शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Lok Sabha Election 2019 : निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत पदांची खिरापत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 19:50 IST

सहा विधानसभा मतदारसंघांचा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ असताना चार सहसंपर्कप्रमुख नियुक्त करण्याची किमया शिवसेना नेत्यांनी साधली आहे.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत खिरापतीप्रमाणे पदे वाटली जाऊ लागली आहेत. जे पदाधिकारी (महिला आघाडीसह) राजीनामा देऊन पक्ष सोडून गेले होते. त्यांना देखील मोठ्या पदांचे गिफ्ट देऊन खुश करण्यात आल्यामुळे निष्ठावान पदाधिकाऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे. 

सहा विधानसभा मतदारसंघांचा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ असताना चार सहसंपर्कप्रमुख नियुक्त करण्याची किमया शिवसेना नेत्यांनी साधली आहे. सुहास दाशरथे, अण्णासाहेब माने, आ. संदीपान भुमरे यांच्याकडे सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी असताना माजी महापौर त्र्यंबक तुपे यांना सहसंपर्कप्रमुख करण्यात आल्याचे बोलले जात आहे. आ. भुमरे वगळता उर्वरित तिन्ही सहसंपर्कप्रमुख औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील आहेत.  राजीनामा देणाऱ्यांना पुन्हा पक्षप्रवेश देण्यापूर्वी वरिष्ठ पातळीवर परवानगी घेणे गरजेचे आहे; परंतु सध्या लोकसभा निवडणुकीमुळे वरिष्ठांच्या परवानगीला बगल देण्यात येत आहे. 

१७ उपजिल्हाप्रमुखांचे संघटननाराजांना उपजिल्हाप्रमुख पदाच्या नियुक्तीचे पत्र देऊन खुश करण्यात येत असल्याची माहिती सेनेच्या गोटातून मिळाली आहे. ९ तालुक्यांच्या जिल्ह्यात १७ उपजिल्हाप्रमुख नेमण्याचा प्रकार सुरू झाला आहे. जे विद्यमान उपजिल्हाप्रमुख आहेत, त्यांच्याकडेच कुठलीही संघटनेची जबाबदारी नाही, त्यातच आणखी नवीन पदधारकांची भर पडणार असल्यामुळे विद्यमान उपजिल्हाप्रमुख नाराज झाले आहेत. ३ उपजिल्हाप्रमुखांवर जबाबदारी असलेला हा जिल्हा १७ पदाधिकारी नेमण्याइतका मोठा झाला आहे. विनायक पांडे, आनंद तांदूळवाडीकर यांना उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. पांडे आणि सेना नेत्यांमध्ये मागील काही वर्षांपासून वाद आहेत, त्यातून त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याची तयारी केली होती; परंतु त्यांना पुन्हा जवळ करण्यामागे फक्त निवडणूक हेच कारण असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९