शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
4
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
5
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
6
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
7
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
8
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
9
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
10
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
11
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
12
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
13
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
14
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
15
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
16
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
17
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
18
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
19
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
20
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार

प्रचाराला नेते आले नाहीत म्हणून झाली होती दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:13 IST

अ‍ॅड. काशीनाथ नावंदर.... हैदराबाद मुक्तिसंग्रामामध्ये सहभाग घेतल्यानंतर मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न समाजवादी मंडळी प्रभावीपणे मांडत होती. त्यासाठी विविध मार्गांचा अवलंब ...

अ‍ॅड. काशीनाथ नावंदर....हैदराबाद मुक्तिसंग्रामामध्ये सहभाग घेतल्यानंतर मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न समाजवादी मंडळी प्रभावीपणे मांडत होती. त्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जात होता. हा लढा संपताच संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला. यातही मराठवाडा संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने लढ्यात सहभागी झाला. मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर काही वर्षे हैदराबाद राज्यात समाविष्ट होता. तेव्हा विधानसभा हैदराबादेत होती. त्यावेळी प्रचारात गरिबी, शिक्षण, आरोग्य हेच जीवनावश्यक विषय होते.लोकांमध्ये स्वाभिमानी हैदराबाद लढ्याचा उत्साह होता. यातून मराठी भाषिक राज्याच्या मागणीनुसार मराठवाडा महाराष्ट्रात विनाअट समाविष्ट झाला. तेव्हा समाजवादी पक्षाच्या उमेदवारांसाठी हिरीरीने प्रचारात सहभागी होत. जात-धर्म-पंथाचा लवलेशही प्रचारात नसे. आमचे उमेदवार नेहमीच विकासाची भाषा करायचे. विरोधी काँग्रेसही कधीच वैयक्तिक, जातीय प्रचार करीत नसे. पुढे देशात आणीबाणी लागू झाली. तेव्हा समाजवादी, जनता दल आदी पक्षांनी प्रखर विरोध केला. देशभर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात वादळ निर्माण केले. आणीबाणीनंतर झालेल्या पहिल्याच लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. बापूसाहेब काळदाते यांना जनतेने निवडून दिले. देशात काँग्रेसविरोधी पक्षांची लाट होती. जनता दल पक्ष जोरात होता. १९७८ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता दलाचे औरंगाबाद (जालन्यासह) जिल्ह्यातून ७ आमदार निवडून आले होते. इंदिरा काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या दिग्गजांचा पराभव झाला. मात्र वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून शरद पवार मुख्यमंत्री बनले. ते सरकार इंदिरा गांधी यांनी १९८० साली पंतप्रधान होताच बरखास्त करून टाकले. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आय काँग्रेसची लाट निर्माण झाली होती. औरंगाबादेत काझी सलीम हे खासदार बनले. त्याच वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आय काँग्रेस आणि जनता दल यांच्यात लढत झाली. जनता दलाकडून मला तिकीट मिळाले होते. माझ्याविरोधात आय काँग्रेसने अब्दुल अजीम यांना तिकीट दिले. या निवडणुकीत जनता दल आणि जनसंघातील युतीची बोलणी फिसकटली. या निवडणुकीत माझा पराभव झाला. अब्दुल अजीम हे आमदार बनले. तेव्हा माझ्या प्रचारासाठी भारताचे उपपंतप्रधान राहिलेले जगजीवन राम येणार होते. आमखास मैदानावर जाहीर सभा आयोजित केली होती. लोक दुपारी दोन वाजेपासूनच त्यांना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी जमले होते. चार वाजले तरी ते आले नाहीत. सहा वाजेपर्यंत लोक थांबले. शेवटी लोकांच्या सहनशीलतेचा अंत झाला. त्यांनी औरंगपुऱ्यातील माझ्या प्रचार कार्यालयावर चाल करून येऊन दगडफेक केली. ही एक वादग्रस्त घटना घडली होती. याच निवडणुकीत राज बब्बर, मृणालताई गोरे यांनी माझ्यासाठी प्रचार सभा घेऊन निवडणुकीत रंगत आणली. मात्र जनसंघाने मदत न केल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला.निवडणुकीत हार-जीत होते. हे तेव्हा गृहीत धरलेले असायचे. पराभव झाला तरी फार काही परिणाम होत नसे. आमचे काम दुसऱ्या दिवसापासून सुरू होत असे. पुढे वकिलीतच अधिक लक्ष देऊन जम बसवला. बार असोसिएशनचा अध्यक्ष असताना औरंगाबादेत मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू व्हावे यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही भेट घेतली होती. वयाच्या ९२ व्या वर्षी त्या सगळ्या आठवणी जाग्या राहिल्या आहेत.शब्दांकन : राम शिनगारे

टॅग्स :AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक