शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

लॉकडाऊनमुळे औरंगाबादच्या उद्योगांचे होईल ३ हजार कोटी रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 16:56 IST

ओपन मार्केटमध्ये औरंगाबादेतील उद्योग स्पर्धेत तग धरून असताना ग्राहक दुसरे ‘सोर्स’ पाहणे सुरू करण्याची भीती आहे.

ठळक मुद्दे पूर्वपदावर येत असताना आता आणखी दोन आठवडे मागे जाण्याची भीती

औरंगाबाद : प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे नऊ दिवसांच्या काळात औरंगाबादेतील उद्योगांचे जवळपास ३ हजार कोटींचे नुकसान होईल, अशी भीती उद्योग क्षेत्रात व्यक्त केली जात आहे. 

शहर व जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढत आहे. त्याला रोख लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १० ते १८ जुलैदरम्यान नऊ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर उद्योग क्षेत्रात नाराजीचा सूर उमटला आहे. सततच्या खंडामुळे ग्राहकांचा विश्वास राहणार नाही. ओपन मार्केटमध्ये औरंगाबादेतील उद्योग स्पर्धेत तग धरून असताना ग्राहक दुसरे ‘सोर्स’ पाहणे सुरू करण्याची भीती आहे. लॉकडाऊनचा निर्णय दुर्दैवी आहे, असे मत ‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी व्यक्त केले. 

अगोदरच ४०-४५ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे उद्योगांचे अर्थचक्र ठप्प झाले होते. आता कुठे उद्योग हळूहळू पूर्वपदावर येत होते. ४०-५० टक्क्यांपर्यंत उत्पादन सुरू झाले होते. असे असताना आता आणखी नऊ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे उद्योगांची घडी विस्कटीत होईल. पुन्हा इथपर्यंत येण्यासाठी दोन आठवडे मागे जावे लागेल, अशी खंत ‘मासिआ’चे सहसचिव विनय राठी व कार्यकारिणी सदस्य मनीष अग्रवाल यांनी व्यक्त केली. 

दुसरीकडे, मकरंद देशपांडे यांनी कामगारांवर आणखी बेरोजगारीचे संकट ओढवणार आहे, अशी भीती व्यक्त केली. अगोदरच उद्योगांसमोर दोन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग संकटात आले आहेत. वेतन देण्याची क्षमता राहिलेली नाही. हजारो कामगार बेरोजगार झाले असून आता आणखी लागू करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनमुळे रोजगाराची समस्या भेडसावणार आहे, असेही ते म्हणाले. 

८० लाख मानवी तासांचे नुकसान  नऊ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात दोन आठवडी सुट्या सोडल्या, तर उर्वरित ७ दिवसांत उद्योगांचे साधारणपणे ८० लाख मानवी तासांचे नुकसान होऊ शकते. औरंगाबाद व लगतच्या प्रमुख पाच औद्योगिक वसाहतींतील सर्व प्रकारच्या ४ हजार ९०० उद्योगांमध्ये १ लाख ६० हजार कामगार कार्यरत असून, सात दिवसांत सर्व शिफ्ट मिळून ते १० लाख दिवस काम करतात. प्रशासनाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. मात्र, यापुढेही सतत लॉकडाऊनला सामोरे जाण्याची वेळ आली, तर इथल्या उद्योग क्षेत्रावर दूरगामी परिणाम होतील. इथे उद्योग येण्याऐवजी येथे कार्यरत उद्योग बाहेर जाण्याची भीती आहे. - कमलेश धूत, अध्यक्ष, सीएमआयए 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीcorona virusकोरोना वायरस बातम्या