शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

हर्षवर्धन जाधव यांच्या ‘शिवस्वराज्य’पक्षासमोर कायदेशीर पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 11:08 IST

आ. हर्षवर्धन जाधव यांनी‘शिवस्वराज्य पक्ष’ असे नाव निवडणूक आयोगाकडे मागितले आहे.

ठळक मुद्दे ‘शिवस्वराज्य पक्ष’ नाव देण्यास आयोगाने कायदेशीररीत्या हरकत घेतली आहेराजीनामा मंजूर न झाल्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदीनुसार कारवाई होणार असल्याची चर्चा आहे.

औरंगाबाद : शिवसेनेला जय महाराष्ट्र करून नवीन पक्ष स्थापन करण्यासाठी आ. हर्षवर्धन जाधव यांनी घेतली असून, त्यांनी ‘शिवस्वराज्य पक्ष’ असे नाव निवडणूक आयोगाकडे मागितले आहे. ते नाव देण्यास आयोगाने कायदेशीररीत्या हरकत घेतली आहे, तर आ. जाधव यांच्या पक्ष काढण्याच्या भूमिकेमुळे त्यांच्यासमोर पक्षांतर बंदीनुसार कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. 

आ. जाधव यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा मंजूर न झाल्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदीनुसार कारवाई होणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेची याप्रकरणात कोंडी झाली असून भाजप सगळ्या राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे; परंतु सावध भूमिका बाळगून आहे. दरम्यान आ. जाधव यांच्या घरी आज जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या राजकीय पदाधिकाºयांची, कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यांनी जाधव यांना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी गळ घातली आहे. काही कार्यकर्त्यांनी पक्ष काढण्याच्या भूमिकेवर मत व्यक्त केले. बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, गट व गणनिहाय आणि त्यानंतर शहरात वॉर्डनिहाय बैठकांचे आयोजन करण्याचे नियोजन शुक्रवारी करण्यात आले. 

विधिज्ञांचे मत असे विधिज्ञ अ‍ॅड. सगर किल्लारीकर यांच्या मते, पक्षांतर बंदीची कारवाई होऊ शकते; परंतु ती कारवाई फक्त शिवसेना करू शकते. त्यांचा राजीनामा मंजूर झालेला नाही. त्यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर इतरही राजीनामे आले आहेत. त्यामुळे कुणाचाही राजीनामा मंजूर झालेला नाही. पक्ष बदलायचा असेल तर नव्याने राजीनामा द्यावा लागेल. काहीही कारण न देता स्वखुशीने राजीनामा द्यावा लागेल. मग विधानसभा अध्यक्षांना पर्याय नसेल, ते राजीनामा मंजूर करतील. आमदार स्वखुशीने राजीनामा देऊ शकतात; परंतु काही कारणास्तव राजीनामा दिला असेल तर अध्यक्ष आमदाराला बाजू मांडण्याची संधी देतात; पण तसा काहीही नियम नाही, ती एक प्रथा आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी असाच तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यांना विधानसभा अध्यक्षांनी प्रथेनुसार संधी दिली होती, त्यानंतर राजीनामा मंजूर केला होता.

आ. जाधव यांचे मत असे...आ. हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले, मला कुठलीही कायदेशीर अडचण येणार नाही. मी विधानसभेचा राजीनामा दिला आहे. अपात्रतेची कारवाई केव्हा होते जेव्हा पक्षाचा व्हीप पाळत नाही तेव्हा. मुळात मी राजीनामा दिलेला आहे, तो मंजूर झालेला नाही. त्यासाठी मी काहीही करू शकत नाही. माझा राजीनामा मंजूर करण्याची जबाबदारी अध्यक्षांची आहे. त्यामुळे मला तांत्रिकदृष्ट्या काहीही अडचण नाही. शिवस्वराज्य पक्ष असे नाव निवडणूक आयोगाकडे मागितले आहे. मात्र, आयोगाने काही बदल सुचविले आहेत. माझ्या वकिलाशी चर्चा करून पुन्हा आयोगाकडे परवानगीसाठी जाणार आहे. 

टॅग्स :Harshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवPoliticsराजकारणElectionनिवडणूकShiv Senaशिवसेना