शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

Lok Sabha Election 2019 : औरंगाबाद मतदारसंघावर साडेसहा लाख दलित-मुस्लिम मतदारांचा प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 18:10 IST

पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने १९९१ सालापासून एक हाती सत्ता गाजवली आहे. 

- विजय सरवदे  

औरंगाबाद : सेनेने प्रत्येक वेळी हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक जिंकली, तरीही काँग्रेसने सेनेला प्रत्येक निवडणुकीत कडवी झुंज दिली. प्रामुख्याने काँग्रेसचे पारंपरिक मतदार हे मुस्लिम व दलित आहेत. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपासून ‘एमआयएम’ हा पक्ष औरंगाबादेत स्थिरावला. 

औरंगाबाद- मध्य विधानसभा मतदारसंघात या पक्षाचे इम्तियाज जलील हे निवडून आले. महानगरपालिकेतही या पक्षाचे २४ नगरसेवक आहेत. अलीकडे, राजकीय पटलावर वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे ‘सुप्रीमो’ आहेत. औरंगाबादसह राज्यातील विविध शहरांमध्ये या आघाडीच्या ‘रेकॉर्ड ब्रेक’ सभा झाल्या आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ‘एमआयएम’चे  जलील हे उमेदवार आहेत. आतापर्यंत सतत काँग्रेसच्या बाजूने उभ्या असलेल्या दलित- मुस्लिम मतदारांचा कल यावेळी कोणाकडे, हेच निर्णायक ठरणार आहे. या मतदारसंघात ४ लाख १८ हजार मुस्लिम मतदार, सव्वादोन लाख दलित मतदार आणि साडेपाच-सहा लाख ओबीसी मतदार आहेत. 

औरंगाबाद शहरावर संपूर्ण लक्ष !इम्तियाज जलील हे मूळचे औरंगाबादचे रहिवासी असले, तरी त्यांचा शहराबाहेर फारसा संपर्क नाही किंवा त्यांचा ग्रामीण मतदारांसोबत फारसा परिचयदेखील नाही. त्यामुळे ते प्रामुख्याने शहरातील दलित, मुस्लिम आणि काही प्रमाणात ओबीसींची मते खेचतील आणि नेमके हेच काँग्रेससाठी त्रासदायक ठरू शकते. असा कयास काढला जातो की, शेवटच्या टप्प्यात प्रकाश आंबेडकर आणि असदोद्दीन ओवेसी यांची येथे सभा झाली, तर वंचित बहुजन आघाडीला फायदा होऊ शकतो. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादPoliticsराजकारण