शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या एसी भाड्याहून कमी तिकिट; मुंबई, दिल्ली, हैदराबादला चला विमानाने !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 15:40 IST

हवाई कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ झाली असून औरंगाबादहून रोज ६ विमानांची ये-जा होत आहेत 

औरंगाबाद : औरंगाबादहून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादला जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहे. रेल्वेबरोबरच शहराला दिल्ली, मुंबई आणि हैदराबादबरोबर हवाई कनेक्टिव्हिटीदेखील आहे. अनेक जण या शहरांत कमी वेळेत पोहोचण्यासाठी विमानसेवेला प्राधान्यक्रम देत आहेत.कोरोना प्रादुर्भावामुळे विमानसेवेला काहीसा फटका बसला. परंतु दुसऱ्या लाटेनंतर औरंगाबादची विमानसेवा पूर्वपदावर आली. सध्या एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई आणि हैदराबादशी विमानसेवेने जोडलेले आहे.

इंडिगोने १ डिसेंबरपासून सकाळच्या वेळेत दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा सुरू केली. यामुळे दिल्लीला एका दिवसात ये-जा करणे शक्य आहे. त्याबरोबरच दिल्लीहून कनेक्टिंग फ्लाईटने पाटणा, जयपूर, डेहराडून, श्रीनगर इ. ठिकाणी जाणेही शक्य झाले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा विमानसेवेला काही प्रमाणात फटका बसत आहे. या परिस्थितीला सामोरे जात विमानसेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न विमान कंपन्या आणि विमान प्राधिकरणांकडून केला जात आहे. गतवर्षी कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर विमानसेवा ठप्प झाली होती. त्यानंतर दिल्ली, मुंबई आणि हैदराबादची विमानसेवा पूर्ववत झाली. परंतु बंगळुरू आणि अहमदाबादची विमानसेवा सुरू होण्याची अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. ही दोन्ही विमाने लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

विमानतळावर येणाऱ्या विमानांची वेळविमान - आगमन वेळ- इंडिगो दिल्ली-औरंगाबाद - सकाळी ७.१५ वा.- एअर इंडिया मुंबई-औरंगाबाद - सायं. ४.४५ वा.- इंडिगो हैदराबाद-औरंगाबाद - सायं. ५.०५ वा.-इंडिगो मुंबई-औरंगाबाद - सांय. ६.३० वा.- इंडिगो दिल्ली-औरंगाबाद- सायं. ६.५५ वा.- एअर इंडिया दिल्ली- औरंगाबाद - सायं. ७.३५ वा.

विमानतळावरून जाणाऱ्या विमानांची वेळविमान- उड्डाणाची वेळ- इंडिगो औरंगाबाद- दिल्ली- सकाळी ७.४५-एअर इंडिया औरंगाबाद- दिल्ली- सायं. ५.२० वा.- इंडिगो औरंगाबाद-हैदराबाद- सायं. ५.२५ वा.-इंडिगो औरंगाबाद-मुंबई- सायं. ७ वा.- इंडिगो औरंगाबाद-दिल्ली- सायं. ७.३० वा.- एअर इंडिया औरंगाबाद-मुंबई- रात्री. ८.२०

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन