शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

कलावंत निवड यादी आठ दिवसांत पूर्ण करू

By admin | Updated: December 30, 2014 01:19 IST

औरंगाबाद : समाजकल्याण विभागाच्या मागील चार वर्षांपासून रखडलेल्या वयोवृद्ध साहित्यिक, कलावंत मानधन योजनेतील कलावंतांची निवड यादीची

औरंगाबाद : समाजकल्याण विभागाच्या मागील चार वर्षांपासून रखडलेल्या वयोवृद्ध साहित्यिक, कलावंत मानधन योजनेतील कलावंतांची निवड यादीची फेरचौकशी करून येत्या आठ-दहा दिवसांत ही यादी राज्य सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी कलावंतांना शुक्रवारी दिले. अशासकीय सदस्यांच्या जिल्हा निवड समितीने कलावंतांची निवड करून यादी समाजकल्याण विभागाला दिली आहे; परंतु शाहीर साबळे व इतरांनी या निवड यादीसंदर्भात गंभीर आक्षेप घेतल्याने सर्व प्रक्रिया ठप्प झाली आहे. स्थायी समितीची शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष शेषराव गाडेकर, श्यामराव साळुंखे, लखूसिंग नाईक, उषा विसपुते व निवड यादीतील कलावंतांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन यांची भेट घेतली. यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, यादीसंदर्भात घेण्यात आलेल्या आक्षेपांची चौकशी येत्या आठ-दहा दिवसांत पूर्ण करू. अर्थ व बांधकाम सभापती संतोष जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.के. लांगोरे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी समाधान इंगळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. समिती सदस्य श्यामराव साळुंखे यांनी यावेळी समितीच्या अडचणी सांगितल्या. ते म्हणाले की, या योजनेसाठी औरंगाबाद जिल्ह्यातून दरवर्षी ६० कलावंत, साहित्यिकांची निवड केली जाते. त्यानुसार सन २०१० ते १२ या तीन वर्षांसाठी १८० पात्र कलावंतांची निवड करणे अपेक्षित होते. त्यासाठी जिल्हाभरातून १,८५० कलावंतांनी प्रस्ताव सादर केले. अशासकीय समितीने कोट्यानुसार १८० पात्र कलावंतांची निवड करून यादी समाजकल्याण विभागाला सुपूर्द केली. त्यातील ६३ कलावंतांची निवड करण्यात आली. उर्वरित ११७ कलावंतांच्या नावांना अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. सन २०१३ या वर्षामधील ६० कलावंतांची यादीही समितीने प्रस्तावित केली आहे. ४जिल्हास्तरावरील वयोवृद्ध कलावंतांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची ही मानधन योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविली जाते. त्यात कलावंतांच्या दर्जानुसार अ, ब, क हे तीन गट आहेत. या श्रेणीनुसार अनुक्रमे १,४००, १,२०० व १,००० रुपये मानधन ते हयात असेपर्यंत मिळते. त्यांच्या निधनानंतर वारस पती, पत्नीला मानधन मिळते. सध्या जिल्ह्यात ६६३ कलावंतांना हे मानधन मिळते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच समाजकल्याण विभागाने १५ दिवसांपूर्वीच बैठक आयोजित केली होती.