शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : हौशी मतदाराने मतदानाचा व्हिडिओ केला टिकटॉकवर पोस्ट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 14:29 IST

सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला

औरंगाबाद : शहरातील एका हौशी मतदाराने मतदान करीत असल्याची मोबाईलवर क्लीप तयार करून ती टिकटॉक, व्हॉटस्अ‍ॅप या सोशल मीडियावर व्हायरल केली. याबाबत वृत्त वाहिन्यांवर बातमी प्रकाशित होताच, शहर पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली. मतदान हे गोपनीय आहे. गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल व्हिडिओ तयार करणाऱ्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. 

बोगस मतदानाच्या संशयावरून एक ताब्यातसिटीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झाकीर हुसेन शाळेतील मतदान केंद्रात एक तरुण बोगस मतदान करण्यासाठी उभा असल्याचा संशय उमेदवारांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, आपण मतदान करण्यासाठी आलो आहोत, आपण बोगस मतदान केले नाही, असे त्याचे म्हणणे होते. मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले.

सोशल मीडियातून गोपनीयतेचा भंगसोशल मीडियातून अनेक मतदारांनी कुणाला मतदान केले, त्याची माहिती फेसबुकवर टाकून मतदान गोपनीयतेचा भंग केला. जिल्हा व राज्य पातळीवरील समितीकडे याबाबत माहिती देण्यात आली आहे. ज्यांनी मतदान गोपनीयतेचा भंग केला, त्यांना सोशल मीडियातून ट्रेस करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. तत्पूर्वी, समितीमार्फत याबाबत चौकशी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. 

पोलिसांच्या उपाययोजना आल्या कामीलोकसभा मतदारसंघात मंगळवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. शहर आणि ग्रामीण पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांमुळे कोठेही अनुचित घटना घडली नाही. प्रखर उन्हामुळे मतदारांनी सायंकाळी मतदान केंद्रावर गर्दी केल्याने रांगेत थांबलेल्या प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रात्री ८.३० वाजले.

औरंगाबाद  आणि जालना लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (दि.२३) सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. मतदान शांततेत व्हावे, याकरिता पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी आवश्यक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद हे सकाळी ७ वाजताच घराबाहेर पडले होते. पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्यासह अन्य अधिकारी सतर्क होते. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर राज्य राखीव दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान तैनात होते. यामुळे कोणतीही गडबड झाली नाही. २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत आज संपूर्ण शहरात किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान पार पडले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019