शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, चोख बंदोबस्त
2
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
3
मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
4
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
5
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
6
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
7
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
8
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
9
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
10
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
11
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
12
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
13
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
14
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
15
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
16
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
17
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
18
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
20
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप

Lok Sabha Election 2019 : औरंगाबादेत एमआयएमकडून इम्तियाज जलील मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 13:04 IST

एमआयएम या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते.

ठळक मुद्देहैदराबादेत येथील बैठकीत झाला निर्णयमुंबईत निवडणूक लढविणार नाही 

औरंगाबाद : मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने औरंगाबाद लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय सोमवारी रात्री उशिरा घेतला. हैदराबाद येथे पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत या निर्णयावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. या निवडणुकीत उमेदवार म्हणून आ. इम्तियाज जलील यांचे नाव निश्चित करण्यात आले. पक्ष मुंबईत एकही जागा लढविणार नसून औरंगाबादमध्ये आपणच उमेदवार असल्याची माहिती आ. जलील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत खैरे यांचे नाव सर्वात अगोदर जाहीर झाले. त्यापाठोपाठ काँग्रेसनेही सुभाष झांबड यांच्या नावाची घोषणा केली. एमआयएम या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. एमआयएमने ही निवडणूक लढविल्यास मुस्लिम, दलित मतांचे विभाजन होईल, याचा थेट फायदा युतीला होईल, असाही सूर होता. औरंगाबाद आणि मुंबई येथील लोकसभेची निवडणूक एमआयएमने लढवावी, असे बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच जाहीर केले. कारण वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून माजी न्या. बी.जी. कोळसे पाटील यांचे नाव त्यांनी जाहीर केले होते. या नावाला एमआयएमने विरोध दर्शविला. 

औरंगाबाद, मुंबई येथे लोकसभा निवडणूक लढवावी किंवा नाही याचा अंतिम निर्णय एमआयएमचे प्रमुख खा. असदोद्दीन ओवेसी यांच्यावर सोपविण्यात आला. त्यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता हैदराबाद येथील पक्षाच्या ‘दार-उस्स-सलाम’या कार्यालयात एका बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत औरंगाबादहून आलेल्या सर्व नगरसेवकांचे मत जाणून घेण्यात आले. बहुतांश नगरसेवकांनी लोकसभा निवडणूक लढवावी, उमेदवार म्हणून इम्तियाज जलील योग्य उमेदवार असल्याचे पुन्हा नमूद केले. मात्र, यावेळी अंतिम निर्णय झाला नाही. रात्री ८ वा. बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. रात्री ८ वा. बैठकीला सुरुवात झाली. तब्बल तीन तास बैठक सुरू होती. रात्री ११ वा. अंतिम निर्णय घेण्यात आला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्वत: इम्तियाज जलील यांनी ‘लोकमत’ला दिली. 

कार्यकर्त्यांचा आग्रहऔरंगाबाद लोकसभेची निवडणूक एमआयएमने लढवावी, असा सूर कार्यकर्त्यांचा होता. यासंदर्भात स्थानिक पातळीवर दोन वेगवेगळ्या बैठका घेण्यात आल्या. लोकसभेसाठी आ. इम्तियाज जलील योग्य उमेदवार असल्याचा निर्वाळाही कार्यकर्त्यांनी पक्षनेत्यांसमोर दिला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAurangabadऔरंगाबादImtiaz Jalilइम्तियाज जलील