शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : एमआयएमचे पारडे झुकले शिवसेनेकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 17:55 IST

एमआयएमच्या सर्व २४ नगरसेवकांनी युतीलाच मतदान केल्याची चर्चा

ठळक मुद्देराष्ट्रवादीचीही फाटाफूट  काँग्रेसच्या हक्काच्या मतदानावरही संशय

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सोमवारी मतदान घेण्यात आले. औरंगाबाद महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमचा कल शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराकडे दिसून आला. गोपनीय पद्धतीने झालेल्या या मतदानात एमआयएमच्या सर्व २४ नगरसेवकांनी युतीलाच मतदान केल्याचे बोलले जात आहे. यावर २२ ऑगस्ट रोजी अंतिम शिक्कामोर्तब होईल.

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघात दोनच प्रमुख उमेदवार होते. शिवसेना-भाजप युतीचे अंबादास दानवे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे बाबूराव कुलकर्णी. या निवडणुकीत कुलकर्णी निवडणूक लढवत असल्याचे चित्र कुठेच दिसून आले नाही. त्यामुळे दानवे यांनी शेवटच्या क्षणी एमआयएम, अपक्षांना आपल्याकडे ओढण्यासाठी कसरत सुरू केली. कुलकर्णी अजिबात लक्ष देत नसल्याने एमआयएमसह इतर काही नगरसेवकांचा नाईलाज झाला. मागील साडेचार वर्षांपासून चातकासारखी या निवडणुकीची नगरसेवक वाट पाहत होते. नगरसेवकांच्या अपेक्षांचा डोंगर बराच मोठा होता. कारण मागील निवडणुकांमध्ये मतदार चांगलाच ‘भाव’खात आले आहेत. या निवडणुकीत अपेक्षांचा बाजार चांगलाच मंदावला होता. शेवटच्या क्षणाला एमआयएम, अपक्ष, राष्टÑवादीने मतदानाचा हक्क बजावला. दुपारी ३ वा. एमआयएमने एकत्र येत मतदान केले. ही सर्व मते शिवसेनेच्या पारड्यात जाणार असल्याचे बोलले जात आहे. २२ आॅगस्ट रोजी मतमोजणी असून, याच दिवशी कोणाचे मत कुठे गेले यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

कारागृहातून मतीनही आले...एमआयएम पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले आणि सध्या हर्सूल कारागृहात असलेले नगरसेवक सय्यद मतीनही मतदानासाठी आज तहसील कार्यालयात आले होते. त्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतीन यांचे वडील, नातेवाईक उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहतमहापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच सदस्य आहेत. अलीकडेच एका सदस्याने वंचितमध्ये प्रवेश केला आहे. उर्वरित चार जणांनीही मतदान केले. सेना नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ३.४५ वाजता मतदान केले.

काँग्रेसमध्येही फाटाफूटकाँग्रेसचे उमेदवार बाबूराव कुलकर्णी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांना साधे फोनही केले नाही. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक असंतोषाची भावना खदखदत होती. हा असंतोष सेनेला फायदेशीर ठरल्याची चर्चा आज दिवसभर होती.

शिवसेनेचा दावा ५३०शिवसेनेने या निवडणुकीत चांगलीच ‘फिल्डिंग’लावली होती. नियोजित व्यूहरचनेनुसार सेनेने आपले मतदान अगोदर करून घेतले. त्यानंतर शेवटच्या क्षणी जेवढे गळाला लागतील तेवढे मतदान आपल्या बाजूने करून घेतले. ६४७ पैकी किमान ५३० मते पडतील, असा दावाही सेना नेत्यांनी केला आहे. 

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादJalanaजालना