शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा लॉकडाऊन : सावरत असलेल्या कारखान्यांना धक्का; उद्योग क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 16:49 IST

मार्च महिन्यापासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे त्रस्त असलेल्या उद्योग क्षेत्राला अनलॉकमुळे दिलासा मिळून उद्योग क्षेत्र गती घेत होते.

ठळक मुद्दे भविष्यात लॉकडाऊन नकोऔरंगाबादच्या अर्थकारणाला खीळ बसण्याची शक्यता

औरंगाबाद : शहरात आणि औद्योगिक क्षेत्रात १० जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याने सावरत असलेल्या औद्योगिक क्षेत्रातून याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.  

मार्च महिन्यापासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे त्रस्त असलेल्या उद्योग क्षेत्राला अनलॉकमुळे दिलासा मिळून उद्योग क्षेत्र गती घेत होते. मात्र, शहर व जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे उद्योग क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या निर्णयामुळे उद्योगांचे मोठे नुकसान होणार असल्याची मते उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहेत. 

उद्योग क्षेत्रातील संघटनांचे प्रतिनिधी म्हणतात...

भविष्यात संचारबंदी पाळणार नाहीउद्योग सुरू राहावेत ही आमची जबाबदारी आहे. प्रशासनाची गरज आणि आरोग्य सुविधांवर वाढणाऱ्या भारावर उपाय म्हणून उद्योग १० जुलैपासून बंद स्वीकारू; परंतु भविष्यात अशा अडचणी येऊ नयेत म्हणून संचारबंदी करू नये. प्रशासनासोबत काम करून सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योजक पुढे येतील. आज उद्योजकांनी तात्पुरता बंद स्वीकारला आहे. याचा अर्थ भविष्यात बंद स्वीकारला जाईल, असा होत नाही. सर्व एमआयडीसी क्षेत्र बंद असेल. उद्योगांच्या चुकांमुळे कोरोना पसरला नाही, असे मत उद्योजक राम भोगले यांनी व्यक्त केले. 

अशी परिस्थिती पुढे येऊ नयेशहरातील उद्योजक, लघु उद्योजक, व्यापाऱ्यांशी चर्चा करून प्रशासनाने सर्वांना परिस्थिती समजावून सांगितली. संचारबंदीला जिल्हा व्यापारी महासंघाचा पाठिंबा असेल. अशी परिस्थिती पुढे येऊ नये यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन काळजी घेईल. अर्थकारणाला खीळ बसू नये, असे मत उद्योजक मानसिंह पवार आणि जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी व्यक्त केले.

उत्पादन आणि ग्राहकांची साखळी तुटेलउद्योग चालू करणे आणि बंद करणे ही एक सायकल आहे. पूर्ण एक आठवड्याची मेहनत लागते. कामगार गावाकडे जातात. उत्पादन आणि ग्राहकांची साखळी तुटते. सिंगल सोर्स सप्लायर, क्रिटिकल आॅर्डर असतात, त्यांचे नियोजन खर्चिक आहे. पूर्ण चर्चेअंती नुकसान सर्व बाजूने होत असल्याचे समोर आले, मग प्राधान्य येथील आरोग्यासाठी देण्याचे ठरले. सोशल सिस्टिम आणि इकॉनॉमिक सिस्टिममधील फायदे आणि तोट्यांचे विश्लेषण मांडले, तर यात औरंगाबादचे आरोग्याच्या दृष्टीने मोठे नुकसान होईल, असे समोर आले. किराणा, मेडिकल, भाजी हे बंद  करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहर बंद होते तेव्हा तेथेच अडचण असते; परंतु उद्योग बंद झाल्यावर परदेशासह देशातील ग्राहकांची साखळी तुटते. त्यांना येथे काय चालले याच्याशी काही संबंध नसतो; परंतु शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेला सहकार्य म्हणून निर्णय घेतला आहे, असे सीआयआयचे झोन अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले. 

लॉकडाऊनची सूचना दोन दिवसांनंतर :लॉकडाऊनबाबतची अधिसूचना महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त हे संयुक्तपणे काढतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले. सोमवारी याबाबत महापालिकेत विचारणा केली असता रात्रीपर्यंत ही अधिसूचना जारी करण्याबाबत काहीच हालचाल झालेली नव्हती. लॉकडाऊनच्या आराखड्याबाबत येत्या दोन दिवसांत सर्वंकष माहितीची अधिसूचना महापालिका जारी करील, अशी माहिती मिळाली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद