शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

हर्षवर्धन जाधव यांच्या ‘शिवस्वराज्य’पक्षासमोर कायदेशीर पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 11:08 IST

आ. हर्षवर्धन जाधव यांनी‘शिवस्वराज्य पक्ष’ असे नाव निवडणूक आयोगाकडे मागितले आहे.

ठळक मुद्दे ‘शिवस्वराज्य पक्ष’ नाव देण्यास आयोगाने कायदेशीररीत्या हरकत घेतली आहेराजीनामा मंजूर न झाल्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदीनुसार कारवाई होणार असल्याची चर्चा आहे.

औरंगाबाद : शिवसेनेला जय महाराष्ट्र करून नवीन पक्ष स्थापन करण्यासाठी आ. हर्षवर्धन जाधव यांनी घेतली असून, त्यांनी ‘शिवस्वराज्य पक्ष’ असे नाव निवडणूक आयोगाकडे मागितले आहे. ते नाव देण्यास आयोगाने कायदेशीररीत्या हरकत घेतली आहे, तर आ. जाधव यांच्या पक्ष काढण्याच्या भूमिकेमुळे त्यांच्यासमोर पक्षांतर बंदीनुसार कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. 

आ. जाधव यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा मंजूर न झाल्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदीनुसार कारवाई होणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेची याप्रकरणात कोंडी झाली असून भाजप सगळ्या राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे; परंतु सावध भूमिका बाळगून आहे. दरम्यान आ. जाधव यांच्या घरी आज जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या राजकीय पदाधिकाºयांची, कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यांनी जाधव यांना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी गळ घातली आहे. काही कार्यकर्त्यांनी पक्ष काढण्याच्या भूमिकेवर मत व्यक्त केले. बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, गट व गणनिहाय आणि त्यानंतर शहरात वॉर्डनिहाय बैठकांचे आयोजन करण्याचे नियोजन शुक्रवारी करण्यात आले. 

विधिज्ञांचे मत असे विधिज्ञ अ‍ॅड. सगर किल्लारीकर यांच्या मते, पक्षांतर बंदीची कारवाई होऊ शकते; परंतु ती कारवाई फक्त शिवसेना करू शकते. त्यांचा राजीनामा मंजूर झालेला नाही. त्यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर इतरही राजीनामे आले आहेत. त्यामुळे कुणाचाही राजीनामा मंजूर झालेला नाही. पक्ष बदलायचा असेल तर नव्याने राजीनामा द्यावा लागेल. काहीही कारण न देता स्वखुशीने राजीनामा द्यावा लागेल. मग विधानसभा अध्यक्षांना पर्याय नसेल, ते राजीनामा मंजूर करतील. आमदार स्वखुशीने राजीनामा देऊ शकतात; परंतु काही कारणास्तव राजीनामा दिला असेल तर अध्यक्ष आमदाराला बाजू मांडण्याची संधी देतात; पण तसा काहीही नियम नाही, ती एक प्रथा आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी असाच तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यांना विधानसभा अध्यक्षांनी प्रथेनुसार संधी दिली होती, त्यानंतर राजीनामा मंजूर केला होता.

आ. जाधव यांचे मत असे...आ. हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले, मला कुठलीही कायदेशीर अडचण येणार नाही. मी विधानसभेचा राजीनामा दिला आहे. अपात्रतेची कारवाई केव्हा होते जेव्हा पक्षाचा व्हीप पाळत नाही तेव्हा. मुळात मी राजीनामा दिलेला आहे, तो मंजूर झालेला नाही. त्यासाठी मी काहीही करू शकत नाही. माझा राजीनामा मंजूर करण्याची जबाबदारी अध्यक्षांची आहे. त्यामुळे मला तांत्रिकदृष्ट्या काहीही अडचण नाही. शिवस्वराज्य पक्ष असे नाव निवडणूक आयोगाकडे मागितले आहे. मात्र, आयोगाने काही बदल सुचविले आहेत. माझ्या वकिलाशी चर्चा करून पुन्हा आयोगाकडे परवानगीसाठी जाणार आहे. 

टॅग्स :Harshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवPoliticsराजकारणElectionनिवडणूकShiv Senaशिवसेना