शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

पुन्हा लॉकडाऊन : सावरत असलेल्या कारखान्यांना धक्का; उद्योग क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 16:49 IST

मार्च महिन्यापासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे त्रस्त असलेल्या उद्योग क्षेत्राला अनलॉकमुळे दिलासा मिळून उद्योग क्षेत्र गती घेत होते.

ठळक मुद्दे भविष्यात लॉकडाऊन नकोऔरंगाबादच्या अर्थकारणाला खीळ बसण्याची शक्यता

औरंगाबाद : शहरात आणि औद्योगिक क्षेत्रात १० जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याने सावरत असलेल्या औद्योगिक क्षेत्रातून याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.  

मार्च महिन्यापासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे त्रस्त असलेल्या उद्योग क्षेत्राला अनलॉकमुळे दिलासा मिळून उद्योग क्षेत्र गती घेत होते. मात्र, शहर व जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे उद्योग क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या निर्णयामुळे उद्योगांचे मोठे नुकसान होणार असल्याची मते उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहेत. 

उद्योग क्षेत्रातील संघटनांचे प्रतिनिधी म्हणतात...

भविष्यात संचारबंदी पाळणार नाहीउद्योग सुरू राहावेत ही आमची जबाबदारी आहे. प्रशासनाची गरज आणि आरोग्य सुविधांवर वाढणाऱ्या भारावर उपाय म्हणून उद्योग १० जुलैपासून बंद स्वीकारू; परंतु भविष्यात अशा अडचणी येऊ नयेत म्हणून संचारबंदी करू नये. प्रशासनासोबत काम करून सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योजक पुढे येतील. आज उद्योजकांनी तात्पुरता बंद स्वीकारला आहे. याचा अर्थ भविष्यात बंद स्वीकारला जाईल, असा होत नाही. सर्व एमआयडीसी क्षेत्र बंद असेल. उद्योगांच्या चुकांमुळे कोरोना पसरला नाही, असे मत उद्योजक राम भोगले यांनी व्यक्त केले. 

अशी परिस्थिती पुढे येऊ नयेशहरातील उद्योजक, लघु उद्योजक, व्यापाऱ्यांशी चर्चा करून प्रशासनाने सर्वांना परिस्थिती समजावून सांगितली. संचारबंदीला जिल्हा व्यापारी महासंघाचा पाठिंबा असेल. अशी परिस्थिती पुढे येऊ नये यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन काळजी घेईल. अर्थकारणाला खीळ बसू नये, असे मत उद्योजक मानसिंह पवार आणि जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी व्यक्त केले.

उत्पादन आणि ग्राहकांची साखळी तुटेलउद्योग चालू करणे आणि बंद करणे ही एक सायकल आहे. पूर्ण एक आठवड्याची मेहनत लागते. कामगार गावाकडे जातात. उत्पादन आणि ग्राहकांची साखळी तुटते. सिंगल सोर्स सप्लायर, क्रिटिकल आॅर्डर असतात, त्यांचे नियोजन खर्चिक आहे. पूर्ण चर्चेअंती नुकसान सर्व बाजूने होत असल्याचे समोर आले, मग प्राधान्य येथील आरोग्यासाठी देण्याचे ठरले. सोशल सिस्टिम आणि इकॉनॉमिक सिस्टिममधील फायदे आणि तोट्यांचे विश्लेषण मांडले, तर यात औरंगाबादचे आरोग्याच्या दृष्टीने मोठे नुकसान होईल, असे समोर आले. किराणा, मेडिकल, भाजी हे बंद  करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहर बंद होते तेव्हा तेथेच अडचण असते; परंतु उद्योग बंद झाल्यावर परदेशासह देशातील ग्राहकांची साखळी तुटते. त्यांना येथे काय चालले याच्याशी काही संबंध नसतो; परंतु शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेला सहकार्य म्हणून निर्णय घेतला आहे, असे सीआयआयचे झोन अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले. 

लॉकडाऊनची सूचना दोन दिवसांनंतर :लॉकडाऊनबाबतची अधिसूचना महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त हे संयुक्तपणे काढतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले. सोमवारी याबाबत महापालिकेत विचारणा केली असता रात्रीपर्यंत ही अधिसूचना जारी करण्याबाबत काहीच हालचाल झालेली नव्हती. लॉकडाऊनच्या आराखड्याबाबत येत्या दोन दिवसांत सर्वंकष माहितीची अधिसूचना महापालिका जारी करील, अशी माहिती मिळाली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद