शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

पेटून उठा, रस्त्यावर उतरा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:03 IST

पेटून उठा, रस्त्यावर उतरा... अन्यथा ‘हे लोक’(भाजपवाले) तुम्हाला संपवून टाकतील, असा गंभीर इशारा महाराष्टÑाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पेटून उठा, रस्त्यावर उतरा... अन्यथा ‘हे लोक’(भाजपवाले) तुम्हाला संपवून टाकतील, असा गंभीर इशारा महाराष्टÑाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे दिला.संत तुकाराम महाराज नाट्यगृहात आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास ते मार्गदर्शन करीत होते. तब्बल तासाभराच्या आपल्या भाषणात त्यांनी, जीएसटी, नोटाबंदी, बुलेट ट्रेन, शेतक-यांची कर्जमाफी, बेरोजगारी,सोडून देण्यात आलेला डीएमआयसी प्रकल्प, राज्य सरकारातील मंत्र्यांचा भ्रष्टाचार, नरेंद्र मोदी यांची सतत चालू असलेली थापेबाजी, लोकांमध्ये जाऊन करावयाची जागृती या मुद्यांवर सविस्तर विश्लेषण केले.‘ त्या’ मंत्र्यांना पदावर ठेवू नका...राज्य मंत्रिमंडळातील प्रकाश मेहता व सुभाष देसाई यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे समोर आलेले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या मंत्र्यांना दिली त्या प्रमाणे क्लीन चीट देण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवली नाही. त्यांची चौकशी सुरू केली आहे; पण त्यामुळे आम्ही समाधानी नाही. ही चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फतच झाली पाहिजे आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत या मंत्र्यांना पदावरून सारले पाहिजे, अशी रोखठोक भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी मांडली.प्रारंभी, दीप प्रज्वलित करण्यात आले. त्यानंतर चव्हाण यांचा एका मोठ्या हाराने स्वागत करण्यात आले. डॉ. कल्याण काळे यांनी प्रास्ताविक केले. सायंकाळी सहाचा मेळावा रात्री ८.१५ वा. सुरु झाला, तोपर्यंत विविध कार्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीने भाषणे करून नरेंद्र मोदींच्या थापेबाजीवर जोरदार टीका केली. मेळावा सुरूझाल्यानंतर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष एम.एम. शेख, शहराध्यक्ष नामदेव पवार, निरीक्षक संतोष सिंग यांची भाषणे झाली. २०१९ ची तयारी करा, मरगळ झटकून उठा, लोकांपर्यंत पोहोचून नरेंद्र मोदी यांची थापेबाजी कशी सुरूआहे, हे पटवून द्या, बुथ कमिट्या मजबूत करा आणि आगामी सर्व निवडणुका जिंकून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून द्या, असे आवाहन आ. सत्तार यांनी केले. डॉ. पवन डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले. मंचावर अनेक मान्यवर, महिला काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.एमजीएममध्ये व्याख्यानदरम्यान, येथील एमजीएम कॉलेज आॅफ जर्नालिझम अ‍ॅण्ड मास कम्युनिकेशनमध्ये ‘राजकारणात नैतिकता शिल्लक राहिली आहे का?’ या विषयावर व्याख्यान झाले.दररोज नवीन पक्ष येत आहेत. मागील आठवड्यातच राज्यात एक नवीन पक्ष निर्माण झाला. पक्ष निर्माण करणे म्हणजे एखादी सहकारी सोसायटी रजिस्टर करण्यासारखे झाले आहे. नाव ठरविले की झाला पक्ष; परंतु राजकीय पक्षांच्या संख्येवर कुठेतरी कायदेशीर मर्यादा आणली पाहिजे, असे म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाव न घेता काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नारायण राणेंना टोला लगावला.यावेळी मंचावर ‘एमजीएम’चे सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्राचार्य प्रताप बोराडे, प्राचार्या डॉ. रेखा शेळके, डॉ. एच. एस. शिंदे उपस्थित होते. नव्या सरकारने ‘इलेक्शन बाँड’ आणले आहेत. निवडणूक लढविण्यासाठी प्रचारात पैसा लागतो. त्यात खरा भ्रष्टाचार आणि नैतिकतेचे मूळ लपलेले आहे. त्यामुळे आधी हा विषय पारदर्शकपणे हाताळण्याची गरज आहे. राजकीय व्यक्तींच्या नैतिकतेबरोबरच माध्यमांची नैतिकता तेवढीच महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.