शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

एकाच भूवैज्ञानिकावर भार

By admin | Updated: February 17, 2016 00:33 IST

गजानन वानखडे , जालना गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा बसत असतानाच जिल्ह्यातील भू जल पातळीची पाहणी करणाऱ्या भू वैज्ञानिकांची दोन पदे दीड वर्षापासून रिक्त

गजानन वानखडे , जालनागेल्या चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा बसत असतानाच जिल्ह्यातील भू जल पातळीची पाहणी करणाऱ्या भू वैज्ञानिकांची दोन पदे दीड वर्षापासून रिक्त असल्याने जिल्ह्यातील अनेक भागात समस्या गंभीर झाली आहे. मात्र, जिल्हा परिषदेचे प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे. आगामी काळात दुष्काळाची दाहकता अधिक होणार असून, प्रशासनाने तात्काळ पावले उचलण्याची गरज आहे. जिल्ह्यात सलग चार वर्षांपासून आठही तालुक्याला पाणीटंचाईचे चटके बसत आहे. जिल्ह्यातील भूगर्भात जलपातळीची काय स्थिती आहे हे महत्वाचे काम या विभागाकडे आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात वरिष्ठ एक भूजलवैज्ञानिक आणि दोन कनिष्ठ वैज्ञानिकांची पदे मंजूर आहेत. त्यांनी दिलेल्या अहवालावरच ग्रामीण भागात पाणीटंचाई नियोजनाचे काम केले जाते. परंतु एक वर्षापेक्षा जास्त काळापासून ग्रामीण पाणी पुरवठा विभागात वरिष्ठ भूवैज्ञानिकाचे आणि कनिष्ठ वैज्ञानिकांची पदे रिक्त आहेत. ज्यांच्या अहवालावरच जिल्ह्यातील कोणत्याही नवीन पाणीपुरवठा योजना, विंधनविहिरींची दुरूस्ती, खोलीकरण, एमआरजीएसच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विहिरी कूपनलिकांसाठी वरिष्ठ भू वैज्ञानिकांचे प्रमाणपत्र गरजेचे असते. परंतु भू वैज्ञानिकांचे पद रिक्त असल्याने प्रभारी कनिष्ठ भूवैज्ञानिकावर या विभागाचा कारभार सुरू आहे. जिल्ह्यातील ९७२ गावांतील भूजल स्थिती जाणून घेण्यासाठी एका वैज्ञानिकाला प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य नाही. परिणामी पाहणी न करताच अनेक अहवाल देण्यात आल्याचे समोर आले आहे.अनेक तालुक्यांत होत असलेल्या कामांचे अहवाल चुकीचे जात आहेत. विशेष म्हणजे भूवैज्ञानिकांनी दिलेल्या अहवालावरच जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग काम करत असल्याने शासनाच्या लाखो रूपयांचा चुराडा होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री पद जिल्ह्याला मिळाले आहे. परंतु त्याच जिह्यात भू वैज्ञानिकांचे पदे रिक्त कसे काय असा सवाल ग्रामीण भागातील जनतेतून उपस्थित केला जात आहे.