शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

Lok Sabha Election 2019 : दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 14:50 IST

ज्येष्ठ नागरिकांचा सवाल 

ठळक मुद्देतळमळीने काम करणारा आणि अपेक्षांची पूर्तता करणारा नेता हवाकार्यान्वित करणारा नेता हवा

औरंगाबाद : निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने देऊन लोकप्रतिनिधी जनतेची मते मिळवितात; पण नंतर सोयीप्रमाणे ही आश्वासने विसरून जातात. त्यामुळे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणार कोण? असा परखड सवाल शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांना केला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सदाचार संवर्धक ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सदस्यांशी संवाद साधला आणि लोकप्रतिनिधींकडून त्यांना नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

समस्या सोडविणारा नेता मिळावानिवडणुकीच्या प्रचाराची पातळी घसरली आहे. त्यामुळे जनतेने निवडणुकांकडे शांतचित्ताने बघूनच मत नोंदवावे. या निवडणुका गल्लीतल्या नाही दिल्लीतल्या आहेत; पण गल्लीतले प्रश्न सोडविण्यासाठी पैसा मात्र दिल्लीतूनच येणार आहे. स्वातंत्र्यानंतरचा काळ लक्षात घेतला, तर काय मिळाले आणि या पाच वर्षांत सरकार काय देत आहे, याचा विचार करूनच मतदारांनी मतपेटी बोलकी करावी. इथल्या समस्या सोडविणारा नेता शहराला मिळावा. - शशिकांत वझे

कामाचे योग्य नियोजन हवे लोकप्रतिनिधींकडून खूप अपेक्षा आहेत; पण त्यांची पूर्तता कोण करणार, असा प्रश्न पडला आहे. अनेक वर्षांपासून रस्त्यांची समस्या तीच आहे. कचरा, पाणी यांच्याही समस्या वाढल्या आहेत. स्मार्टसिटी म्हणून नुसतीच घोषणा केली. येथे कोणत्याही गोष्टीचे नियोजनच नाही. लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. फक्त आपापल्या वॉर्डापुरता विचार होतो आणि ते वॉर्डातले कामही फार उल्लेखनीय नसते. - मीना पांडे

अपेक्षांची पूर्तता करणारा नेतानिवडणुकीपूर्वी लोकांनी मत द्यावे म्हणून हे लोकप्रतिनिधी घरोघरी फिरतात. अनेक आश्वासने देतात; पण नंतर मात्र दिलेली आश्वासने पूर्णपणे विसरून जातात. सामान्य जनतेच्या कोणत्याच अपेक्षांची पूर्तता होत नाही. त्यामुळे आश्वासने लक्षात ठेवून जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करणारा लोकप्रतिनिधी शहराला पाहिजे आहे - सुनंदा खाडिलकर

कार्यान्वित करणारा नेता हवानिवडणुकांपूर्वी बैठक घेऊन लोकप्रतिनिधींनी काय केले, काय नाही केले आणि जे नाही केले ते करायला का जमले नाही, याविषयी नागरिक ांना माहिती द्यावी. स्मार्टसिटीची घोषणा केली, पण स्मार्टसिटीसाठी आवश्यक असणारे रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज आणि कचरा या पाच मूलभूत सुविधांकडे स्वार्थामुळे किंवा अन्य कारणांमुळे लोकनेत्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्वत:सह इतरांना कार्यान्वित करून शहराचा विकास करणारा नेता पाहिजे.- गुणवंत बंडाळे

मतदारांचा विरसजनतेला योग्य उमेदवार निवडून द्यावा वाटतो; पण तेच ते ठराविक चेहरे वारंवार निवडणुकीसाठी उभे राहत असल्यामुळे मतदारांचा विरस होत आहे. ज्याच्याकडे पैसा आहे, असेच लोक आता निवडणुकांसाठी उभे राहतात. कमी पैसे असलेल्या चांगल्या माणसांना आता निवडणूक लढविण्याची संधी मिळत नाही. पूर्वी असे नव्हते, त्यामुळे ‘नोटा’चा वापर करावा का, या संभ्रमात अनेक मतदार आहेत.- संतुकराव जोशी

ज्येष्ठांसाठी असावे उद्यानआज रस्ते, पाणी, या समस्या प्रत्येक वार्डात आहेत. या समस्यांची सोडवणूक लोकप्रतिनिधींकडून होणे अपेक्षित आहे; पण त्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठीही शहरात काही सुविधा होणे गरजेचे आहे. मुलांना खेळण्यासाठी बागबगीचे असतात. त्याप्रमाणे ज्येष्ठांसाठी प्रत्येक वार्डात उद्यान असावे, शहरात ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र असावे, असे वाटते. -सुभाष उबाळे

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019