शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

Lok Sabha Election 2019 : दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 14:50 IST

ज्येष्ठ नागरिकांचा सवाल 

ठळक मुद्देतळमळीने काम करणारा आणि अपेक्षांची पूर्तता करणारा नेता हवाकार्यान्वित करणारा नेता हवा

औरंगाबाद : निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने देऊन लोकप्रतिनिधी जनतेची मते मिळवितात; पण नंतर सोयीप्रमाणे ही आश्वासने विसरून जातात. त्यामुळे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणार कोण? असा परखड सवाल शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांना केला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सदाचार संवर्धक ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सदस्यांशी संवाद साधला आणि लोकप्रतिनिधींकडून त्यांना नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

समस्या सोडविणारा नेता मिळावानिवडणुकीच्या प्रचाराची पातळी घसरली आहे. त्यामुळे जनतेने निवडणुकांकडे शांतचित्ताने बघूनच मत नोंदवावे. या निवडणुका गल्लीतल्या नाही दिल्लीतल्या आहेत; पण गल्लीतले प्रश्न सोडविण्यासाठी पैसा मात्र दिल्लीतूनच येणार आहे. स्वातंत्र्यानंतरचा काळ लक्षात घेतला, तर काय मिळाले आणि या पाच वर्षांत सरकार काय देत आहे, याचा विचार करूनच मतदारांनी मतपेटी बोलकी करावी. इथल्या समस्या सोडविणारा नेता शहराला मिळावा. - शशिकांत वझे

कामाचे योग्य नियोजन हवे लोकप्रतिनिधींकडून खूप अपेक्षा आहेत; पण त्यांची पूर्तता कोण करणार, असा प्रश्न पडला आहे. अनेक वर्षांपासून रस्त्यांची समस्या तीच आहे. कचरा, पाणी यांच्याही समस्या वाढल्या आहेत. स्मार्टसिटी म्हणून नुसतीच घोषणा केली. येथे कोणत्याही गोष्टीचे नियोजनच नाही. लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. फक्त आपापल्या वॉर्डापुरता विचार होतो आणि ते वॉर्डातले कामही फार उल्लेखनीय नसते. - मीना पांडे

अपेक्षांची पूर्तता करणारा नेतानिवडणुकीपूर्वी लोकांनी मत द्यावे म्हणून हे लोकप्रतिनिधी घरोघरी फिरतात. अनेक आश्वासने देतात; पण नंतर मात्र दिलेली आश्वासने पूर्णपणे विसरून जातात. सामान्य जनतेच्या कोणत्याच अपेक्षांची पूर्तता होत नाही. त्यामुळे आश्वासने लक्षात ठेवून जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करणारा लोकप्रतिनिधी शहराला पाहिजे आहे - सुनंदा खाडिलकर

कार्यान्वित करणारा नेता हवानिवडणुकांपूर्वी बैठक घेऊन लोकप्रतिनिधींनी काय केले, काय नाही केले आणि जे नाही केले ते करायला का जमले नाही, याविषयी नागरिक ांना माहिती द्यावी. स्मार्टसिटीची घोषणा केली, पण स्मार्टसिटीसाठी आवश्यक असणारे रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज आणि कचरा या पाच मूलभूत सुविधांकडे स्वार्थामुळे किंवा अन्य कारणांमुळे लोकनेत्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्वत:सह इतरांना कार्यान्वित करून शहराचा विकास करणारा नेता पाहिजे.- गुणवंत बंडाळे

मतदारांचा विरसजनतेला योग्य उमेदवार निवडून द्यावा वाटतो; पण तेच ते ठराविक चेहरे वारंवार निवडणुकीसाठी उभे राहत असल्यामुळे मतदारांचा विरस होत आहे. ज्याच्याकडे पैसा आहे, असेच लोक आता निवडणुकांसाठी उभे राहतात. कमी पैसे असलेल्या चांगल्या माणसांना आता निवडणूक लढविण्याची संधी मिळत नाही. पूर्वी असे नव्हते, त्यामुळे ‘नोटा’चा वापर करावा का, या संभ्रमात अनेक मतदार आहेत.- संतुकराव जोशी

ज्येष्ठांसाठी असावे उद्यानआज रस्ते, पाणी, या समस्या प्रत्येक वार्डात आहेत. या समस्यांची सोडवणूक लोकप्रतिनिधींकडून होणे अपेक्षित आहे; पण त्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठीही शहरात काही सुविधा होणे गरजेचे आहे. मुलांना खेळण्यासाठी बागबगीचे असतात. त्याप्रमाणे ज्येष्ठांसाठी प्रत्येक वार्डात उद्यान असावे, शहरात ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र असावे, असे वाटते. -सुभाष उबाळे

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019