शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : एमआयएमचे पारडे झुकले शिवसेनेकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 17:55 IST

एमआयएमच्या सर्व २४ नगरसेवकांनी युतीलाच मतदान केल्याची चर्चा

ठळक मुद्देराष्ट्रवादीचीही फाटाफूट  काँग्रेसच्या हक्काच्या मतदानावरही संशय

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सोमवारी मतदान घेण्यात आले. औरंगाबाद महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमचा कल शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराकडे दिसून आला. गोपनीय पद्धतीने झालेल्या या मतदानात एमआयएमच्या सर्व २४ नगरसेवकांनी युतीलाच मतदान केल्याचे बोलले जात आहे. यावर २२ ऑगस्ट रोजी अंतिम शिक्कामोर्तब होईल.

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघात दोनच प्रमुख उमेदवार होते. शिवसेना-भाजप युतीचे अंबादास दानवे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे बाबूराव कुलकर्णी. या निवडणुकीत कुलकर्णी निवडणूक लढवत असल्याचे चित्र कुठेच दिसून आले नाही. त्यामुळे दानवे यांनी शेवटच्या क्षणी एमआयएम, अपक्षांना आपल्याकडे ओढण्यासाठी कसरत सुरू केली. कुलकर्णी अजिबात लक्ष देत नसल्याने एमआयएमसह इतर काही नगरसेवकांचा नाईलाज झाला. मागील साडेचार वर्षांपासून चातकासारखी या निवडणुकीची नगरसेवक वाट पाहत होते. नगरसेवकांच्या अपेक्षांचा डोंगर बराच मोठा होता. कारण मागील निवडणुकांमध्ये मतदार चांगलाच ‘भाव’खात आले आहेत. या निवडणुकीत अपेक्षांचा बाजार चांगलाच मंदावला होता. शेवटच्या क्षणाला एमआयएम, अपक्ष, राष्टÑवादीने मतदानाचा हक्क बजावला. दुपारी ३ वा. एमआयएमने एकत्र येत मतदान केले. ही सर्व मते शिवसेनेच्या पारड्यात जाणार असल्याचे बोलले जात आहे. २२ आॅगस्ट रोजी मतमोजणी असून, याच दिवशी कोणाचे मत कुठे गेले यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

कारागृहातून मतीनही आले...एमआयएम पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले आणि सध्या हर्सूल कारागृहात असलेले नगरसेवक सय्यद मतीनही मतदानासाठी आज तहसील कार्यालयात आले होते. त्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतीन यांचे वडील, नातेवाईक उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहतमहापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच सदस्य आहेत. अलीकडेच एका सदस्याने वंचितमध्ये प्रवेश केला आहे. उर्वरित चार जणांनीही मतदान केले. सेना नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ३.४५ वाजता मतदान केले.

काँग्रेसमध्येही फाटाफूटकाँग्रेसचे उमेदवार बाबूराव कुलकर्णी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांना साधे फोनही केले नाही. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक असंतोषाची भावना खदखदत होती. हा असंतोष सेनेला फायदेशीर ठरल्याची चर्चा आज दिवसभर होती.

शिवसेनेचा दावा ५३०शिवसेनेने या निवडणुकीत चांगलीच ‘फिल्डिंग’लावली होती. नियोजित व्यूहरचनेनुसार सेनेने आपले मतदान अगोदर करून घेतले. त्यानंतर शेवटच्या क्षणी जेवढे गळाला लागतील तेवढे मतदान आपल्या बाजूने करून घेतले. ६४७ पैकी किमान ५३० मते पडतील, असा दावाही सेना नेत्यांनी केला आहे. 

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादJalanaजालना