शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

शहरात लोडशेडिंग अटळ

By admin | Updated: June 14, 2016 00:12 IST

औरंगाबाद : भारनियमनमुक्त असलेल्या औरंगाबाद शहरालाही आता लोडशेडिंगचे चटके बसणार आहेत

औरंगाबाद : भारनियमनमुक्त असलेल्या औरंगाबाद शहरालाही आता लोडशेडिंगचे चटके बसणार आहेत. वीज चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे महावितरणच्या परिमंडळ कार्यालयाने शहरात पुन्हा लोडशेडिंग लागू करण्याची तयारी चालविली आहे. परिमंडळ कार्यालयाकडून सध्या तसा प्रस्ताव तयार केला जात आहे. परिस्थितीत फारसा बदल न झाल्यास दोन महिन्यांतच लोडशेडिंग लागू करावी लागेल, असे खुद्द महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळ कार्यालयाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सोमवारी स्पष्ट केले. औरंगाबाद शहरात मागील काही महिन्यांपासून वीज गळतीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. सध्या हे प्रमाण ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. यामध्ये यंत्रणेतील दोषामुळे होणारी हानी आणि वीज चोरी या दोन्हीचा समावेश आहे. चोरी थांबवून वीज गळती कमी करण्यासाठी महावितरण कंपनीने महिनाभरापूर्वी दहा भरारी पथके स्थापन केली. या पथकांनी शहरातील विविध भागांत सुमारे १६० जणांवर दंडात्मक कारवाई केली; परंतु त्यानंतरही गळतीचे प्रमाण कमी झालेले नाही. सद्य:स्थितीत शहरातील ८४ पैकी केवळ ८ फिडरवरच वीज चोरी नाही. उर्वरित सर्व ७६ फिडरवर वीज चोरी होत आहे. महावितरण कंपनीच्या धोरणानुसार वीज चोरीचे प्रमाण अधिक असलेल्या ठिकाणी लोडशेडिंग लागू केले जाते. त्यानुसार आता परिमंडळ कार्यालयाने औरंगाबाद शहरातही लोडशेडिंग लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यासाठी तसा प्रस्तावच या कार्यालयाकडून बनविला जात आहे. याविषयी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, शहरात वीज चोरीचे प्रमाण खूपच अधिक आहे. शिवाय हे प्रमाण जवळपास सर्वच फिडरवर आहे. महिनाभरात आम्ही पथकांमार्फत दीडशेहून अधिक कारवाया केल्या. तरीही वीज चोरी कमी झालेली नाही. त्यामुळे आता आम्ही लोडशेडिंगचा विचार करीत आहोत. तसा प्रस्तावही तयार केला जाणार आहे. वीज चोरी कमी करण्याचा प्रयत्न सध्याही सुरूच आहे. त्याला आणखी गतिमान केले जाईल; परंतु दोन महिन्यांत परिस्थिती बदलली नाही तर लोडशेडिंगची अंमलबजावणी करावीच लागेल. त्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय असणार नाही. महावितरण कंपनीने सहा वर्षांपूर्वी राज्यातील महसुली मुख्यालयाची शहरे भारनियमनमुक्त घोषित केली. तेव्हापासून औरंगाबाद शहरात लोडशेडिंग बंद झाले आहे. ४काही वर्षांपूर्वी शहरात वीज गळतीचे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांच्या आत होते. मात्र, आता हे प्रमाण ४५ टक्के झाले आहे. त्यामुळे आता भारनियमनमुक्तीपासून पुन्हा एकदा भारनियमन सक्तीचा प्रवास सुरू झाला आहे. महावितरण कंपनीने महिनाभरात शहरात वीज चोरांविरुद्ध कारवाईची धडक मोहीम राबविली. यामध्ये वीज चोऱ्या तर पकडण्यात आल्याच; परंतु त्यासोबतच आतापर्यंत बिलच आकारले जात नसलेले काही ग्राहकही आढळून आले.