शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : एमआयएमचे पारडे झुकले शिवसेनेकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 17:55 IST

एमआयएमच्या सर्व २४ नगरसेवकांनी युतीलाच मतदान केल्याची चर्चा

ठळक मुद्देराष्ट्रवादीचीही फाटाफूट  काँग्रेसच्या हक्काच्या मतदानावरही संशय

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सोमवारी मतदान घेण्यात आले. औरंगाबाद महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमचा कल शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराकडे दिसून आला. गोपनीय पद्धतीने झालेल्या या मतदानात एमआयएमच्या सर्व २४ नगरसेवकांनी युतीलाच मतदान केल्याचे बोलले जात आहे. यावर २२ ऑगस्ट रोजी अंतिम शिक्कामोर्तब होईल.

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघात दोनच प्रमुख उमेदवार होते. शिवसेना-भाजप युतीचे अंबादास दानवे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे बाबूराव कुलकर्णी. या निवडणुकीत कुलकर्णी निवडणूक लढवत असल्याचे चित्र कुठेच दिसून आले नाही. त्यामुळे दानवे यांनी शेवटच्या क्षणी एमआयएम, अपक्षांना आपल्याकडे ओढण्यासाठी कसरत सुरू केली. कुलकर्णी अजिबात लक्ष देत नसल्याने एमआयएमसह इतर काही नगरसेवकांचा नाईलाज झाला. मागील साडेचार वर्षांपासून चातकासारखी या निवडणुकीची नगरसेवक वाट पाहत होते. नगरसेवकांच्या अपेक्षांचा डोंगर बराच मोठा होता. कारण मागील निवडणुकांमध्ये मतदार चांगलाच ‘भाव’खात आले आहेत. या निवडणुकीत अपेक्षांचा बाजार चांगलाच मंदावला होता. शेवटच्या क्षणाला एमआयएम, अपक्ष, राष्टÑवादीने मतदानाचा हक्क बजावला. दुपारी ३ वा. एमआयएमने एकत्र येत मतदान केले. ही सर्व मते शिवसेनेच्या पारड्यात जाणार असल्याचे बोलले जात आहे. २२ आॅगस्ट रोजी मतमोजणी असून, याच दिवशी कोणाचे मत कुठे गेले यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

कारागृहातून मतीनही आले...एमआयएम पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले आणि सध्या हर्सूल कारागृहात असलेले नगरसेवक सय्यद मतीनही मतदानासाठी आज तहसील कार्यालयात आले होते. त्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतीन यांचे वडील, नातेवाईक उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहतमहापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच सदस्य आहेत. अलीकडेच एका सदस्याने वंचितमध्ये प्रवेश केला आहे. उर्वरित चार जणांनीही मतदान केले. सेना नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ३.४५ वाजता मतदान केले.

काँग्रेसमध्येही फाटाफूटकाँग्रेसचे उमेदवार बाबूराव कुलकर्णी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांना साधे फोनही केले नाही. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक असंतोषाची भावना खदखदत होती. हा असंतोष सेनेला फायदेशीर ठरल्याची चर्चा आज दिवसभर होती.

शिवसेनेचा दावा ५३०शिवसेनेने या निवडणुकीत चांगलीच ‘फिल्डिंग’लावली होती. नियोजित व्यूहरचनेनुसार सेनेने आपले मतदान अगोदर करून घेतले. त्यानंतर शेवटच्या क्षणी जेवढे गळाला लागतील तेवढे मतदान आपल्या बाजूने करून घेतले. ६४७ पैकी किमान ५३० मते पडतील, असा दावाही सेना नेत्यांनी केला आहे. 

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादJalanaजालना