शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

शहरात लोडशेडिंग अटळ

By admin | Updated: June 14, 2016 00:12 IST

औरंगाबाद : भारनियमनमुक्त असलेल्या औरंगाबाद शहरालाही आता लोडशेडिंगचे चटके बसणार आहेत

औरंगाबाद : भारनियमनमुक्त असलेल्या औरंगाबाद शहरालाही आता लोडशेडिंगचे चटके बसणार आहेत. वीज चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे महावितरणच्या परिमंडळ कार्यालयाने शहरात पुन्हा लोडशेडिंग लागू करण्याची तयारी चालविली आहे. परिमंडळ कार्यालयाकडून सध्या तसा प्रस्ताव तयार केला जात आहे. परिस्थितीत फारसा बदल न झाल्यास दोन महिन्यांतच लोडशेडिंग लागू करावी लागेल, असे खुद्द महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळ कार्यालयाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सोमवारी स्पष्ट केले. औरंगाबाद शहरात मागील काही महिन्यांपासून वीज गळतीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. सध्या हे प्रमाण ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. यामध्ये यंत्रणेतील दोषामुळे होणारी हानी आणि वीज चोरी या दोन्हीचा समावेश आहे. चोरी थांबवून वीज गळती कमी करण्यासाठी महावितरण कंपनीने महिनाभरापूर्वी दहा भरारी पथके स्थापन केली. या पथकांनी शहरातील विविध भागांत सुमारे १६० जणांवर दंडात्मक कारवाई केली; परंतु त्यानंतरही गळतीचे प्रमाण कमी झालेले नाही. सद्य:स्थितीत शहरातील ८४ पैकी केवळ ८ फिडरवरच वीज चोरी नाही. उर्वरित सर्व ७६ फिडरवर वीज चोरी होत आहे. महावितरण कंपनीच्या धोरणानुसार वीज चोरीचे प्रमाण अधिक असलेल्या ठिकाणी लोडशेडिंग लागू केले जाते. त्यानुसार आता परिमंडळ कार्यालयाने औरंगाबाद शहरातही लोडशेडिंग लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यासाठी तसा प्रस्तावच या कार्यालयाकडून बनविला जात आहे. याविषयी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, शहरात वीज चोरीचे प्रमाण खूपच अधिक आहे. शिवाय हे प्रमाण जवळपास सर्वच फिडरवर आहे. महिनाभरात आम्ही पथकांमार्फत दीडशेहून अधिक कारवाया केल्या. तरीही वीज चोरी कमी झालेली नाही. त्यामुळे आता आम्ही लोडशेडिंगचा विचार करीत आहोत. तसा प्रस्तावही तयार केला जाणार आहे. वीज चोरी कमी करण्याचा प्रयत्न सध्याही सुरूच आहे. त्याला आणखी गतिमान केले जाईल; परंतु दोन महिन्यांत परिस्थिती बदलली नाही तर लोडशेडिंगची अंमलबजावणी करावीच लागेल. त्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय असणार नाही. महावितरण कंपनीने सहा वर्षांपूर्वी राज्यातील महसुली मुख्यालयाची शहरे भारनियमनमुक्त घोषित केली. तेव्हापासून औरंगाबाद शहरात लोडशेडिंग बंद झाले आहे. ४काही वर्षांपूर्वी शहरात वीज गळतीचे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांच्या आत होते. मात्र, आता हे प्रमाण ४५ टक्के झाले आहे. त्यामुळे आता भारनियमनमुक्तीपासून पुन्हा एकदा भारनियमन सक्तीचा प्रवास सुरू झाला आहे. महावितरण कंपनीने महिनाभरात शहरात वीज चोरांविरुद्ध कारवाईची धडक मोहीम राबविली. यामध्ये वीज चोऱ्या तर पकडण्यात आल्याच; परंतु त्यासोबतच आतापर्यंत बिलच आकारले जात नसलेले काही ग्राहकही आढळून आले.