शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

‘साक्षर भारत’ ठप्प !

By admin | Updated: May 19, 2014 01:05 IST

उस्मानाबाद : निरक्षरांना अक्षर ओळख व्हावी, या उद्देशाने निरंतर शिक्षण विभागाच्या साक्षर भारत अभियान राबविण्यात येत आहे.

उस्मानाबाद : निरक्षरांना अक्षर ओळख व्हावी, या उद्देशाने निरंतर शिक्षण विभागाच्या साक्षर भारत अभियान राबविण्यात येत आहे. मात्र प्रौढांणा शिक्षणाचे धेडे देणार्‍या १ हजार २४४ प्रेरकांना मागील १९ महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. जिल्हाभरातील सुमारे ६२१ ग्रामपंचायतीतील रात्रीचे वर्ग बंद आहेत. प्रौढ व्यक्तींचे निरक्षरतेचे प्रमाण लक्षात घेवून शासनाने साक्षर भारत अभियान सुरु केले. हे अभियान यशस्वीरित्या राबविले जावे, यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. यासाठी जिल्हास्तरावरील निरंतर शिक्षण विभागात शिक्षणाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. सुरुवातीला या अभियानाला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र कालांतराने या अभियानांतर्गत प्रौढांना शिक्षणाचे धडे देण्यात आले. नेमण्यात आलेल्या प्रेरकांचे मानधन वेळेत न मिळाल्यामुळे या अभियानालाच मरगळ आली आहे. जिल्हाभरात ६२१ ग्रामपंचायती अंतर्गत रात्रीचे वर्ग सुरु होते. विशेष म्हणजे यावर्षी तब्बल ४ हजार ८४३ प्रौढ नवसाक्षरांनी परीक्षा दिली. हे अभियान चांगल्या पद्धतीने सुरु असतानाच प्रेरकांच्या मानधनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मानधनासाठी प्रेरकांकडून वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. मात्र या आंदोलकांची वरीष्ठ कार्यालयाकडून केवळ आश्वासनावरच बोळवण केली गेली. वारंवार पाठपुरावा करुनही मानधन मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर प्रेरकांनी हे वर्ग बंद केले आहेत. कष्टाचा मोबदला मिळत नसेल तर वर्ग तर चालविणार कसे? असा सवाल उपस्थित केला जावू लागला आहे. जिल्हाभरात सुमारे १२४४ प्रेरक नियुक्त करण्यात आले होते. त्यांना प्रतिमहा २ हजार रुपये इतके मानधन ठरवून देण्यात आले होते. इतके तुटपुंजे मानधन असतानाही शासनाकडून ते वेळेवर मिळत नसल्याने जिल्हाभरातील प्रेरकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी) कुटुंब सर्वेचे काम ७० टक्के होवूनही शासनाकडून ठेंगा जिल्ह्यातील कुटुंब सर्वेचे काम ७० टक्क्यांपर्यंत पूर्ण करा, त्यानंतर मानधन दिले जाईल, हे गाजर शिक्षण संचालकांनी दाखविले होते. या आशेवर निरंतर शिक्षण विभागाने प्रेरकांच्या माध्यमातून कुटुंब सर्वेचे काम ८३ टक्के पूर्ण केले. त्यानंतर मानधनाची मागणी करण्यात आली. मात्र शिक्षण संचालक कार्यालयाने हा शब्द पाळला नाही. आता शंभर टक्के काम पूर्ण करा, असे सांगण्यात आले आहे. मात्र मानधनच मिळत नसल्याने काम तरी कसे करणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे.