शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

लॉकडाऊनमुळे औरंगाबादच्या उद्योगांचे होईल ३ हजार कोटी रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 16:56 IST

ओपन मार्केटमध्ये औरंगाबादेतील उद्योग स्पर्धेत तग धरून असताना ग्राहक दुसरे ‘सोर्स’ पाहणे सुरू करण्याची भीती आहे.

ठळक मुद्दे पूर्वपदावर येत असताना आता आणखी दोन आठवडे मागे जाण्याची भीती

औरंगाबाद : प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे नऊ दिवसांच्या काळात औरंगाबादेतील उद्योगांचे जवळपास ३ हजार कोटींचे नुकसान होईल, अशी भीती उद्योग क्षेत्रात व्यक्त केली जात आहे. 

शहर व जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढत आहे. त्याला रोख लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १० ते १८ जुलैदरम्यान नऊ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर उद्योग क्षेत्रात नाराजीचा सूर उमटला आहे. सततच्या खंडामुळे ग्राहकांचा विश्वास राहणार नाही. ओपन मार्केटमध्ये औरंगाबादेतील उद्योग स्पर्धेत तग धरून असताना ग्राहक दुसरे ‘सोर्स’ पाहणे सुरू करण्याची भीती आहे. लॉकडाऊनचा निर्णय दुर्दैवी आहे, असे मत ‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी व्यक्त केले. 

अगोदरच ४०-४५ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे उद्योगांचे अर्थचक्र ठप्प झाले होते. आता कुठे उद्योग हळूहळू पूर्वपदावर येत होते. ४०-५० टक्क्यांपर्यंत उत्पादन सुरू झाले होते. असे असताना आता आणखी नऊ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे उद्योगांची घडी विस्कटीत होईल. पुन्हा इथपर्यंत येण्यासाठी दोन आठवडे मागे जावे लागेल, अशी खंत ‘मासिआ’चे सहसचिव विनय राठी व कार्यकारिणी सदस्य मनीष अग्रवाल यांनी व्यक्त केली. 

दुसरीकडे, मकरंद देशपांडे यांनी कामगारांवर आणखी बेरोजगारीचे संकट ओढवणार आहे, अशी भीती व्यक्त केली. अगोदरच उद्योगांसमोर दोन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग संकटात आले आहेत. वेतन देण्याची क्षमता राहिलेली नाही. हजारो कामगार बेरोजगार झाले असून आता आणखी लागू करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनमुळे रोजगाराची समस्या भेडसावणार आहे, असेही ते म्हणाले. 

८० लाख मानवी तासांचे नुकसान  नऊ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात दोन आठवडी सुट्या सोडल्या, तर उर्वरित ७ दिवसांत उद्योगांचे साधारणपणे ८० लाख मानवी तासांचे नुकसान होऊ शकते. औरंगाबाद व लगतच्या प्रमुख पाच औद्योगिक वसाहतींतील सर्व प्रकारच्या ४ हजार ९०० उद्योगांमध्ये १ लाख ६० हजार कामगार कार्यरत असून, सात दिवसांत सर्व शिफ्ट मिळून ते १० लाख दिवस काम करतात. प्रशासनाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. मात्र, यापुढेही सतत लॉकडाऊनला सामोरे जाण्याची वेळ आली, तर इथल्या उद्योग क्षेत्रावर दूरगामी परिणाम होतील. इथे उद्योग येण्याऐवजी येथे कार्यरत उद्योग बाहेर जाण्याची भीती आहे. - कमलेश धूत, अध्यक्ष, सीएमआयए 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीcorona virusकोरोना वायरस बातम्या