शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
6
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
7
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
8
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
9
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
10
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
11
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
12
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
13
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
14
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
15
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
16
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
17
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
18
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
19
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
20
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

Lockdown In Aurangabad : संचारबंदीत उद्योग सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:00 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीत लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसंदर्भात  सूचना देताना देसाई यांनी उद्योग क्षेत्र सशर्त सुरू ठेवण्याबाबत सूचना दिल्या.

ठळक मुद्दे आरोग्यासह उद्योग अर्थचक्र सुरू राहणे महत्त्वाचे

औरंगाबाद : शहर आणि वाळूज औद्योगिक परिसरात १० ते १८ जुलैदरम्यान लागू होणाऱ्या लॉकडाऊनदरम्यान उद्योग सुरू ठेवण्यासाठी सशर्त परवानगी असल्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी सांगितले. शासनाचे उद्योगाबाबतचे धोरण आहे, त्याला अनुसरून पालकमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीत लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसंदर्भात  सूचना देताना देसाई यांनी उद्योग क्षेत्र सशर्त सुरू ठेवण्याबाबत सूचना दिल्या.

औद्योगिक संघटनांकडून आभारउद्योगांसाठी थोडीफार का होईना सवलत दिल्याबद्दल सर्व औद्योगिक संघटनांचे मानसिंग पवार, कमलेश धूत, अभय हंचनाळ, मुकुंद कुलकर्णी यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. चिकलठाणा, वाळूज, रेल्वेस्टेशन, एमआयडीसीऔरंगाबाद शहराव्यतिरिक्त इतर एमआयडीसी किंवा खासगी जागेवरील उद्योग चालू राहणार असल्यामुळे त्यांना आवश्यक ते पास देऊन कामगारांची वाहतूक निश्चित बसने करता येईल. जे उद्योग कामगारांची दहा दिवस कंपनीमध्ये निवास व्यवस्था करणार, त्यांना उद्योग सुरू ठेवण्यास कोणतीही अडचण नाही.दरम्यान शेतमाल, कृषी निगडित प्रक्रिया उद्योग नियमानुसार चालू राहतील, असे मनपा आयुक्तांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे.

एमआयडीसी पोर्टलच्या परवानग्या ग्राह्यजिल्ह्यात औषध व अन्न उत्पादन, सलग प्रक्रिया आणि निर्यात उद्योग व त्यांचे पुरवठादार चालू राहणार व यासाठी एमआयडीसी पोर्टलवरून यापूर्वी देण्यात आलेल्या परवानग्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत, तसेच औरंगाबाद शहरामधून उद्योग क्षेत्रामध्ये आणि परतीसाठी फक्त कार किंवा निश्चित बसमधूनच प्रवासाला परवानगी राहील.चिकलठाणा, वाळूज, रेल्वेस्टेशन एमआयडीसी व औरंगाबाद शहराव्यतिरिक्त इतर एमआयडीसी किंवा खाजगी जागेवरील उद्योग चालू राहणार आहेत. जे उद्योग समूह कामगारांची १० दिवस कंपनीत निवास व्यवस्था करणार आहेत, त्यांना उद्योग चालू ठेवण्यास कोणतीही अडचण येणार नाही, तसेच शेतमालाशी निगडित प्रक्रिया उद्योगही चालू राहणार. औद्योगिक क्षेत्रानजीकच्या खेड्यांमधील कामगारांची वाहतूक कार किंवा बसने सुरू राहणार आहे. आरोग्याबरोबरच अर्थचक्र चालू राहणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री देसाई यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसी