शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कर्जमाफीचे पत्र चक्क खोटे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:30 IST

शेतकºयाला बँकेने दिलेले कर्जमाफीचे पत्र पुन्हा एकदा चक्क खोटे ठरले आहे. तुम्हाला दिलेले कर्जमाफीचे पत्र नजरचुकीने दिल्याचे सांगत महाराष्ट्र बँकेच्या करमाड शाखेने शेतकºयाच्या बचत खात्यातील रक्कम परस्पर कर्जखात्यात वळती करून घेतली आहे.

ठळक मुद्देबँक म्हणते, नजरचुकीने माफ केले कर्ज : गोलटगावच्या शेतकऱ्याची आत्महत्येस परवानगी देण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती

श्रीकांत पोफळेशेंद्रा /दुधड : शेतकºयाला बँकेने दिलेले कर्जमाफीचे पत्र पुन्हा एकदा चक्क खोटे ठरले आहे. तुम्हाला दिलेले कर्जमाफीचे पत्र नजरचुकीने दिल्याचे सांगत महाराष्ट्र बँकेच्या करमाड शाखेने शेतकºयाच्या बचत खात्यातील रक्कम परस्पर कर्जखात्यात वळती करून घेतली आहे. त्यामुळे गोलटगाव (ता.औरंगाबाद) येथील शेतकरी मुसा अकबर पटेल यांनी प्रजासत्ताकदिनी (दि.२६ जानेवारी) बँकेत विष प्राशन करून आत्महत्येला परवानगी मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री, बँक व्यवस्थापनासह अनेकांना केली आहे.मुसा पठाण यांनी बँक आॅफ महाराष्ट्रच्या करमाड शाखेकडून चार वर्षांपूर्वी दीड लाख रुपये पीककर्ज घेतले होते; परंतु सततच्या दुष्काळामुळे ते कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. २०१६ च्या शासन आदेशानुसार त्यांना बँकेकडून कर्जाचे पुनर्गठन करून परत ६८ हजार रुपये वाढीव कर्ज देण्यात आले. महाराष्ट्र शासनाने पुढे दुष्काळामुळे शेतकºयांचे कर्ज माफ केले. या योजनेत पठाण यांनाही कर्जमाफीचे पत्र बँकेने दिले होेते.मुसा पठाण यांना बँकेने एक लाख ७५ हजार रुपये नवीन कर्ज दिले; परंतु शासनाकडून दुष्काळात वाढीव मिळालेले कर्ज ६८ हजार रुपये व्याजासह ८१ हजार रुपये भरून घेण्यात आले. उर्वरित रक्कम सदर शेतकºयाच्या बचत खात्यात जमा करण्यात आली. सदर शेतकºयाने त्या बचत खात्यातून ३० हजार रु. काढले. उर्वरित रक्कम मुलीच्या लग्नासाठी बचत खात्यात जमा ठेवली; परंतु त्या खात्यातील रकमेतून बँक अधिकाºयांनी ४० हजार रुपये संबंधित शेतकºयाच्या कर्ज खात्यात परस्पर जमा केले.त्यानंतर मुसा पठाण यांनी बँके शी संपर्क साधला. तेव्हा तुमचे कर्ज माफ झालेले नाही. तुम्हाला जे कर्जमाफीचे पत्र देण्यात आले ते नजरचुकीने देण्यात आले, असे अधिकाºयांनी सांगितले.अधिकाºयांच्या खुलाशामुळे संतप्त झालेले शेतकरी मुसा पठाण यांनी प्रजासत्ताकदिनी बँकेसमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करणारे निवेदन मुख्यमंत्री, प्रधान सचिव, विभागीय सहनिबंधक, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, शाखा प्रबंधक आदींना पाठविले आहे.आधी कर्जमाफी, नंतर रद्दबँक अधिकाºयांनी माझी फसवणूक केली आहे. मला सुरुवातीला दीड लाख रुपये कर्ज माफ झाल्याचे पत्र दिले, नंतर मला वाढीव कर्जही दिले. आता मला बँकेकडून असे सांगण्यात आले आहे की, तुमचे कर्ज माफ झालेले नाही. माझ्या खात्यावरील रक्कम परस्पर काढून घेण्यात आली. बचत खात्यावरील रक्कम मी मुलीच्या लग्नासाठी ठेवली होती. मुलीचे लग्न २० दिवसांवर येऊन ठेपले आहे. आता मी काय करू?मुसा पठाण, शेतकरी, गोलटगाव-----------------------------------------नजरचुकीने दिले कर्जमाफीचे पत्रसंबंधित शेतकºयाला पूर्वीच्या अधिकाºयांकडून नजरचुकीने कर्जमाफीचे पत्र देण्यात आले; परंतु कर्जमाफीमध्ये सदर शेतकरी पात्र झालेला नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे जुलै २०१७ पर्यंत थकीत शेतकºयांचे कर्ज माफ झालेले आहे; परंतु पठाण यांनी घेतलेल्या कर्जाचा हप्ता डिसेंबर २०१७ मध्ये असल्याने या शेतकºयाला कर्जमाफीचा लाभ झालेला नाही. तरीसुद्धा वरिष्ठांना कर्जदार शेतकºयाच्या कर्जाचा तपशील पाठवला असून, वरिष्ठांनी कर्जमाफ करण्यास सहमती दर्शविली आहे. शेतकºयाचे खाते थकीत असल्याने त्यांच्या खात्यावरील ४० हजार रुपये काढण्याचा अधिकार बँकेला आहे.कैलास कच्छवे, शाखा व्यवस्थापकमहाराष्ट्र बँक

टॅग्स :FarmerशेतकरीBank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्र