शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाची बँकांना तंबी; संशयित व्यवहारांची दररोज द्यावी लागणार माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:48 IST

दररोज माहिती न कळविल्यास थेट कारवाई करण्यात येईल

औरंगाबाद : निवडणुकीच्या काळात खात्यांमध्ये होणाऱ्या संशयित व्यवहाराची माहिती बँकांनी निवडणूक आयोगाला कळविणे सक्तीचे आहे. मात्र, ज्या बँका माहिती पाठवत नाही, त्या बँकांच्या प्रतिनिधींना बोलावून निवडणूक आयोगाने तंबी दिली आहे. दररोज माहिती न कळविल्यास थेट कारवाई करण्यात येईल, असाही इशारा दिला आहे.

१७ व्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला हळूहळू वेग येत आहे. मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडण्यासाठी निवडणूक आयोगाचे कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. निवडणूक काळात काळ्या पैशांचा वापर रोखण्यासाठी निवडणूक आयोग व  आयकर विभागाने कंबर कसली आहे. मतदारसंघात होणाऱ्या मोठ्या आर्थिक व्यवहारावर विभागाची करडी नजर राहणार आहे. काळा पैसा शोधण्यासाठी आयकर विभागाने शीघ्रकृती पथकही तयार केले आहे. तर दुसरीकडे संशयित खात्यांमध्ये होणाऱ्या व्यवहाराची माहिती बँकांना दररोज निवडणूक आयोगाकडे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यात राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, को-आॅपरेटिव्ह बँकांचा समावेश आहे.  निवडणूक लढविणारे उमेदवार व त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यावर लक्ष ठेवणे. याशिवाय कोणत्याही बँकांमधील खात्यात मोठ्या रकमेचा भरणा किंवा रक्कम काढण्यात आली असेल. ज्या खात्यात व्यवहार होत नाही, पण अचानक निवडणूक काळात या खात्यात लाखो रुपये जमा झाले असतील, तर अशा सर्व संशयित खात्यांची माहिती बँकांना दररोज संध्याकाळी निवडणूक आयोगाला द्यावी लागत आहे.

मात्र, या आदेशाकडे काही बँकांनी दुर्लक्ष केले होते. ही बाब निवडणूक विभागाच्या लक्षात येताच निवडणूक खर्च नियंत्रण कक्षाच्या वतीने सर्व बँकांच्या प्रतिनिधींची बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. बँकनिहाय अहवाल मागविण्यात आला. ज्या बँका दररोज अहवाल सादर करीत नाही त्यांना अधिकाऱ्यांनी तंबी दिली. तसेच निवडणूक आयोगाचा आदेश मानला नाही तर बँकांवर काय कारवाई होऊ शकते याची माहितीही संबंधितांना देण्यात आली. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत काही बँकांनी दैनंदिन व्यवहाराची माहिती विभागाला पाठविली होती.

आयकर विभागाचे अधिकारी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात आयकर विभागाने राज्यात ६ कोटी रुपये काळा पैसा जप्त केला होता. मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा काळा पैसा वापरण्यात येणार होता. काळा पैसा शोधण्यासाठी आयकर विभागाच्या रडारवर बँका आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019