शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

प्रशासकीय मान्यतेअभावी रखडले कर्ज प्रस्ताव

By admin | Updated: August 29, 2016 00:59 IST

शिरीष शिंदे , बीड येथील जिल्हा उद्योग केंद्रातील तीन योजनांसाठीचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून यंदा मिळाला नसल्यामुळे अधिकाऱ्यांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

शिरीष शिंदे , बीडयेथील जिल्हा उद्योग केंद्रातील तीन योजनांसाठीचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून यंदा मिळाला नसल्यामुळे अधिकाऱ्यांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. राज्य शासनाने प्रत्येक विभागासाठी अर्थसंकल्पात निधी मंजूर केला असताना प्रशासकीय मान्यतेची काय गरज, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.जिल्हा उद्योग केंद्रांतर्गत तरुण बेरोजगारांसाठी बीज भांडवल योजना राबविली जाते. तसेच तरुणांना विविध व्यवसाय उद्योगांचे मार्गदर्शन व्हावे यासाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जातो. बीज भांडवलासाठी या वर्षी २० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यामध्ये तरुण/बेरोजगारांना १५ टक्के जिल्हा उद्योग केंद्राकडून अनुदान दिले जाते. स्वत:चे १० टक्के व इतर ७५ टक्के बँक कर्ज देते, असे योजनेचे स्वरूप आहे.डीआयसीच्या एका योजनेअंतर्गत १० प्रकरणांसाठी ५ लाखांचे उद्दिष्ट दिले असून, प्रत्येकास ४० हजार रुपये मिळतील. उद्योग विकास कार्यक्रमांतर्गत ८३३ तरुणांना प्रशिक्षण दिले जात असून, त्यावर २५ लाख रुपये खर्च होणार आहे. दरवर्षी अर्थसंकल्पात विभागनिहाय खर्च ताळेबंद जाहीर केला जातो. त्यानुसार त्या त्या विभागांवर खर्च करण्याचे निश्चित होते. दरवर्षी जिल्हा नियोजन मंडळामार्फत जिल्हा उद्योग केंद्रास निधी दिला जातो. मात्र, यंदा पहिल्यांदाच प्रशासकीय मान्यतेची अट टाकण्यात आली. त्यानंतर या योजना सुरू होतील. नव्या नियमामुळे अधिकारी पेचात पडले आहेत.