शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : तरुणांना हवे शिक्षण, रोजगार आणि तंत्रज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 20:36 IST

‘लोकमत’ने जाणून घेतल्या नवमतदारांच्या अपेक्षा

औरंगाबाद : औरंगाबाद मतदारसंघाचा विचार केल्यास यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे ‘लोकमत’ने नवमतदारांशी संवाद साधला आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींबद्दल असणाऱ्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यातून रोजगार, महिलांची सुरक्षा, शिक्षण आणि तंत्रज्ञान, असे प्रश्न प्रामुख्याने समोर आले. 

महिलांची सुरक्षा महत्त्वाची आज औरंगाबाद शहरात महिला सुरक्षित आहेत; पण या सुरक्षिततेत अजून वाढ होण्याची गरज आहे. बलात्कार, छेडछाडीच्या घटना शहरात वाढत असून, यावर नियंत्रण हवे. त्याचप्रमाणे महिलांसाठी स्वच्छतागृह आणि महिला कक्षाची निर्मिती व्हायला हवी. -श्रेया रतन 

नागरी सुविधांची गरजरस्ते, पाणी व वीज, असे शहरातील प्रश्न ऐरणीवर आले असून, या प्रश्नांवर तोडगा काढण्याची गरज आहे. सर्वप्रथम नागरी सुविधा सोडवाव्यात आणि त्यानंतर औरंगाबाद शहर स्मार्ट सिटी कसे होईल यादृष्टीने लोकप्रतिनिधींनी विचार करावा.-प्रथमेश दीक्षित  

बेरोजगारी कमी करणारा नेता हवातरुणांना रोजगार मिळावा म्हणून अनेक सरकारी योजना आहेत; पण या योजनांचा लाभ सर्वसामान्य तरुणांना मिळताना दिसत नाही, अशा योजना तरुणांपर्यंत पोहोचवून आणि नवीन रोजगारनिर्मिती करून बेरोजगारी कमी करणारा लोकप्रतिनिधी असावा.     -सोमीनाथ दगडघाटे 

तंत्रज्ञानाची कास धरावीलोकसभा निवडणूक म्हणजे देशाच्या दृष्टीने विचार केल्यास तंत्रज्ञानाची कास धरणारा लोकप्रतिनिधी असण्याची गरज आहे. वैज्ञानिक प्रगती आणि तंत्रज्ञानात झालेले बदल, सोशल मीडियाची गरज लक्षात घेऊन त्यादृष्टीने पावले उचलणारा नेता हवा.     -अजिंक्य दहीवड  

शिक्षण क्षेत्रात बदल अपेक्षितलोकसभा निवडणुकीत निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे फक्त शहरी भागाचा विचार न करता ग्रामीण भागाच्या विकासावरही लक्ष देणे गरजेचे आहे.  -उमेश ठोंबरे

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादStudentविद्यार्थी