शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

शासनाच्या आडमुठेपणामुळे कडधान्याकडे पाठ

By admin | Updated: May 20, 2017 00:39 IST

बीड : गतवर्षी प्रशासनाने राष्ट्रीय कडधान्य विकास वर्ष घोषित करूनदेखील शेतीमालाची योग्य रीतीने खरेदी केली नाही. परिणामी अधिकचे उत्पादन होऊनही तुरीचे पीक पडून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गतवर्षी प्रशासनाने राष्ट्रीय कडधान्य विकास वर्ष घोषित करूनदेखील शेतीमालाची योग्य रीतीने खरेदी केली नाही. परिणामी अधिकचे उत्पादन होऊनही तुरीचे पीक पडून असल्याने कडधान्याविषयी शेतकऱ्यांची मानसिकता बदलत आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात सोयाबीनबरोबरच कापसावरही भर दिला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.तीन वर्षांपूर्वी कडधान्याच्या लागवडीचे प्रमाण घटल्याने तूर, मूग, उडिदाची आयात करावी लागली होती. शेतकऱ्यांचा उत्साह वाढावा, शिवाय पिकांना योग्य दर मिळण्याच्या दृष्टीने २०१६-१७ राष्ट्रीय कडधान्य विकास वर्ष म्हणून घोषित केले होते. यामधून शेतकऱ्यांची मानसिकता बदलली असली तरी प्रशासनाच्या धोरणामुळे पुन्हा शेतकरी गळीत धान्य, तसेच कापसाकडे वळू लागला आहे.असे असले तरी मात्र खरीपपूर्व हंगामाच्या अहवालात कृषी विभागाकडून कागदी घोडे नाचवून लागवड क्षेत्राविषयीचा अंदाज वर्तविला गेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कडधान्यात ६ हजार हेक्टरने वाढ होणार असल्याचे दर्शविण्यात आले आहे, तर कापसाचे क्षेत्र जैसे थेच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी पटवून दिले आहे. मात्र, वास्तव वेगळेच असून, शेतकरी पुन्हा कापसाकडे आकर्षित होत आहे.जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र ६ लाख ५८ हजार २४० एवढे आहे. त्यामध्ये तृणधान्य सुमारे १ लाख ५२ हजार हेक्टरावर होणार असून, यामध्ये ज्वारी, बाजरी, मका इ. पिके घेतली जाणार आहेत. कडधान्यामध्ये तूर, उडीद, मूग या पिकांचा समावेश असून, गळीत धान्यात सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग आदी पिके घेतली जाणार आहेत. गतवर्षी शेतकऱ्यांनी कापसाकडे दुर्लक्ष केले असले तरी सुमारे ३ लाख ३४ हजार ७४ हेक्टरावर लागवड झाली होती. त्यापेक्षा यंदा कापूस लागवडीत वाढ होणार आहे. आडमुठ्या धोरणांमुळे दोन वर्षाखालची पुनरावृत्ती होणार आहे.