शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

साक्षर भारत’च्या प्रेरकांचे मानधन रखडले

By admin | Updated: August 12, 2014 01:59 IST

कौठा : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय साक्षरता मिशन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबविण्यात येत असलेल्या साक्षर भारत योजनेअंतर्गत अतिशय उत्साहात सुरू

कौठा : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय साक्षरता मिशन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबविण्यात येत असलेल्या साक्षर भारत योजनेअंतर्गत अतिशय उत्साहात सुरू झालेल्या यातील प्रेरकांना मानधन मिळत नसल्यामुळे योजनेचा बोजवारा उडाला आहे.२०१० च्या जनगणनेनुसार ज्या जिल्ह्यामध्ये महिला साक्षरतेचे प्रमाण ५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी आहे. अशा ३६५ जिल्ह्यात व राज्यातील जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, लातूर, गडचिरोली, गोंदीया व नंदुरबार या दहा जिल्ह्यांत ही साक्षर भारत योजना सुरू करण्यात आली. या योजनेसाठी समावेशीत जिल्हा व तालुक्यातील गावात प्रेरक नेमणुकीसंदर्भात शिक्षण संचालक, अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या निर्णयान्वये प्रेरक, प्रेरकांची नियुक्ती करण्यात आली. या अध्यादेशात स्पष्ट केले आहे की, नियुक्त प्रेरक, प्रेरकांचे मानधन प्रत्येक महिन्याला बँकेमार्फत देणे बंधनकारक आहे. असे असले तरी २ जानेवारी २०१२ रोजी नियुक्त झालेल्या प्रेरकांना आतापर्यंत फक्त सुरूवातीच्या तीन महिन्यांचेच मानधन मिळालेले आहे. मागील दोन वर्षांपासून प्रेरकांना मानधनच मिळालेले नाही. या साक्षर भारत योजनेअंतर्गत समावेशित जिल्हा व तालुक्यातील निरक्षर व्यक्ती शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडल्या जात आहेत. यासाठी राज्यात अनेक प्रेरक- प्रेरिका नियुक्त करण्यात आल्या आहेत; परंतु मानधनाअभावी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी शिक्षण विभागाकडे प्रेरक -पे्ररिका यांच्यामध्ये तीव्र असंतोष आहे. याबाबत शिक्षण विभाग वसमत येथील साक्षर भारत योजनेतील महिला साधन व्यक्ती गव्हाणे यांच्याशी संपर्क साधला असता, प्रेरकांच्या मानधनाचा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू असून मानधनाची मागणी वरिष्ठ स्तरावर केल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)