शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कर्जमाफीचे पत्र चक्क खोटे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:30 IST

शेतकºयाला बँकेने दिलेले कर्जमाफीचे पत्र पुन्हा एकदा चक्क खोटे ठरले आहे. तुम्हाला दिलेले कर्जमाफीचे पत्र नजरचुकीने दिल्याचे सांगत महाराष्ट्र बँकेच्या करमाड शाखेने शेतकºयाच्या बचत खात्यातील रक्कम परस्पर कर्जखात्यात वळती करून घेतली आहे.

ठळक मुद्देबँक म्हणते, नजरचुकीने माफ केले कर्ज : गोलटगावच्या शेतकऱ्याची आत्महत्येस परवानगी देण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती

श्रीकांत पोफळेशेंद्रा /दुधड : शेतकºयाला बँकेने दिलेले कर्जमाफीचे पत्र पुन्हा एकदा चक्क खोटे ठरले आहे. तुम्हाला दिलेले कर्जमाफीचे पत्र नजरचुकीने दिल्याचे सांगत महाराष्ट्र बँकेच्या करमाड शाखेने शेतकºयाच्या बचत खात्यातील रक्कम परस्पर कर्जखात्यात वळती करून घेतली आहे. त्यामुळे गोलटगाव (ता.औरंगाबाद) येथील शेतकरी मुसा अकबर पटेल यांनी प्रजासत्ताकदिनी (दि.२६ जानेवारी) बँकेत विष प्राशन करून आत्महत्येला परवानगी मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री, बँक व्यवस्थापनासह अनेकांना केली आहे.मुसा पठाण यांनी बँक आॅफ महाराष्ट्रच्या करमाड शाखेकडून चार वर्षांपूर्वी दीड लाख रुपये पीककर्ज घेतले होते; परंतु सततच्या दुष्काळामुळे ते कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. २०१६ च्या शासन आदेशानुसार त्यांना बँकेकडून कर्जाचे पुनर्गठन करून परत ६८ हजार रुपये वाढीव कर्ज देण्यात आले. महाराष्ट्र शासनाने पुढे दुष्काळामुळे शेतकºयांचे कर्ज माफ केले. या योजनेत पठाण यांनाही कर्जमाफीचे पत्र बँकेने दिले होेते.मुसा पठाण यांना बँकेने एक लाख ७५ हजार रुपये नवीन कर्ज दिले; परंतु शासनाकडून दुष्काळात वाढीव मिळालेले कर्ज ६८ हजार रुपये व्याजासह ८१ हजार रुपये भरून घेण्यात आले. उर्वरित रक्कम सदर शेतकºयाच्या बचत खात्यात जमा करण्यात आली. सदर शेतकºयाने त्या बचत खात्यातून ३० हजार रु. काढले. उर्वरित रक्कम मुलीच्या लग्नासाठी बचत खात्यात जमा ठेवली; परंतु त्या खात्यातील रकमेतून बँक अधिकाºयांनी ४० हजार रुपये संबंधित शेतकºयाच्या कर्ज खात्यात परस्पर जमा केले.त्यानंतर मुसा पठाण यांनी बँके शी संपर्क साधला. तेव्हा तुमचे कर्ज माफ झालेले नाही. तुम्हाला जे कर्जमाफीचे पत्र देण्यात आले ते नजरचुकीने देण्यात आले, असे अधिकाºयांनी सांगितले.अधिकाºयांच्या खुलाशामुळे संतप्त झालेले शेतकरी मुसा पठाण यांनी प्रजासत्ताकदिनी बँकेसमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करणारे निवेदन मुख्यमंत्री, प्रधान सचिव, विभागीय सहनिबंधक, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, शाखा प्रबंधक आदींना पाठविले आहे.आधी कर्जमाफी, नंतर रद्दबँक अधिकाºयांनी माझी फसवणूक केली आहे. मला सुरुवातीला दीड लाख रुपये कर्ज माफ झाल्याचे पत्र दिले, नंतर मला वाढीव कर्जही दिले. आता मला बँकेकडून असे सांगण्यात आले आहे की, तुमचे कर्ज माफ झालेले नाही. माझ्या खात्यावरील रक्कम परस्पर काढून घेण्यात आली. बचत खात्यावरील रक्कम मी मुलीच्या लग्नासाठी ठेवली होती. मुलीचे लग्न २० दिवसांवर येऊन ठेपले आहे. आता मी काय करू?मुसा पठाण, शेतकरी, गोलटगाव-----------------------------------------नजरचुकीने दिले कर्जमाफीचे पत्रसंबंधित शेतकºयाला पूर्वीच्या अधिकाºयांकडून नजरचुकीने कर्जमाफीचे पत्र देण्यात आले; परंतु कर्जमाफीमध्ये सदर शेतकरी पात्र झालेला नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे जुलै २०१७ पर्यंत थकीत शेतकºयांचे कर्ज माफ झालेले आहे; परंतु पठाण यांनी घेतलेल्या कर्जाचा हप्ता डिसेंबर २०१७ मध्ये असल्याने या शेतकºयाला कर्जमाफीचा लाभ झालेला नाही. तरीसुद्धा वरिष्ठांना कर्जदार शेतकºयाच्या कर्जाचा तपशील पाठवला असून, वरिष्ठांनी कर्जमाफ करण्यास सहमती दर्शविली आहे. शेतकºयाचे खाते थकीत असल्याने त्यांच्या खात्यावरील ४० हजार रुपये काढण्याचा अधिकार बँकेला आहे.कैलास कच्छवे, शाखा व्यवस्थापकमहाराष्ट्र बँक

टॅग्स :FarmerशेतकरीBank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्र