधी मिळत नाही. पूर्वी असे नव्हते, त्यामुळे ‘नोटा’चा वापर करावा का, या संभ्रमात अनेक मतदार आहेत.- संतुकराव जोशी

ज्येष्ठांसाठी असावे उद्यानआज रस्ते, पाणी, या समस्या प्रत्येक वार्डात आहेत. या समस्यांची सोडवणूक लोकप्रतिनिधींकडून होणे अपेक्षित आहे; पण त्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठीही शहरात काही सुविधा होणे गरजेचे आहे. मुलांना खेळण्यासाठी बागबगीचे असतात. त्याप्रमाणे ज्येष्ठांसाठी प्रत्येक वार्डात उद्यान असावे, शहरात ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र असावे, असे वाटते. -सुभाष उबाळे

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019