शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

नाथसागरात महिनाभर पुरेल एवढा जिवंत जलसाठा

By admin | Updated: June 30, 2014 01:03 IST

औरंगाबाद : नाथसागरात (जायकवाडी धरण) एक महिना पुरेल एवढा उपयुक्त (जिवंत) जलसाठा आहे.

औरंगाबाद : नाथसागरात (जायकवाडी धरण) एक महिना पुरेल एवढा उपयुक्त (जिवंत) जलसाठा आहे. त्यानंतर मृतजलसाठ्यातून पाणी उपसा करावा लागेल. पाऊस लांबला तर शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांवर पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. पावसाळा लांबला तर तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक पालिकेला करावे लागण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने आज मनपाचे पदाधिकारी आणि अभियंत्यांनी नाथसागराची पाहणी केली. डाव्या कालव्याशेजारी १४०० आणि ७०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीसाठी पंपांद्वारे पाणी उपसले जाते. त्या पंपांच्या तोंडाशी गवताचे जाळे झाल्यामुळे पाण्याचा उपसा कमी होतो आहे. परिणामी पाणीटंचाई जाणवत आहे. शहरातील काही वॉर्डांमध्ये पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी वाढल्या आहेत. जायकवाडीत सध्या पाणीसाठा आहे; परंतु शहरात पाणी येण्यात अनेक अडचणी आहेत. जलवाहिन्यांची गळती, उपसा पंपाजवळ आलेले गवत, यामुळे कमी प्रमाणात पाणी उपसले जात आहे. शहरात पाण्याची मागणी वाढलेली आहे. नाथसागरात एक महिना पुरेल एवढा जिवंत जलसाठा आहे. त्यानंतर मृत जलसाठ्यातून पाणी घ्यावे लागणार आहे, असे महापौर कला ओझा यांनी सांगितले. आढावा महापौर कला ओझा यांनी आज उपमहापौर संजय जोशी, सभापती विजय वाघचौरे, सभागृह नेते किशोर नागरे, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, वीरभद्र गादगे, नगरसेवक महेश माळवतकर, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता यू.जी. शिरसाठ, वसंत निकम यांच्यासह धरणातील पाण्याचा व उपसा पंप केंद्राचा आढावा घेतला.अपव्यय टाळावाशहराला गतवर्षी केलेल्या अ‍ॅप्रोच चॅनलमुळे पाणीपुरवठा होईल. त्यामुळे सध्या तरी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार नाही. मात्र, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, अपव्यय टाळावा, असे आवाहन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले. धरणातील पाणीसाठा४४५६.०७३ मीटरजिवंत जलसाठा४८७.६०९ एम.एम.क्युब शहराची पाण्याची गरज४रोज २०० एमएलडी४येते १३० एमएलडीपाण्याचे स्रोत४हर्सूल तलाव, जायकवाडी, विहिरी, हातपंप गवत काढण्याचे काम सुरूउपसा पंपांजवळ आलेले गवत पाणबुड्यांच्या मदतीने काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पंपांच्या तोंडाशी गाळ अडकल्यास पाणी उपसण्यास अडचणी येतात, असे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सांगितले