शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

Lockdown In Aurangabad : महापालिकेची वॉररूम २४ तास खुले; पोलिसांसोबत महापालिका कर्मचारीही अखंड सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 16:54 IST

‘लॉकडाऊन’मध्ये मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र स्वत:च्या जिवाची तमा न बाळगता आपले कर्तव्य निभावले.

ठळक मुद्देकोरोना काळात नागरिकांना तत्पर सेवापोलीस कर्मचाऱ्यांच्या जोडीला रस्त्यांवर पालिकेचे कर्मचारीही उभे 

औरंगाबाद : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र स्वत:च्या जिवाची तमा न बाळगता आपले कर्तव्य निभावले. पहिल्यांदाच रस्त्यांवर उतरून पोलिसांच्या मदतीने ‘लॉकडाऊन’ यशस्वी केले. महापालिकेची वॉररूम २४ तास खुलेच आहे.

मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या सूक्ष्म नियोजनामुळेच हे शक्य झाले. ‘लॉकडाऊन’ यशस्वीतेसाठी तसेच कर्मचाऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी खास ‘कंट्रोल रूम’ची त्यांनी निर्मिती केली. मुख्य नियंत्रकांबरोबरच दोन पथकप्रमुखांनी २४ तास लक्ष ठेवून परिस्थिती हाताळली.कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १० ते १८ जुलैदरम्यान संचारबंदी घोषित करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपा, पोलीस, महसूल प्रशासनाने ‘मायक्रो प्लॅनिंग’ केली. पाण्डेय यांनी लॉकडाऊन शंभर टक्के यशस्वीतेसाठी ‘कंट्रोल रूम’ची स्थापना केली. मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्यावर मुख्य नियंत्रकांची जबाबदारी सोपवून कंट्रोल रूममध्ये १८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर उतरून कर्तव्यावरील चारशे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंकुश लाडके यांच्यावर सुपरवायझरची जबाबदारी दिली.

कंट्रोल रूममध्ये १८ कर्मचारीशहरभर कर्तव्य बजावत असलेल्या मनपाच्या कर्मचाऱ्यांचा कामकाजाचा आढावा आणि परिस्थितीचे नियंत्रण मिळविण्यासाठी ‘कंट्रोल रूम’मध्ये १८ कर्मचारी कार्यरत होते. दिवस-रात्र या कर्मचाऱ्यांनी योद्ध्याप्रमाणे आपले कर्तव्य बजावले. 10 जुलैपासून आतापर्यंत या कंट्रोल रूमला एकदाही कुलूप लागले नाही. फिल्डवर असलेल्या कर्मचाऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्या, कर्मचारी काय करतात, याचा आढावा फोन तसेच व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून वॉररूममधील कर्मचाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. अनेकदा स्पॉटवर जाऊन तपासणी केली. तर रस्त्यावर नियुक्त पथकाने जिथे पोलीस उपलब्ध नव्हते, तिथे पॉइंट लावून पोलिसांची सुद्धा भूमिका निभावली.

मनपा कर्मचाऱ्यांचा अभिमान लॉकडाऊनच्या काळामध्ये पहिल्यांदाच मनपाचे कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. अत्यंत नियोजन पद्धतीने सर्वच कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊन यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. दिवस असो वा रात्र याची तमा न बाळगता परिस्थिती नियंत्रणासाठी हातभार लावला. विना तक्रार कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक तसेच अभिमानही आहे.-आस्तिककुमार पाण्डेय, प्रशासक, महापालिका

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद