शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

Lockdown In Aurangabad : महापालिकेची वॉररूम २४ तास खुले; पोलिसांसोबत महापालिका कर्मचारीही अखंड सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 16:54 IST

‘लॉकडाऊन’मध्ये मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र स्वत:च्या जिवाची तमा न बाळगता आपले कर्तव्य निभावले.

ठळक मुद्देकोरोना काळात नागरिकांना तत्पर सेवापोलीस कर्मचाऱ्यांच्या जोडीला रस्त्यांवर पालिकेचे कर्मचारीही उभे 

औरंगाबाद : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र स्वत:च्या जिवाची तमा न बाळगता आपले कर्तव्य निभावले. पहिल्यांदाच रस्त्यांवर उतरून पोलिसांच्या मदतीने ‘लॉकडाऊन’ यशस्वी केले. महापालिकेची वॉररूम २४ तास खुलेच आहे.

मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या सूक्ष्म नियोजनामुळेच हे शक्य झाले. ‘लॉकडाऊन’ यशस्वीतेसाठी तसेच कर्मचाऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी खास ‘कंट्रोल रूम’ची त्यांनी निर्मिती केली. मुख्य नियंत्रकांबरोबरच दोन पथकप्रमुखांनी २४ तास लक्ष ठेवून परिस्थिती हाताळली.कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १० ते १८ जुलैदरम्यान संचारबंदी घोषित करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपा, पोलीस, महसूल प्रशासनाने ‘मायक्रो प्लॅनिंग’ केली. पाण्डेय यांनी लॉकडाऊन शंभर टक्के यशस्वीतेसाठी ‘कंट्रोल रूम’ची स्थापना केली. मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्यावर मुख्य नियंत्रकांची जबाबदारी सोपवून कंट्रोल रूममध्ये १८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर उतरून कर्तव्यावरील चारशे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंकुश लाडके यांच्यावर सुपरवायझरची जबाबदारी दिली.

कंट्रोल रूममध्ये १८ कर्मचारीशहरभर कर्तव्य बजावत असलेल्या मनपाच्या कर्मचाऱ्यांचा कामकाजाचा आढावा आणि परिस्थितीचे नियंत्रण मिळविण्यासाठी ‘कंट्रोल रूम’मध्ये १८ कर्मचारी कार्यरत होते. दिवस-रात्र या कर्मचाऱ्यांनी योद्ध्याप्रमाणे आपले कर्तव्य बजावले. 10 जुलैपासून आतापर्यंत या कंट्रोल रूमला एकदाही कुलूप लागले नाही. फिल्डवर असलेल्या कर्मचाऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्या, कर्मचारी काय करतात, याचा आढावा फोन तसेच व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून वॉररूममधील कर्मचाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. अनेकदा स्पॉटवर जाऊन तपासणी केली. तर रस्त्यावर नियुक्त पथकाने जिथे पोलीस उपलब्ध नव्हते, तिथे पॉइंट लावून पोलिसांची सुद्धा भूमिका निभावली.

मनपा कर्मचाऱ्यांचा अभिमान लॉकडाऊनच्या काळामध्ये पहिल्यांदाच मनपाचे कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. अत्यंत नियोजन पद्धतीने सर्वच कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊन यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. दिवस असो वा रात्र याची तमा न बाळगता परिस्थिती नियंत्रणासाठी हातभार लावला. विना तक्रार कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक तसेच अभिमानही आहे.-आस्तिककुमार पाण्डेय, प्रशासक, महापालिका

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद