शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमधील लॉकडाऊन शिथिल; २१ मे पासून दररोज सहा तास राहणार दुकाने उघडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 20:06 IST

शहरात १४ मे ते २० मेपर्यंत लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणीचे आदेश लागू आहेत

औरंगाबाद : १४ मे ते २० मेपर्यंतच्या काटेकोर लॉकडाऊननंतर शहरात गुरुवारपासून ( दि. २१ ) नवे नियम लागू होणार आहेत. यानुसार लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असून, आता दररोज सकाळी ७ ते दुपारी १ या वेळात अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी राहतील, असे आदेश महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले आहेत. 

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १४ मेच्या मध्यरात्रीपासून ते २० मेच्या मध्यरात्रीपर्यंत शहरात लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय प्रशासकीय व पोलीस यंत्रणेने घेतला होता. याची मुदत बुधवारी ( डी. २० ) संपत होती तसेच कोरोनाच्या रुग्णांचा शहरातील आकडा १०७५ झाल्याने पुढील काळातील लॉकडाऊनबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी ( दि. २१ ) पासून सुरु होणारा लॉकडाऊन काळासाठी मंगळवारी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी नवे नियम व अटी लागू केल्या आहेत. 

यानुसार २१ मे ते ३१ मेपर्यंत लॉकडाऊनच्या कालावधीत शहरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सहा तासांसाठी खुली राहतील. सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत अन्नधान्य, किराणा, भाजीपाला, फळे, दूध नागरिकांना खरेदी करता येईल. मेडिकल स्टोअर्स, औषध निर्मितीचे उद्योग या आस्थापनांची परवानगी कायम आहे. तसेच हातगाड्यांनाही  परवानगी राहणार आहे. याकाळात सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद