शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कलावंत निवड यादी आठ दिवसांत पूर्ण करू

By admin | Updated: December 30, 2014 01:19 IST

औरंगाबाद : समाजकल्याण विभागाच्या मागील चार वर्षांपासून रखडलेल्या वयोवृद्ध साहित्यिक, कलावंत मानधन योजनेतील कलावंतांची निवड यादीची

औरंगाबाद : समाजकल्याण विभागाच्या मागील चार वर्षांपासून रखडलेल्या वयोवृद्ध साहित्यिक, कलावंत मानधन योजनेतील कलावंतांची निवड यादीची फेरचौकशी करून येत्या आठ-दहा दिवसांत ही यादी राज्य सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी कलावंतांना शुक्रवारी दिले. अशासकीय सदस्यांच्या जिल्हा निवड समितीने कलावंतांची निवड करून यादी समाजकल्याण विभागाला दिली आहे; परंतु शाहीर साबळे व इतरांनी या निवड यादीसंदर्भात गंभीर आक्षेप घेतल्याने सर्व प्रक्रिया ठप्प झाली आहे. स्थायी समितीची शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष शेषराव गाडेकर, श्यामराव साळुंखे, लखूसिंग नाईक, उषा विसपुते व निवड यादीतील कलावंतांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन यांची भेट घेतली. यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, यादीसंदर्भात घेण्यात आलेल्या आक्षेपांची चौकशी येत्या आठ-दहा दिवसांत पूर्ण करू. अर्थ व बांधकाम सभापती संतोष जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.के. लांगोरे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी समाधान इंगळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. समिती सदस्य श्यामराव साळुंखे यांनी यावेळी समितीच्या अडचणी सांगितल्या. ते म्हणाले की, या योजनेसाठी औरंगाबाद जिल्ह्यातून दरवर्षी ६० कलावंत, साहित्यिकांची निवड केली जाते. त्यानुसार सन २०१० ते १२ या तीन वर्षांसाठी १८० पात्र कलावंतांची निवड करणे अपेक्षित होते. त्यासाठी जिल्हाभरातून १,८५० कलावंतांनी प्रस्ताव सादर केले. अशासकीय समितीने कोट्यानुसार १८० पात्र कलावंतांची निवड करून यादी समाजकल्याण विभागाला सुपूर्द केली. त्यातील ६३ कलावंतांची निवड करण्यात आली. उर्वरित ११७ कलावंतांच्या नावांना अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. सन २०१३ या वर्षामधील ६० कलावंतांची यादीही समितीने प्रस्तावित केली आहे. ४जिल्हास्तरावरील वयोवृद्ध कलावंतांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची ही मानधन योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविली जाते. त्यात कलावंतांच्या दर्जानुसार अ, ब, क हे तीन गट आहेत. या श्रेणीनुसार अनुक्रमे १,४००, १,२०० व १,००० रुपये मानधन ते हयात असेपर्यंत मिळते. त्यांच्या निधनानंतर वारस पती, पत्नीला मानधन मिळते. सध्या जिल्ह्यात ६६३ कलावंतांना हे मानधन मिळते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच समाजकल्याण विभागाने १५ दिवसांपूर्वीच बैठक आयोजित केली होती.