शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Lok Sabha Election 2019 : औरंगाबाद मतदारसंघावर साडेसहा लाख दलित-मुस्लिम मतदारांचा प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 18:10 IST

पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने १९९१ सालापासून एक हाती सत्ता गाजवली आहे. 

- विजय सरवदे  

औरंगाबाद : सेनेने प्रत्येक वेळी हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक जिंकली, तरीही काँग्रेसने सेनेला प्रत्येक निवडणुकीत कडवी झुंज दिली. प्रामुख्याने काँग्रेसचे पारंपरिक मतदार हे मुस्लिम व दलित आहेत. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपासून ‘एमआयएम’ हा पक्ष औरंगाबादेत स्थिरावला. 

औरंगाबाद- मध्य विधानसभा मतदारसंघात या पक्षाचे इम्तियाज जलील हे निवडून आले. महानगरपालिकेतही या पक्षाचे २४ नगरसेवक आहेत. अलीकडे, राजकीय पटलावर वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे ‘सुप्रीमो’ आहेत. औरंगाबादसह राज्यातील विविध शहरांमध्ये या आघाडीच्या ‘रेकॉर्ड ब्रेक’ सभा झाल्या आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ‘एमआयएम’चे  जलील हे उमेदवार आहेत. आतापर्यंत सतत काँग्रेसच्या बाजूने उभ्या असलेल्या दलित- मुस्लिम मतदारांचा कल यावेळी कोणाकडे, हेच निर्णायक ठरणार आहे. या मतदारसंघात ४ लाख १८ हजार मुस्लिम मतदार, सव्वादोन लाख दलित मतदार आणि साडेपाच-सहा लाख ओबीसी मतदार आहेत. 

औरंगाबाद शहरावर संपूर्ण लक्ष !इम्तियाज जलील हे मूळचे औरंगाबादचे रहिवासी असले, तरी त्यांचा शहराबाहेर फारसा संपर्क नाही किंवा त्यांचा ग्रामीण मतदारांसोबत फारसा परिचयदेखील नाही. त्यामुळे ते प्रामुख्याने शहरातील दलित, मुस्लिम आणि काही प्रमाणात ओबीसींची मते खेचतील आणि नेमके हेच काँग्रेससाठी त्रासदायक ठरू शकते. असा कयास काढला जातो की, शेवटच्या टप्प्यात प्रकाश आंबेडकर आणि असदोद्दीन ओवेसी यांची येथे सभा झाली, तर वंचित बहुजन आघाडीला फायदा होऊ शकतो. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादPoliticsराजकारण