शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

Lok Sabha Election 2019 : औरंगाबादेत एमआयएमकडून इम्तियाज जलील मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 13:04 IST

एमआयएम या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते.

ठळक मुद्देहैदराबादेत येथील बैठकीत झाला निर्णयमुंबईत निवडणूक लढविणार नाही 

औरंगाबाद : मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने औरंगाबाद लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय सोमवारी रात्री उशिरा घेतला. हैदराबाद येथे पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत या निर्णयावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले. या निवडणुकीत उमेदवार म्हणून आ. इम्तियाज जलील यांचे नाव निश्चित करण्यात आले. पक्ष मुंबईत एकही जागा लढविणार नसून औरंगाबादमध्ये आपणच उमेदवार असल्याची माहिती आ. जलील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत खैरे यांचे नाव सर्वात अगोदर जाहीर झाले. त्यापाठोपाठ काँग्रेसनेही सुभाष झांबड यांच्या नावाची घोषणा केली. एमआयएम या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. एमआयएमने ही निवडणूक लढविल्यास मुस्लिम, दलित मतांचे विभाजन होईल, याचा थेट फायदा युतीला होईल, असाही सूर होता. औरंगाबाद आणि मुंबई येथील लोकसभेची निवडणूक एमआयएमने लढवावी, असे बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच जाहीर केले. कारण वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून माजी न्या. बी.जी. कोळसे पाटील यांचे नाव त्यांनी जाहीर केले होते. या नावाला एमआयएमने विरोध दर्शविला. 

औरंगाबाद, मुंबई येथे लोकसभा निवडणूक लढवावी किंवा नाही याचा अंतिम निर्णय एमआयएमचे प्रमुख खा. असदोद्दीन ओवेसी यांच्यावर सोपविण्यात आला. त्यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता हैदराबाद येथील पक्षाच्या ‘दार-उस्स-सलाम’या कार्यालयात एका बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत औरंगाबादहून आलेल्या सर्व नगरसेवकांचे मत जाणून घेण्यात आले. बहुतांश नगरसेवकांनी लोकसभा निवडणूक लढवावी, उमेदवार म्हणून इम्तियाज जलील योग्य उमेदवार असल्याचे पुन्हा नमूद केले. मात्र, यावेळी अंतिम निर्णय झाला नाही. रात्री ८ वा. बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. रात्री ८ वा. बैठकीला सुरुवात झाली. तब्बल तीन तास बैठक सुरू होती. रात्री ११ वा. अंतिम निर्णय घेण्यात आला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्वत: इम्तियाज जलील यांनी ‘लोकमत’ला दिली. 

कार्यकर्त्यांचा आग्रहऔरंगाबाद लोकसभेची निवडणूक एमआयएमने लढवावी, असा सूर कार्यकर्त्यांचा होता. यासंदर्भात स्थानिक पातळीवर दोन वेगवेगळ्या बैठका घेण्यात आल्या. लोकसभेसाठी आ. इम्तियाज जलील योग्य उमेदवार असल्याचा निर्वाळाही कार्यकर्त्यांनी पक्षनेत्यांसमोर दिला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAurangabadऔरंगाबादImtiaz Jalilइम्तियाज जलील